शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

समाजकल्याण विभाग ‘कल्याण’च्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 15, 2015 00:38 IST

राज्य शासनाने शासकीय कार्यलयातील धूळ खात फाईलींचा त्वरीत निपटारा होऊन नागरिकांचे कामे वेळेत व्हावे, ...

तीन कर्मचाऱ्यांवर कारभार : पदे भरण्याऐवजी बदलीचे सत्र सुरूचभंडारा : राज्य शासनाने शासकीय कार्यलयातील धूळ खात फाईलींचा त्वरीत निपटारा होऊन नागरिकांचे कामे वेळेत व्हावे, यासाठी 'सेवा कायदा' लागू करण्याची घोषणा केली. एकीकडे सेवा कायद्याची घोषणा तर दुसरीकडे रिक्त असलेली पद भरण्याऐवजी कार्यरत कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचे स्थानांतरण करण्याचा सपाटा असा विरोधाभास सध्या येथे बघायला मिळत आहे.समाजातील तळागळातील नागरिकांच्या उत्थानासाठी शासनाने ‘समाजकल्याण’ विभागाची निर्मिती केली आहे. मात्र, भंडारा येथील जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात अनेक पद रिक्त असल्याने केवळ एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर अतिरिक्त जबाबदारी सांभाळीत आहेत. असे असताना रिक्त पदे भरण्याऐवजी शासनाने लोकप्रतिनिधींच्या तक्रारीवरून दीड वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांचे स्थानांतरण केल्याने या विभागाला आता स्व‘कल्याण’ची गरज भासणार आहे.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सर्व योजनांची माहिती पोहचून त्यांचे कल्याण व्हावे व समाजात त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात समाजकल्याण विभागाची निर्मिती केली आहे. भंडारा जिल्हा परिषदेतही समाजकल्याण विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाची धुरा जिल्हा समाजकल्याण अधिकारी ए. आर. रामटेके सांभाळीत आहेत. मात्र, विभागाच्याकर्णधाराची भूमिका सांभाळणाऱ्या रामटेके यांच्या कार्यालयात मंजूर १४ पदांपैकी केवळ पाच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. उर्वरित आठ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.त्यातही कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये दोन कर्मचारी हे शिपाई प्रवर्गातील असून उर्वरित तीन कर्मचाऱ्यांनाच कार्यालयीन तथा नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.चौदापैकी आठ पदे रिक्त असल्याने या तीन कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याने ते अगदी विविध प्रकारच्या फाईलींच्या गठ्ठ्यात कामे करीत असल्याची प्रचिती या विभागात नजर टाकल्यावर दिसून येते. शासनाने भंडारा येथील जिल्हा परिषद समाजकल्याण विभागासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी, अधिक्षक, समाजकल्याण निरीक्षक, वरिष्ठ लिपीक, सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लिपीक व शिपाई असे विविध १४ पदे मंजूर केलेली आहेत. समाजकल्याण विभागाची धुरा सांभाळणारे रामटेके यांचे स्थानांतरण वर्धा येथे करण्यात आली असली तरी, प्रशासनाने त्यांना येथून सोडलेले नाही. (शहर प्रतिनिधी)त्रिमूर्तींच्या तक्रारीवरून स्थानांतरणसमाजातील शेवटच्या घटकाला विभागाच्या योजनांचा लाभ देण्याचा या विभगाचा पर्यायाने येथील अधिकाऱ्यांनी चंग बाधून तसा कार्यक्रम राबविला. मात्र, एका लोकप्रतिनिधीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील मंजूर झालेला दलितवस्तीतील रस्त्याच्या कामाबाबत जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचे समजते. यातूनच 'त्या' लोकप्रतिनिधीने आपल्या अन्य दोन सहकारी लोकप्रतिनिधींकडून संबंधीत अधिकाऱ्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. या त्रिमुर्तींच्या तक्रारीवरूनच अधिकाऱ्याचे स्थानांतरण करण्यात आली. लोकप्रतिनिधी स्वकामाला महत्त्व देवून अधिकाऱ्यांच्या तक्रारी करीत असल्यास अधिकारी जिल्ह्यात यायला धजावतील, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे.