शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये आतापर्यंत केवळ २३.९९ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:36 IST

भंडारा : तलावाचा जिल्हा आणि मुबलक पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात जुलै महिना संपत आला तरी अद्याप दमदार पावसाचा ...

भंडारा : तलावाचा जिल्हा आणि मुबलक पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात जुलै महिना संपत आला तरी अद्याप दमदार पावसाचा पत्ता नाही. पावसाने सरासरी गाठली असली तरी जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि माजी मालगुजारी तलाव अशा ६३ प्रकल्पांमध्ये सध्या २९.२२ दलघमी म्हणजे केवळ २३.९९ टक्केच जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये ३२.३५ टक्के पाणी संचित झाले होते.

भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द, बावनथडी हे मोठे प्रकल्प असून, यासोबतच चार मध्यम प्रकल्प, ३१ लघु प्रकल्प आणि २८ माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव आहेत. यामुळे जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी मुबलक उपलब्ध असते. दरवर्षी जुलै महिन्यात साधारणत: ३५ टक्क्यांपर्यंत पाणी या प्रकल्पामध्ये साठते. परंतु, यंदा या प्रकल्पांमध्ये केवळ २९.२२ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ९.२०० दलघमी म्हणजे २१.४८ टक्के जलसाठा सद्य:स्थितीत आहे. गतवर्षी या चार प्रकल्पांत १०.४८१ दलघमी म्हणजे २४.४८ टक्के जलसाठा होता. तब्बल तीन टक्के जलसाठा कमी आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून, सद्य:स्थितीत या प्रकल्पात १४.९४ दलघमी जलसाठा असून, त्याची टक्केवारी २६.३२ आहे. गतवर्षी या प्रकल्पात १८.६१ दलघमी पाणी होते. या पाण्याची टक्केवारी ३४.७६ होती. २८ मामा तलावात सद्य:स्थितीत ५.९२ दलघमी पाणी असून, त्याची टक्केवारी २३.३२ आहे. गतवर्षी याच काळात १०.२८ दलघमी म्हणजे ४०.५१ टक्के जलसाठा होता. १७ टक्के जलसाठा कमी आहे.

जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते २७ जुलै या काळात ५३९.०१ मिमी पाऊस कोसळला. या कालावधीत ५८१.४ मिमी पाऊस अपेक्षित असतो. आतापर्यंत सरासरीच्या ९३ टक्के पाऊस कोसळला आहे. सुरुवातीला दमदार पाऊस कोसळला असला तरी अलीकडे पाऊस मात्र रिमझिम बरसत आहे. शेतकऱ्यांसह सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा झाल्यास रब्बी आणि उन्हाळी हंगामात सिंचनासाठी त्याचा उपयोग होतो. धान पिकासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे प्रकल्प कधी भरतात याकडे प्रशासनासह शेतकऱ्यांचेही लक्ष लागलेले असते.

गोसे प्रकल्पातून पाच दिवसांपासून पाण्याचा विसर्ग

मध्य प्रदेशासह पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने गोसे प्रकल्पाच्या पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी गत पाच दिवसांपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. भंडारा शहराजवळून वाहणारी वैनगंगा ही दुथडी भरून वाहत आहे. वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाल्याने २३ जुलैला सर्व ३३ गेट उघडण्यात आले होते. पाच दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाचव्या दिवशी मंगळवारी तीन गेट अर्धा मीटरने उघडून ७५८.२ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

गतवर्षी भंडारा शहरासह जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. मध्य प्रदेशातील संजय सरोवरसह शिरपूर, पुजारीटोला, कालीसराड, इटियाडोह आणि बावनथडी प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे गतवर्षी ३० आणि ३१ ऑगस्टला महापूर आला होता. गतवर्षीसारखी स्थिती यावर्षी होऊ नये म्हणून गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे.