शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

नळातून निघाला साप !

By admin | Updated: May 31, 2016 00:37 IST

शीर्षक वाचून दचकलात ना! परंतु हे खरे आहे. शहरातील राजेंद्र वॉर्डातील शुक्रवारी परिसरातील रहिवाशी अनिल श्रावण गौरी यांच्या घरी ...

शुक्रवारी वॉर्डातील प्रकार : लोकप्रतिनिधी एकत्र का येत नाहीत?भंडारा : शीर्षक वाचून दचकलात ना! परंतु हे खरे आहे. शहरातील राजेंद्र वॉर्डातील शुक्रवारी परिसरातील रहिवाशी अनिल श्रावण गौरी यांच्या घरी सोमवारी सकाळी ७.२० वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा परेश हा पाणी भरत होता. यावेळी नळातून चक्क साप आल्याने त्याची भंबेरी उडाली. आजपर्यंत नारू आल्याचे ऐकिवात आहे. मात्र नळाच्या पाण्यातून चक्क साप निघाला. ही वार्ता परिसरात पसरताच या सापाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला सोडण्यात आले. मागील दोन वर्षापासून भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगेत नागनदीचे मलमुत्रयुक्त पाणी येत असल्यामुळे वैनगंगा नदी दूषित झाली आहे. याच नदीतून शहराला पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचा प्रवाह बदलविण्यात यावा या मागणीसाठी विविध संघटनांनी पुढाकार घेतला असला तरी नागनदीचे पाणी वैनगंगा नदीत येणे थांबविण्यात आलेले नाही. आधीच शहरातील पाईपलाईन जीर्ण असल्यामुळे ठिकठिकाणी दूषीत पाण्याचा पुरवठा होतच आहे. याशिवाय मागील तीन महिन्यांपासून या नदीत ‘इकार्निया’ या जलजन्य वनस्पतीने डोके वर काढल्यामुळे संपूर्ण नदीपात्र या वनस्पतीने आच्छादले आहे. ही वनस्पती दररोज कित्येक पटीने वाढत आहे. परंतु कमी होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. मागील रविवारी लाखनी येथील एका इसमाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. ईकार्निया ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांचा मृतदेह तीन दिवसांनंतर नदीपासून तीन कि.मी. अंतरावर आढळून आला.(जिल्हा प्रतिनिधी)आणखी किती सहन करायचे?भंडारा शहराला याच वैनगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. मागील दोन वर्षांपासून येथील नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सर्वांनाच दूषीत पाण्याचा पुरवठा होत असला तरी सधन नागरिकांनी आरओ लावून घेतले आहेत. यात गरीब बळी पडत आहे. गरिबांना दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. अशा स्थितीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही लोकप्रतिनिधी, नगर पालिका पदाधिकारी केवळ निवेदने देत आहेत. निवेदने देण्याची ही वेळ नाही. ही गंभीर समस्या निराकरणासाठी एकत्र येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे. नागरिकांच्या संयम सुटण्याचा अंत कुणी पाहू नये.