शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

साहेब, घरकुल तेवढं द्या, जिदंगीभर नाव राहील तुमचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

लाखांदूर तालुक्यातील काेदामढी येथील नाथजाेगी समाजाच्या बेड्यावर शनिवारी जिल्हाधिकारी संदीप कदम पाेहाेचले. त्यावेळी तेथील महिलांनी समस्यांचा पाढा जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला. लाखांदूर तालुक्यात गत काही वर्षांपासून झाेपडीवजा घरात नाथजाेगी समाजाची कुटुंब राहतात. भीक मागून उदरनिर्वाह करणे, हाताला मिळेल ते मजुरी करणे अशी त्यांची दीनचर्या आहे.

ठळक मुद्देकाेदामढीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

दयाल भाेवतेलोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भीक मागून कुटुंबासह उदरनिर्वाह करताे. राहते घर नाही, ताडपत्रीच्या झाेपडीत कसेबसे राहताे. जमिनीचा पट्टा नाही म्हणून घरकुल मिळत नाही. घरकुल तेवढ द्या साहेब जिंदगीभर नाव राहील तुमचं अशी आर्त विनवणी नाथजाेगी समाजातील महिला जिल्हाधिकाऱ्यांना करीत हाेत्या. संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. लाखांदूर तालुक्यातील काेदामढी येथील नाथजाेगी समाजाच्या बेड्यावर शनिवारी जिल्हाधिकारी संदीप कदम पाेहाेचले. त्यावेळी तेथील महिलांनी समस्यांचा पाढा जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला. लाखांदूर तालुक्यात गत काही वर्षांपासून झाेपडीवजा घरात नाथजाेगी समाजाची कुटुंब राहतात. भीक मागून उदरनिर्वाह करणे, हाताला मिळेल ते मजुरी करणे अशी त्यांची दीनचर्या आहे. त्यांच्याकडे काेणतीही कागदपत्रे नसल्याने शासकीय याेजनांचा लाभ मिळत नाही. ही माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांना हाेताच शनिवारी थेट काेदामढी बेडा गाठला. यावेळी तेथे असलेल्या महिला व पुरुषांनी त्यांच्यापुढे आपल्या समस्या सांगितल्या. अनेकांकडे आधारकार्ड नाही, रेशनकार्डचा पत्ता नाही. संजय गांधी निराधार याेजनेसह श्रावणबाळ याेजनेचा लाभ मिळत नाही, असे सांगितले. यावेळी कार्तिक नामक तरुणाने जात प्रमाणपत्र उपलब्ध झाले असले तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याचे सांगत हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण काेदामढी गाव फिरून नाथजाेगी कुटुंबाच्या झाेपड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासाेबत साकाेलीच्या उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, तहसीलदार अखिल भारत मेश्राम, उमेदचे नरेंद्र कडबरैये, आदी कर्मचारी उपस्थित हाेते. 

लाेकांचे भविष्य सांगणारेच अंधारात नाथजाेगी समाजाचा परंपरागत व्यवसाय म्हणजे हस्तरेषा पाहून भविष्य सांगणे. वर्षानुवर्षे या गावाहून भटकत नागरिकांचे भविष्य सांगत त्यावर गुजरान करतात. परंतु, आधुनिक काळात त्यांच्या भविष्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे त्यांच्या हाताला काम मिळत नाही. लाेकांचे भविष्य सांगणाऱ्यांचेच भविष्य आता अंधकारमय झाल्याचे दिसत आहे. आता जिल्हाधिकारी या समाजासाठी काय करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाcollectorजिल्हाधिकारी