शहरं
Join us  
Trending Stories
1
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
2
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
3
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
4
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
5
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
6
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
7
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
8
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
9
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
10
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
11
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
12
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
13
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
14
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
15
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
16
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
17
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
18
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
19
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
20
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
Daily Top 2Weekly Top 5

‘टेकेपार’चा कालवा फुटला ‘सालेबर्डी’च्या शेतात माती

By admin | Updated: July 16, 2014 23:54 IST

संततधार पावसामुळे अचानक प्रवाह वाढल्यामुळे वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला टेकेपार उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटला. सुमारे तीनशे मीटर लांबीच्या नहराच्या पाळीला ठिकठिकाणी मोठमोठे भगदाड पडले आहे.

प्रशासनाकडून बेदखल : सालेबर्डी गावात १० एकरातील धान पऱ्हे मातीत दबले
भंडारा :   संततधार पावसामुळे अचानक प्रवाह वाढल्यामुळे वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला टेकेपार उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटला. सुमारे तीनशे मीटर लांबीच्या नहराच्या पाळीला ठिकठिकाणी मोठमोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे शेतात मातीच माती पसरल्यामुळे अंदाजे १० एकरातील धानाचे पऱ्ह्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकारामुळे तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नहर नुतनीकरणाचे पितळ उघडे पडले आहे.
मंगळवारला सायंकाळी सहा वाजता झालेल्या या प्रकाराची माहिती शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रात्री ९ वाजता नहरातून पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला. परंतु शेतकऱ्यांनी सांगितलेल्या नुकसानाची प्रशासनाने दखल घेतली नाही. याप्रकरणी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत शेतकरी म्हणाले, नहर आणि शेताची पाहणी करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने सालेबर्डीला भेट दिली नाही.
मंगळवारला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, टेकेपार उपसा सिंचन योजनेची सालेबर्डीहून वाहणाऱ्या नहराची पाळ ठिकठिकाणी फुटली आणि नहराचे पाणी पाळीची माती शेतात शिरली. याची माहिती होताच गावातील नागरिक त्याठिकाणी जमा झाले. त्यानंतर प्रकल्पाच्या आंबाडी कार्यालयाला सूचना दिली. रात्री पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
घटनेची माहिती मिळताच ‘लोकमत’ने आज बुधवारला सालेबर्डीला भेट दिली असता, नहराच्या पाळीला अंदाजे ३०० मीटर एवढ्या भागात ठिकठिकाणी तडे गेले होते. सुमारे अडीच एकर शेतात माती भरलेली दिसून आली. याशिवाय शेतात पाणी शिरल्यामुळे धुरे फुटले. याचा फटका परिसरातील १० एकर शेतीचे नुकसान झाले. यात सर्वाधिक प्रभावित शेतकरी रोशन उरकुडे शेतीचे हाल सांगताना म्हणाले, तीन एकरात मशीनने पेरणी केली. त्यामुळे शेत हिरवेगार झाले होते. परंतु आता त्यांच्या शेतात माती पसरली आहे. त्यामुळे उरकुडे आणि त्यांच्या शेजारी शेत असलेले प्रशांत निंबार्ते यांच्या शेतातील पीक नष्ट झाले आहे. काल फुटलेल्या नहरातील पाणी आजही वाहत होते.
टेकेपार उपसा सिंचन योजना वैनगंगा नदीतील पाण्याचा उपसा करुन नहराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येते. नहराची पाळ क्षतिग्रस्त झाल्यामुळे पिक होणे कठिण झाले आहे. पाणी सोडण्यापूर्वी नहराची पाळ मजबूत करणे आवश्यक होते. पाळीची दुरुस्ती केल्याशिवाय नहराचे पाणी सोडले तर सालेबर्डीसह परिसरातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(जिल्हा प्रतिनिधी)