शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मान्सूनपूर्व कामांची गती संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:55 IST

पावसाळा अगदी तोंडावर आला असला तरी अद्यापही मान्सूनपूर्व कामांना भंडारा नगरपरिषदेने गती दिली नाही. अपुऱ्या मनुष्यबळावर शहरात केवळ नाल्यांची सफाई केली जात आहे. नगरपरिषदेचे तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्यापही कागदावरच आहे.

ठळक मुद्देभंडारा नगरपरिषद : मनुष्य बळाचा अभाव, पावसाळा तोंडावर

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळा अगदी तोंडावर आला असला तरी अद्यापही मान्सूनपूर्व कामांना भंडारा नगरपरिषदेने गती दिली नाही. अपुऱ्या मनुष्यबळावर शहरात केवळ नाल्यांची सफाई केली जात आहे. नगरपरिषदेचे तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्यापही कागदावरच आहे. पाऊस कोसळल्यास नगरपरिषदेच्या मान्सूनपूर्व कामांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही.भंडारा ही 'ब' वर्ग नगरपरिषद असून १६.८३ वर्ग चौरस किलोमीटरमध्ये क्षेत्र विस्तारले आहे. शहरातील रस्त्यांची लांबी १३२.९६ किमी आहे. २०११ च्या जनगननेनुसार ९१ हजार ८२८ लोकसंख्या असून १६ प्रभाग आहेत. सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३०९.३ मीमी असून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी अगदी शहराजवळून वाहते. भंडारा शहरातील प्रत्येक रस्त्यांवर नगरपरिषदेच्या नाल्या आहेत. परंतु या नाल्या मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. प्लॉस्टिक बंदीनंतरही नाल्यामध्ये प्लॉस्टिकचा कचरा थांबला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी या नाल्यांची साफसफाई करणे अपेक्षित असते. नगरपरिषदेने गत आठ दिवसांपासून या कामाला प्रारंभ केला. परंतु एवढ्या मोठ्या शहरासाठी केवळ एक जेसीबी आणि ६० मजूर आहेत. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी शहरातील संपूर्ण नाल्यांची स्वच्छता होण्याची शक्यता नाही.शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचते. अनेकांच्या घरात पाणी शिरते. त्यात कस्तुरबा वॉर्ड झोपडपट्टी, ग्रामसेवक कॉलनी परिसर, संत कबीर वॉर्ड, नेहरू वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड, नवीन टाकळी, सागर तलावाचा खालचा परिसर, रूख्मिणीनगर, वैशालीनगर आदींचा समावेश आहे. तर अतिवृष्टीमुळे शहरातील नाला थोपण्याचे प्रकार घडतात. त्यात पाट्यादेव नाला, माथनी पुलिया, नागपूर नाका नाला, शिवनगरी नाला यांचा समावेश आहे. या ठिकाणी नगरपरिषदेने अद्यापही कायम स्वरूपी उपाययोजना केली नाही.भंडारा शहर वैनगंगा नदीच्या तिरावर आहे. अतिवृष्टी झाल्यास पाण्याची पातळी वाढते. मध्यप्रदेशातील धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. नदीतिरावरील अनेक घरात पाणी शिरते. अशा रेडझोनमध्ये नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे अपेक्षित आहे. परंतु वर्षानुवर्ष नागरिक जीव मुठीत घेवून राहतात.नगरपरिषदेने आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये विविध उपाय सुचविण्यात आले आहेत. परंतु त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात साथीचे रोग पसरू नये याची काळजी घेणे अपेक्षित आहे. तसेच पाणीपुरवठा ठप्प झाल्यास आपातकालीन व्यवस्थाही तयार ठेवण्याची गरज आहे.केवळ १२ इमारती धोकादायकभंडारा नगरपरिषदेच्या क्षेत्रात २० हजार २५१ घरे आहेत. यातील अनेक घरे सध्या धोकादायक स्थितीत आहे. परंतु नगरपरिषदेने केलेल्या सर्व्हेक्षणात केवळ १२ घरे धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. त्यात रविंद्रनाथ टॉगोर वॉर्ड, गांधी चौक, संताजी वॉर्ड, तिलक वॉर्ड, देशबंधू वॉर्ड, महात्मा फुले वॉर्ड, आझाद वॉर्डातील घरांचा समावेश आहे. या धोकादायक घरांचे निर्लेखन करणे गरजेचे आहे. तसेच आणखी धोकादायक इमारतीचा शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा इमारत कोसळून राहणार नाही याची भीती आहे.