शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास

By admin | Updated: September 23, 2016 00:41 IST

तीनपेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण विभागाद्वारे कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार आहे.

लोकमत शुभवर्तमान : एकाच दिवशी होणार गुणपत्रिकेचे वाटपराजू बांते  मोहाडीतीनपेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण विभागाद्वारे कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार आहे. शाळातील शिक्षक व लाभार्थी विद्यार्थ्यांना उद्बोधन करण्यात येणार आहे.कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर कौशल्य विकास हा एकमात्र माध्यम आहे. या माध्यमातून रोजगाराची निर्मिती करता येते. कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी तसेच ज्या विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी झाले त्या विषय शिक्षकांना व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई यांच्यामार्फत उद्बोधन करण्यात येणार आहे.दहावीची जुलै-आॅगस्टमध्ये परीक्षा झाली. त्याचा आॅनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. त्या परीक्षेचे मुळ गुणपत्रक २४ सप्टेंबर रोजी वाटप केंद्रावर वितरीत करण्यात येणार आहेत. मुळ गुणपत्रिका वाटप करण्यापूर्वी सकाळी ११ वाजता तीन तास लाभार्थी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास संबंधित मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी माध्यमिक शाळांतील लिपीक व सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचे एक वर्ग शिक्षक अथवा विषय शिक्षण यांना प्रशिक्षणासाठी यांनाही यायचे आहे.अतिशय महत्वपूर्ण प्रशिक्षण असल्याने शिक्षकांनी स्वत:चा स्मार्टफोन, इंटरनेट सुविधेसह प्रशिक्षणाला येणे आवश्यक आहे. प्रशिक्षण झाल्यानंतरच शाळांना गुणपत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात १९२ लाभार्थी विद्यार्थी व ८६ शाळेचे शिक्षक सहभागी होणार आहेत. बरीच मुले दहावीत नापास होतात. नापास झाल्यावर पुढे त्यांच्या शैक्षणिक विकासात अडथळा निर्माण होतो. त्यानंतर असे विद्यार्थी बेरोजगार होतात. त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन व उद्बोधन मिळत नाही. त्यामुळे त्यांची दिशा भरकळत जाते. अशा नापास विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात रोजगार मिळावे यासाठी त्यांच्या विकासाचे कौशल्य वाढविणे आवश्यक आहे. त्या हेतूने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर यांच्या वतीने भंडारा जिल्ह्यात एकाचवेळी २४ सप्टेंबरला गुणपत्रिका वाटप केंद्रावर कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.