शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

जिल्ह्यात आतापर्यंत ३९ व्यक्तींची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा प्रशासन आणि आरोग्यविभाग कोरोना नियंत्रणासाठी पुरेपुर प्रयत्न करीत असून त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश येत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ४९ वर पोहचली होती. मात्र प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे अवघ्या काही दिवसातच ३९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १० क्रियााशील रुग्ण उपचार घेत असून लवकरच तेही बरे होतील आणि भंडारा जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा आहे.

ठळक मुद्देदोन दिवसात नवा रुग्ण नाही । बाधितांची संख्या ४९,अ‍ॅक्टिव्ह रुग्ण १०

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत दोन दिवसात एकाही कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली नसून शनिवारी आठ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या १० क्रियाशील रुग्ण येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.भंडारा जिल्हा प्रशासन आणि आरोग्यविभाग कोरोना नियंत्रणासाठी पुरेपुर प्रयत्न करीत असून त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश येत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ४९ वर पोहचली होती. मात्र प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे अवघ्या काही दिवसातच ३९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १० क्रियााशील रुग्ण उपचार घेत असून लवकरच तेही बरे होतील आणि भंडारा जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा आहे.आतापर्यंत २६६९ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर २६०९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ११ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. १३ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात २३ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३९२ व्यक्तींना येथून सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर साकोली, मोहाडी, तुमसर येथे १४३ व्यक्ती भरती आहेत. २१२६ व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे.सुरवातीच्या काळात जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नव्हता. मात्र गराडा येथील महिलेला कोरोनाची बाधा झाली आणि जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधीत व्यक्तीची नोंद झाली. त्यानंतर अवघ्या महिनाभरात कोरोनाबाधीतांची संख्या ४९ वर जाऊन पोहचली. त्यातही सर्वाधिक रुग्ण मुंबई-पुणे महानगरातून आलेले आहेत. रुग्ण वाढीच्या संख्येपेक्षा दुरुस्त होणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात अधिक आहे. शनिवारी ८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत ३९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी आशा आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या