शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, तुम्हीच शेती करा, नाही तर मोबदला द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:01 IST

विशाल रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्क अड्याळ : येथील शेतकऱ्यांची बियाण्यांच्या बाबतीत फसवणूक झाली. तक्रारीनंतर क्षेत्रीय चौकशी समितीने पाहणी ...

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त-बियाणे कंपनी बिनधास्त : चौकशी समितीच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : येथील शेतकऱ्यांची बियाण्यांच्या बाबतीत फसवणूक झाली. तक्रारीनंतर क्षेत्रीय चौकशी समितीने पाहणी केली. धान्य बियाणे कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी यांनी पत्रव्यवहार करून सुध्दा तब्बल चार तास उशिरा चौकशी स्थळावर उपस्थित झाले. यावेळी शेतकºयांनी समितीला एकच उत्तर दिले, ‘साहेब तुम्हीच ही शेती करा नाहीतर मोबदला तरी द्या’.आता पेरणी केलेल्या धान्य बियाणे परिपूर्ण उगवले नसल्याने शेतात परिपूर्ण रोवणी होऊ शकत नाही. आता वेळेवर भात रोप आणायचे कुठून? आता क्षेत्रीय समितीच्या अहवालाकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे. अड्याळ येथील राहुल खोब्रागडे व आनंदराव करंजेकर या शेतकºयांनी धान बिजायतमध्ये फसवणूक झाल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दाखल करताच तालुकास्तरीय चौकशी समिती शेतकºयांच्या शेतात दाखल झाली होती. यामध्ये तालुका कृषी अधिकारी ए. बी. घोगरे, कृषी अधिकारी संजय लांजेवार, वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. शामकुवर, यशोदा व आरके सिड्स कंपनी तथा कृषी केंद्र चालक यांचे प्रतिनिधी तसेच तक्रारकर्ते शेतकरी यावेळी उपस्थित होते. शेतीची यावेळी बारीक सारीक पाहणी करण्यात आली. चौकशी समितीचा अहवाल अद्याप शेतकºयांच्या हातात मिळालेला नाही. अहवाल लवकरच शेतकºयांना देण्यात येणार असल्याचे डॉ. जी. आर. शामकुवर, तालुका कृषी अधिकारी ए. बी. घोगरे यांनी सांगितले. माहितीनुसार ज्या कृषी केंद्रातून धान्य बियाणे घेतल्यानंतर या दोन शेतकºयांची फसगत झाली. अशीच फसगत अड्याळ गावातील अजून काही शेतकºयांची सुद्धा झाली होती. यात दोन शेतकºयांनी तक्रार दाखल केली तसेच शेतातील स्थिती वारंवार सांगून सुद्धा धान्य बियाणे कंपनीचे प्रतिनिधी शेतात आले नाही. कुठलीही माहिती या शेतकºयांना मिळाली नसल्याने पुन्हा अतिरिक्त बियाणे घातल्याची माहिती आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर बसतोच पण आता निसर्गसोबतच बोगस बियाण्यांचाही शेतकºयांना फटका बसत आहे.सरतेशेवटी शेतकºयांचीच परीक्षाशेतकºयांना वारंवार कृषी विभाग पेरणी संदर्भात मार्गदर्शन करतो की पेरणी घरातील धान्य बियाणांचा वापर करूनच करा पण दरवर्षी पेरणी चा हंगाम लागताच शेतकºयांची गर्दी बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रात पाहायला मिळते. काही दिवसातच कुठे बियाणे उगवले नाही तर कुठे बियाणे पुर्णत: उगवले नसल्याची तक्रार शेवटी कृषी कार्यालयात दाखल होऊन पंचनामासाठी चौकशी समिती अहवाल शेतकºयांना सादर करते, यामध्ये मात्र अंतत: शेतकरीच भरडला जातो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :agricultureशेती