शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

साहेब, घरकुल तेवढं द्या, जिदंगीभर नाव राहील तुमचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

लाखांदूर तालुक्यातील काेदामढी येथील नाथजाेगी समाजाच्या बेड्यावर शनिवारी जिल्हाधिकारी संदीप कदम पाेहाेचले. त्यावेळी तेथील महिलांनी समस्यांचा पाढा जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला. लाखांदूर तालुक्यात गत काही वर्षांपासून झाेपडीवजा घरात नाथजाेगी समाजाची कुटुंब राहतात. भीक मागून उदरनिर्वाह करणे, हाताला मिळेल ते मजुरी करणे अशी त्यांची दीनचर्या आहे.

ठळक मुद्देकाेदामढीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

दयाल भाेवतेलोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भीक मागून कुटुंबासह उदरनिर्वाह करताे. राहते घर नाही, ताडपत्रीच्या झाेपडीत कसेबसे राहताे. जमिनीचा पट्टा नाही म्हणून घरकुल मिळत नाही. घरकुल तेवढ द्या साहेब जिंदगीभर नाव राहील तुमचं अशी आर्त विनवणी नाथजाेगी समाजातील महिला जिल्हाधिकाऱ्यांना करीत हाेत्या. संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. लाखांदूर तालुक्यातील काेदामढी येथील नाथजाेगी समाजाच्या बेड्यावर शनिवारी जिल्हाधिकारी संदीप कदम पाेहाेचले. त्यावेळी तेथील महिलांनी समस्यांचा पाढा जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला. लाखांदूर तालुक्यात गत काही वर्षांपासून झाेपडीवजा घरात नाथजाेगी समाजाची कुटुंब राहतात. भीक मागून उदरनिर्वाह करणे, हाताला मिळेल ते मजुरी करणे अशी त्यांची दीनचर्या आहे. त्यांच्याकडे काेणतीही कागदपत्रे नसल्याने शासकीय याेजनांचा लाभ मिळत नाही. ही माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांना हाेताच शनिवारी थेट काेदामढी बेडा गाठला. यावेळी तेथे असलेल्या महिला व पुरुषांनी त्यांच्यापुढे आपल्या समस्या सांगितल्या. अनेकांकडे आधारकार्ड नाही, रेशनकार्डचा पत्ता नाही. संजय गांधी निराधार याेजनेसह श्रावणबाळ याेजनेचा लाभ मिळत नाही, असे सांगितले. यावेळी कार्तिक नामक तरुणाने जात प्रमाणपत्र उपलब्ध झाले असले तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याचे सांगत हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण काेदामढी गाव फिरून नाथजाेगी कुटुंबाच्या झाेपड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासाेबत साकाेलीच्या उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, तहसीलदार अखिल भारत मेश्राम, उमेदचे नरेंद्र कडबरैये, आदी कर्मचारी उपस्थित हाेते. 

लाेकांचे भविष्य सांगणारेच अंधारात नाथजाेगी समाजाचा परंपरागत व्यवसाय म्हणजे हस्तरेषा पाहून भविष्य सांगणे. वर्षानुवर्षे या गावाहून भटकत नागरिकांचे भविष्य सांगत त्यावर गुजरान करतात. परंतु, आधुनिक काळात त्यांच्या भविष्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे त्यांच्या हाताला काम मिळत नाही. लाेकांचे भविष्य सांगणाऱ्यांचेच भविष्य आता अंधकारमय झाल्याचे दिसत आहे. आता जिल्हाधिकारी या समाजासाठी काय करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाcollectorजिल्हाधिकारी