शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आकोट येथील झोपडपट्टीवासीय भोगताहेत नरकयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

ग्रामपंचायतने झोपडपट्टीतील नागरिकांची अवस्था पाहून त्यांना नळ योजना, बोअरवेल, विद्युत पुरवठा त्यांच्या नागरी सुविधा पुर्ण केल्या. घरटॅक्स व ग्रामपंचायतीमधील दस्तऐवज बंद केल्याने त्यांना शासनाच्या योजनांना मुकावे लागत आहे. त्यांना अनेकदा झोपडपट्टी खाली करा, अशा आशयाची नोटीसाची दटावणी देवून झोपडपट्टी वासीयांवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे कुठे जावे, हा प्रश्न त्यांना निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपथदिवे बंद : नागरी सुविधापासुन वंचित, नाली, रस्ते, बोअरवेलची समस्या, घर टॅक्स घेणे केले बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यातील आकोट ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने आकोटटोली येथे खुल्या जागेत ३० कुटुंब १९९० पासुन झोपड्यामध्ये वास्तव करीत आहेत. ग्रामपंचायतने त्यांचे घर कर बंद केल्याने त्यांना शासनाच्या विविध योजना पासुन वंचित राहावे लागत आहे. झोपडपट्टी वसाहतीत नाली, रस्ते, दुर्लक्षीत असुन, बोरवेल, पथदिवे वर्षभरापासुन ग्रामपंचायतीच्या उदासिन धोरण व काही राजकाणाने झोपडपट्टीवासीय नरकयातना भोगत आहेत. त्यांना मालकी हक्काचे पट्टे दयावे, अशी मागणी पवनी तालुक्यातील आकोट येथे भुमिहिन गरजु कुटुंबात जागाची कमी अशांची १९९० पासुन ३० झोपडपट्टीयांचे वास्तव आहे.स्मशानभुमी शेजारी राहुन दहशतीत जीवन जगत आहेत. शासनाने त्यांचेवर दंडही ढोकले. त्यांनी पोटाला मारुन दंडही भरले. ग्रामपंचायतने झोपडपट्टीतील नागरिकांची अवस्था पाहून त्यांना नळ योजना, बोअरवेल, विद्युत पुरवठा त्यांच्या नागरी सुविधा पुर्ण केल्या. घरटॅक्स व ग्रामपंचायतीमधील दस्तऐवज बंद केल्याने त्यांना शासनाच्या योजनांना मुकावे लागत आहे. त्यांना अनेकदा झोपडपट्टी खाली करा, अशा आशयाची नोटीसाची दटावणी देवून झोपडपट्टी वासीयांवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे कुठे जावे, हा प्रश्न त्यांना निर्माण झाला आहे.झोपडपट्टी वसाहतीमध्ये माखलेले रस्ते, तुडुंब भरलेल्या नाल्या, बंद पथदिवे, नळ लाईन असुन त्यांना कनेक्शन न देणे, शौचालय बांधकामांना परवानगी न देणे अशा एक ना अनेक समस्यांचा डोंगर वसाहतीमध्ये आहेत. या समस्यांने पुर्णत: झोपडपट्टीवासीय हतास होऊन नरकयातनेत जीवन जगत आहेत. समस्येवर वार्डातील किंवा गावताील एकही पुढारी त्यांचा न्याय मागणीसाठी पुढाकार घेत नसल्याने त्या झोपडपट्टीवासीयांना ग्रामपंचायतने वाडीतच टाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्रस्त झोपडपट्टी वासीयांनी शासनाला निवेदन देवून दोषीवर कारवाही करण्याची मागणी सुनील सुर्यवंशी, दामोधर देशमुख, चैतराम क्षिरसागर, प्रभाकर गायधने, बबलु बिलवणे, मुखरु दहिवले, सोनु भुरे, आशा देवगिरकर, राजु बिलवणे, शकुंतला बिलवणे आदींनी केली आहे.शासनाच्या आदेशाला केराची टोपली२०११ पूर्वी करण्यात आलेले अतिक्रमण नियमाकुल करण्याचे आदेश जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले. मात्र आकोट ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाही केलेली नाही. त्यांना शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.कागदावर गाव हागणदारी मुक्तस्वच्छ भातर अभियानांतर्गत प्रत्येक गावात अतिक्रमण धारकांना शौचालयाचा लाभ देण्यात आले. मात्र आकोट ग्रामपंचातयीने झोपडपट्टी वसाहतीमध्ये एकालाही शौचालयाचा लाभ न देता गाव हागणदारी मुक्त असल्याचा कोरम पुर्ण केला. मात्र झोपडपट्टीवासीय आजमितीलाही उघड्यावरच शौचालयाला जात असल्याने त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा बेजबाबदार ग्रामपंचायतवर कडक कारवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.सदर जागा ही ढोरफोडी व खातखुड्याची जागा आहे. या जागेतुन शेतशिवारात जाणारा मार्ग आहे. ही जागा गाव विकासात्मक येणाºया बांधकामासाठी आरक्षीत ठेवली आहे. तसे झोपडपट्टीवासीयांनी ग्रामपंचायतला लेखी स्टॅम्प पेपरवर लिहूनही दिले आहे. जेव्हा ग्रामपंचायतला जागेची आवश्यकता असेल तेव्हा आम्ही जागा खाली करुन देऊ.- मनिषा गजभिये,सरपंच आकोट

टॅग्स :Rainपाऊसgram panchayatग्राम पंचायत