शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

मान्सूनपूर्व कामांची गती संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:55 IST

पावसाळा अगदी तोंडावर आला असला तरी अद्यापही मान्सूनपूर्व कामांना भंडारा नगरपरिषदेने गती दिली नाही. अपुऱ्या मनुष्यबळावर शहरात केवळ नाल्यांची सफाई केली जात आहे. नगरपरिषदेचे तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्यापही कागदावरच आहे.

ठळक मुद्देभंडारा नगरपरिषद : मनुष्य बळाचा अभाव, पावसाळा तोंडावर

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळा अगदी तोंडावर आला असला तरी अद्यापही मान्सूनपूर्व कामांना भंडारा नगरपरिषदेने गती दिली नाही. अपुऱ्या मनुष्यबळावर शहरात केवळ नाल्यांची सफाई केली जात आहे. नगरपरिषदेचे तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्यापही कागदावरच आहे. पाऊस कोसळल्यास नगरपरिषदेच्या मान्सूनपूर्व कामांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही.भंडारा ही 'ब' वर्ग नगरपरिषद असून १६.८३ वर्ग चौरस किलोमीटरमध्ये क्षेत्र विस्तारले आहे. शहरातील रस्त्यांची लांबी १३२.९६ किमी आहे. २०११ च्या जनगननेनुसार ९१ हजार ८२८ लोकसंख्या असून १६ प्रभाग आहेत. सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३०९.३ मीमी असून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी अगदी शहराजवळून वाहते. भंडारा शहरातील प्रत्येक रस्त्यांवर नगरपरिषदेच्या नाल्या आहेत. परंतु या नाल्या मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. प्लॉस्टिक बंदीनंतरही नाल्यामध्ये प्लॉस्टिकचा कचरा थांबला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी या नाल्यांची साफसफाई करणे अपेक्षित असते. नगरपरिषदेने गत आठ दिवसांपासून या कामाला प्रारंभ केला. परंतु एवढ्या मोठ्या शहरासाठी केवळ एक जेसीबी आणि ६० मजूर आहेत. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी शहरातील संपूर्ण नाल्यांची स्वच्छता होण्याची शक्यता नाही.शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचते. अनेकांच्या घरात पाणी शिरते. त्यात कस्तुरबा वॉर्ड झोपडपट्टी, ग्रामसेवक कॉलनी परिसर, संत कबीर वॉर्ड, नेहरू वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड, नवीन टाकळी, सागर तलावाचा खालचा परिसर, रूख्मिणीनगर, वैशालीनगर आदींचा समावेश आहे. तर अतिवृष्टीमुळे शहरातील नाला थोपण्याचे प्रकार घडतात. त्यात पाट्यादेव नाला, माथनी पुलिया, नागपूर नाका नाला, शिवनगरी नाला यांचा समावेश आहे. या ठिकाणी नगरपरिषदेने अद्यापही कायम स्वरूपी उपाययोजना केली नाही.भंडारा शहर वैनगंगा नदीच्या तिरावर आहे. अतिवृष्टी झाल्यास पाण्याची पातळी वाढते. मध्यप्रदेशातील धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. नदीतिरावरील अनेक घरात पाणी शिरते. अशा रेडझोनमध्ये नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे अपेक्षित आहे. परंतु वर्षानुवर्ष नागरिक जीव मुठीत घेवून राहतात.नगरपरिषदेने आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये विविध उपाय सुचविण्यात आले आहेत. परंतु त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात साथीचे रोग पसरू नये याची काळजी घेणे अपेक्षित आहे. तसेच पाणीपुरवठा ठप्प झाल्यास आपातकालीन व्यवस्थाही तयार ठेवण्याची गरज आहे.केवळ १२ इमारती धोकादायकभंडारा नगरपरिषदेच्या क्षेत्रात २० हजार २५१ घरे आहेत. यातील अनेक घरे सध्या धोकादायक स्थितीत आहे. परंतु नगरपरिषदेने केलेल्या सर्व्हेक्षणात केवळ १२ घरे धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. त्यात रविंद्रनाथ टॉगोर वॉर्ड, गांधी चौक, संताजी वॉर्ड, तिलक वॉर्ड, देशबंधू वॉर्ड, महात्मा फुले वॉर्ड, आझाद वॉर्डातील घरांचा समावेश आहे. या धोकादायक घरांचे निर्लेखन करणे गरजेचे आहे. तसेच आणखी धोकादायक इमारतीचा शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा इमारत कोसळून राहणार नाही याची भीती आहे.