शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

मान्सूनपूर्व कामांची गती संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:55 IST

पावसाळा अगदी तोंडावर आला असला तरी अद्यापही मान्सूनपूर्व कामांना भंडारा नगरपरिषदेने गती दिली नाही. अपुऱ्या मनुष्यबळावर शहरात केवळ नाल्यांची सफाई केली जात आहे. नगरपरिषदेचे तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्यापही कागदावरच आहे.

ठळक मुद्देभंडारा नगरपरिषद : मनुष्य बळाचा अभाव, पावसाळा तोंडावर

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळा अगदी तोंडावर आला असला तरी अद्यापही मान्सूनपूर्व कामांना भंडारा नगरपरिषदेने गती दिली नाही. अपुऱ्या मनुष्यबळावर शहरात केवळ नाल्यांची सफाई केली जात आहे. नगरपरिषदेचे तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्यापही कागदावरच आहे. पाऊस कोसळल्यास नगरपरिषदेच्या मान्सूनपूर्व कामांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही.भंडारा ही 'ब' वर्ग नगरपरिषद असून १६.८३ वर्ग चौरस किलोमीटरमध्ये क्षेत्र विस्तारले आहे. शहरातील रस्त्यांची लांबी १३२.९६ किमी आहे. २०११ च्या जनगननेनुसार ९१ हजार ८२८ लोकसंख्या असून १६ प्रभाग आहेत. सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३०९.३ मीमी असून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी अगदी शहराजवळून वाहते. भंडारा शहरातील प्रत्येक रस्त्यांवर नगरपरिषदेच्या नाल्या आहेत. परंतु या नाल्या मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. प्लॉस्टिक बंदीनंतरही नाल्यामध्ये प्लॉस्टिकचा कचरा थांबला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी या नाल्यांची साफसफाई करणे अपेक्षित असते. नगरपरिषदेने गत आठ दिवसांपासून या कामाला प्रारंभ केला. परंतु एवढ्या मोठ्या शहरासाठी केवळ एक जेसीबी आणि ६० मजूर आहेत. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी शहरातील संपूर्ण नाल्यांची स्वच्छता होण्याची शक्यता नाही.शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचते. अनेकांच्या घरात पाणी शिरते. त्यात कस्तुरबा वॉर्ड झोपडपट्टी, ग्रामसेवक कॉलनी परिसर, संत कबीर वॉर्ड, नेहरू वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड, नवीन टाकळी, सागर तलावाचा खालचा परिसर, रूख्मिणीनगर, वैशालीनगर आदींचा समावेश आहे. तर अतिवृष्टीमुळे शहरातील नाला थोपण्याचे प्रकार घडतात. त्यात पाट्यादेव नाला, माथनी पुलिया, नागपूर नाका नाला, शिवनगरी नाला यांचा समावेश आहे. या ठिकाणी नगरपरिषदेने अद्यापही कायम स्वरूपी उपाययोजना केली नाही.भंडारा शहर वैनगंगा नदीच्या तिरावर आहे. अतिवृष्टी झाल्यास पाण्याची पातळी वाढते. मध्यप्रदेशातील धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. नदीतिरावरील अनेक घरात पाणी शिरते. अशा रेडझोनमध्ये नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे अपेक्षित आहे. परंतु वर्षानुवर्ष नागरिक जीव मुठीत घेवून राहतात.नगरपरिषदेने आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये विविध उपाय सुचविण्यात आले आहेत. परंतु त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात साथीचे रोग पसरू नये याची काळजी घेणे अपेक्षित आहे. तसेच पाणीपुरवठा ठप्प झाल्यास आपातकालीन व्यवस्थाही तयार ठेवण्याची गरज आहे.केवळ १२ इमारती धोकादायकभंडारा नगरपरिषदेच्या क्षेत्रात २० हजार २५१ घरे आहेत. यातील अनेक घरे सध्या धोकादायक स्थितीत आहे. परंतु नगरपरिषदेने केलेल्या सर्व्हेक्षणात केवळ १२ घरे धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. त्यात रविंद्रनाथ टॉगोर वॉर्ड, गांधी चौक, संताजी वॉर्ड, तिलक वॉर्ड, देशबंधू वॉर्ड, महात्मा फुले वॉर्ड, आझाद वॉर्डातील घरांचा समावेश आहे. या धोकादायक घरांचे निर्लेखन करणे गरजेचे आहे. तसेच आणखी धोकादायक इमारतीचा शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा इमारत कोसळून राहणार नाही याची भीती आहे.