शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याण विभाग ‘कल्याण’च्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 15, 2015 00:38 IST

राज्य शासनाने शासकीय कार्यलयातील धूळ खात फाईलींचा त्वरीत निपटारा होऊन नागरिकांचे कामे वेळेत व्हावे, ...

तीन कर्मचाऱ्यांवर कारभार : पदे भरण्याऐवजी बदलीचे सत्र सुरूचभंडारा : राज्य शासनाने शासकीय कार्यलयातील धूळ खात फाईलींचा त्वरीत निपटारा होऊन नागरिकांचे कामे वेळेत व्हावे, यासाठी 'सेवा कायदा' लागू करण्याची घोषणा केली. एकीकडे सेवा कायद्याची घोषणा तर दुसरीकडे रिक्त असलेली पद भरण्याऐवजी कार्यरत कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचे स्थानांतरण करण्याचा सपाटा असा विरोधाभास सध्या येथे बघायला मिळत आहे.समाजातील तळागळातील नागरिकांच्या उत्थानासाठी शासनाने ‘समाजकल्याण’ विभागाची निर्मिती केली आहे. मात्र, भंडारा येथील जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात अनेक पद रिक्त असल्याने केवळ एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर अतिरिक्त जबाबदारी सांभाळीत आहेत. असे असताना रिक्त पदे भरण्याऐवजी शासनाने लोकप्रतिनिधींच्या तक्रारीवरून दीड वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांचे स्थानांतरण केल्याने या विभागाला आता स्व‘कल्याण’ची गरज भासणार आहे.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सर्व योजनांची माहिती पोहचून त्यांचे कल्याण व्हावे व समाजात त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात समाजकल्याण विभागाची निर्मिती केली आहे. भंडारा जिल्हा परिषदेतही समाजकल्याण विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाची धुरा जिल्हा समाजकल्याण अधिकारी ए. आर. रामटेके सांभाळीत आहेत. मात्र, विभागाच्याकर्णधाराची भूमिका सांभाळणाऱ्या रामटेके यांच्या कार्यालयात मंजूर १४ पदांपैकी केवळ पाच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. उर्वरित आठ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.त्यातही कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये दोन कर्मचारी हे शिपाई प्रवर्गातील असून उर्वरित तीन कर्मचाऱ्यांनाच कार्यालयीन तथा नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.चौदापैकी आठ पदे रिक्त असल्याने या तीन कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याने ते अगदी विविध प्रकारच्या फाईलींच्या गठ्ठ्यात कामे करीत असल्याची प्रचिती या विभागात नजर टाकल्यावर दिसून येते. शासनाने भंडारा येथील जिल्हा परिषद समाजकल्याण विभागासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी, अधिक्षक, समाजकल्याण निरीक्षक, वरिष्ठ लिपीक, सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लिपीक व शिपाई असे विविध १४ पदे मंजूर केलेली आहेत. समाजकल्याण विभागाची धुरा सांभाळणारे रामटेके यांचे स्थानांतरण वर्धा येथे करण्यात आली असली तरी, प्रशासनाने त्यांना येथून सोडलेले नाही. (शहर प्रतिनिधी)त्रिमूर्तींच्या तक्रारीवरून स्थानांतरणसमाजातील शेवटच्या घटकाला विभागाच्या योजनांचा लाभ देण्याचा या विभगाचा पर्यायाने येथील अधिकाऱ्यांनी चंग बाधून तसा कार्यक्रम राबविला. मात्र, एका लोकप्रतिनिधीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील मंजूर झालेला दलितवस्तीतील रस्त्याच्या कामाबाबत जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचे समजते. यातूनच 'त्या' लोकप्रतिनिधीने आपल्या अन्य दोन सहकारी लोकप्रतिनिधींकडून संबंधीत अधिकाऱ्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. या त्रिमुर्तींच्या तक्रारीवरूनच अधिकाऱ्याचे स्थानांतरण करण्यात आली. लोकप्रतिनिधी स्वकामाला महत्त्व देवून अधिकाऱ्यांच्या तक्रारी करीत असल्यास अधिकारी जिल्ह्यात यायला धजावतील, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे.