शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

नळातून निघाला साप !

By admin | Updated: May 31, 2016 00:37 IST

शीर्षक वाचून दचकलात ना! परंतु हे खरे आहे. शहरातील राजेंद्र वॉर्डातील शुक्रवारी परिसरातील रहिवाशी अनिल श्रावण गौरी यांच्या घरी ...

शुक्रवारी वॉर्डातील प्रकार : लोकप्रतिनिधी एकत्र का येत नाहीत?भंडारा : शीर्षक वाचून दचकलात ना! परंतु हे खरे आहे. शहरातील राजेंद्र वॉर्डातील शुक्रवारी परिसरातील रहिवाशी अनिल श्रावण गौरी यांच्या घरी सोमवारी सकाळी ७.२० वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा परेश हा पाणी भरत होता. यावेळी नळातून चक्क साप आल्याने त्याची भंबेरी उडाली. आजपर्यंत नारू आल्याचे ऐकिवात आहे. मात्र नळाच्या पाण्यातून चक्क साप निघाला. ही वार्ता परिसरात पसरताच या सापाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला सोडण्यात आले. मागील दोन वर्षापासून भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगेत नागनदीचे मलमुत्रयुक्त पाणी येत असल्यामुळे वैनगंगा नदी दूषित झाली आहे. याच नदीतून शहराला पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचा प्रवाह बदलविण्यात यावा या मागणीसाठी विविध संघटनांनी पुढाकार घेतला असला तरी नागनदीचे पाणी वैनगंगा नदीत येणे थांबविण्यात आलेले नाही. आधीच शहरातील पाईपलाईन जीर्ण असल्यामुळे ठिकठिकाणी दूषीत पाण्याचा पुरवठा होतच आहे. याशिवाय मागील तीन महिन्यांपासून या नदीत ‘इकार्निया’ या जलजन्य वनस्पतीने डोके वर काढल्यामुळे संपूर्ण नदीपात्र या वनस्पतीने आच्छादले आहे. ही वनस्पती दररोज कित्येक पटीने वाढत आहे. परंतु कमी होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. मागील रविवारी लाखनी येथील एका इसमाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. ईकार्निया ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांचा मृतदेह तीन दिवसांनंतर नदीपासून तीन कि.मी. अंतरावर आढळून आला.(जिल्हा प्रतिनिधी)आणखी किती सहन करायचे?भंडारा शहराला याच वैनगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. मागील दोन वर्षांपासून येथील नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सर्वांनाच दूषीत पाण्याचा पुरवठा होत असला तरी सधन नागरिकांनी आरओ लावून घेतले आहेत. यात गरीब बळी पडत आहे. गरिबांना दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. अशा स्थितीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही लोकप्रतिनिधी, नगर पालिका पदाधिकारी केवळ निवेदने देत आहेत. निवेदने देण्याची ही वेळ नाही. ही गंभीर समस्या निराकरणासाठी एकत्र येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे. नागरिकांच्या संयम सुटण्याचा अंत कुणी पाहू नये.