शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

आकोट येथील झोपडपट्टीवासीय भोगताहेत नरकयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

ग्रामपंचायतने झोपडपट्टीतील नागरिकांची अवस्था पाहून त्यांना नळ योजना, बोअरवेल, विद्युत पुरवठा त्यांच्या नागरी सुविधा पुर्ण केल्या. घरटॅक्स व ग्रामपंचायतीमधील दस्तऐवज बंद केल्याने त्यांना शासनाच्या योजनांना मुकावे लागत आहे. त्यांना अनेकदा झोपडपट्टी खाली करा, अशा आशयाची नोटीसाची दटावणी देवून झोपडपट्टी वासीयांवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे कुठे जावे, हा प्रश्न त्यांना निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपथदिवे बंद : नागरी सुविधापासुन वंचित, नाली, रस्ते, बोअरवेलची समस्या, घर टॅक्स घेणे केले बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यातील आकोट ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने आकोटटोली येथे खुल्या जागेत ३० कुटुंब १९९० पासुन झोपड्यामध्ये वास्तव करीत आहेत. ग्रामपंचायतने त्यांचे घर कर बंद केल्याने त्यांना शासनाच्या विविध योजना पासुन वंचित राहावे लागत आहे. झोपडपट्टी वसाहतीत नाली, रस्ते, दुर्लक्षीत असुन, बोरवेल, पथदिवे वर्षभरापासुन ग्रामपंचायतीच्या उदासिन धोरण व काही राजकाणाने झोपडपट्टीवासीय नरकयातना भोगत आहेत. त्यांना मालकी हक्काचे पट्टे दयावे, अशी मागणी पवनी तालुक्यातील आकोट येथे भुमिहिन गरजु कुटुंबात जागाची कमी अशांची १९९० पासुन ३० झोपडपट्टीयांचे वास्तव आहे.स्मशानभुमी शेजारी राहुन दहशतीत जीवन जगत आहेत. शासनाने त्यांचेवर दंडही ढोकले. त्यांनी पोटाला मारुन दंडही भरले. ग्रामपंचायतने झोपडपट्टीतील नागरिकांची अवस्था पाहून त्यांना नळ योजना, बोअरवेल, विद्युत पुरवठा त्यांच्या नागरी सुविधा पुर्ण केल्या. घरटॅक्स व ग्रामपंचायतीमधील दस्तऐवज बंद केल्याने त्यांना शासनाच्या योजनांना मुकावे लागत आहे. त्यांना अनेकदा झोपडपट्टी खाली करा, अशा आशयाची नोटीसाची दटावणी देवून झोपडपट्टी वासीयांवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे कुठे जावे, हा प्रश्न त्यांना निर्माण झाला आहे.झोपडपट्टी वसाहतीमध्ये माखलेले रस्ते, तुडुंब भरलेल्या नाल्या, बंद पथदिवे, नळ लाईन असुन त्यांना कनेक्शन न देणे, शौचालय बांधकामांना परवानगी न देणे अशा एक ना अनेक समस्यांचा डोंगर वसाहतीमध्ये आहेत. या समस्यांने पुर्णत: झोपडपट्टीवासीय हतास होऊन नरकयातनेत जीवन जगत आहेत. समस्येवर वार्डातील किंवा गावताील एकही पुढारी त्यांचा न्याय मागणीसाठी पुढाकार घेत नसल्याने त्या झोपडपट्टीवासीयांना ग्रामपंचायतने वाडीतच टाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्रस्त झोपडपट्टी वासीयांनी शासनाला निवेदन देवून दोषीवर कारवाही करण्याची मागणी सुनील सुर्यवंशी, दामोधर देशमुख, चैतराम क्षिरसागर, प्रभाकर गायधने, बबलु बिलवणे, मुखरु दहिवले, सोनु भुरे, आशा देवगिरकर, राजु बिलवणे, शकुंतला बिलवणे आदींनी केली आहे.शासनाच्या आदेशाला केराची टोपली२०११ पूर्वी करण्यात आलेले अतिक्रमण नियमाकुल करण्याचे आदेश जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले. मात्र आकोट ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाही केलेली नाही. त्यांना शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.कागदावर गाव हागणदारी मुक्तस्वच्छ भातर अभियानांतर्गत प्रत्येक गावात अतिक्रमण धारकांना शौचालयाचा लाभ देण्यात आले. मात्र आकोट ग्रामपंचातयीने झोपडपट्टी वसाहतीमध्ये एकालाही शौचालयाचा लाभ न देता गाव हागणदारी मुक्त असल्याचा कोरम पुर्ण केला. मात्र झोपडपट्टीवासीय आजमितीलाही उघड्यावरच शौचालयाला जात असल्याने त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा बेजबाबदार ग्रामपंचायतवर कडक कारवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.सदर जागा ही ढोरफोडी व खातखुड्याची जागा आहे. या जागेतुन शेतशिवारात जाणारा मार्ग आहे. ही जागा गाव विकासात्मक येणाºया बांधकामासाठी आरक्षीत ठेवली आहे. तसे झोपडपट्टीवासीयांनी ग्रामपंचायतला लेखी स्टॅम्प पेपरवर लिहूनही दिले आहे. जेव्हा ग्रामपंचायतला जागेची आवश्यकता असेल तेव्हा आम्ही जागा खाली करुन देऊ.- मनिषा गजभिये,सरपंच आकोट

टॅग्स :Rainपाऊसgram panchayatग्राम पंचायत