शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नागपंचमीला सापाला पूजले जाते, मग इतर दिवशी का मारले जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा: वाढत्या नागरीकरणासोबतच जंगलांचा आकार कमी होत गेला. मानवी वस्ती लगत साप आढळून येण्याचे प्रमाण वाढत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा: वाढत्या नागरीकरणासोबतच जंगलांचा आकार कमी होत गेला. मानवी वस्ती लगत साप आढळून येण्याचे प्रमाण वाढत गेले तर, दुसरीकडे नागपंचमीला साप दिसला की, पूजन करण्यात येते मात्र अन्य दिवशी साप आढळला तर, त्याला मारण्यात येते. त्याचा जीव घेण्यात येतो. वास्तवात साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. विषारी आणि बिनविषारी साप ओळखणेही महत्त्वाचे झाले आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सापाचा समावेश असतो. पावसाळ्याच्या दिवसात बिळामध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर येताच त्यांच्यावर हल्ला चढवितात. नागपंचमीला त्याच सापाचे पूजन केले जाते मात्र अन्य दिवशी हा साप आढळला तर त्याचा जीवच घेतला जातो, ही बाब अयोग्य आहे.

साप हा शेतकऱ्याचा मित्र

एकंदरीत पाहता साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतामध्ये असणारे लहान-मोठे जीवजंतू किंवा अन्य मोठे किडे याचे साप भक्षण करीत असतो. हे एक प्रकारे पिकांचे संरक्षण सापांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो .

विषारी

भंडारा जिल्ह्यात घोणस, साधा मण्यार, नागराज, पट्टेरी मण्यार या चार विषारी प्रजाती प्रामुख्याने आढळतात.

बिनविषारी

जिल्ह्यात वास्या, धोंड्या, मांडोळ, धूळनागीण तिडक्या, धामण, पट्टेरी मण्यार, गवत्या आदी.

सर्पमित्र काय म्हणतात...

साप आढळला तर, गोंधळ किंवा जास्त हालचाल करू नका. दारे खिडक्या बंद करून घ्या किंवा शेतशिवारात साप आढळला असेल तर, तिथून बाजूला व्हा. सर्प मित्राच्या मदतीने त्याला जंगलात सोडून द्या.

-योगेशकुमार पशिने, सर्पमित्र

साप आढळला तर

घर परिसरात किंवा शेतशिवारात साप आढळल्यास मारू नका. त्याच्यावर हल्ला करणे योग्य नाही. साप हा अतिशय शांत असतो. ज्यावेळी त्याला धोका किंवा असुरक्षितता वाटते, तेव्हाच तो दंश करतो. प्रत्येक साप हा विषारी असतो, हा गैरसमज आहे. विषारी व बिनविषारी साप कोणते, ही बाब आपण ओळखली पाहिजे. त्यामुळे साप दिसताच किंवा चावा घेतल्यास घाबरून जाऊ नका. विष शरीरात पसरू नये, याची प्रथम काळजी घेऊन रुग्णालयात जावे.