शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, माझी हक्काची जमीन मला परत मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST

पालांदूर: एकिकडे शासन शेतक-यांसाठी विविध योजना राबवित आहे. कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु एक शेतकरी भूमिहीन होत ...

पालांदूर: एकिकडे शासन शेतक-यांसाठी विविध योजना राबवित आहे. कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु एक शेतकरी भूमिहीन होत असतांना त्याच्या मदतीला कुणी धावून येत नाही. अद्याप शासन/प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे हक्काच्या शेतजमीनीसाठी वृद्धाची फरफट आयुष्याच्या संध्याकाळी सुरू आहे. ही वास्तविक करून कहानी लाखनी तालुक्यातील किटाडी येथील चंद्रभान हेडाऊ यांची आहे.

भुमिधारी हक्काने वहिवाटीकरीता शासनाने शेतजमीनीचा पट्टा दिला. त्यावर चरितार्थ सुरू होता. मात्र निसर्गाचे वक्रदृष्टीने दुष्काळ ओढवला, बिकट परिस्थिती निर्माण झाली, हलाखीचे जिवन जगण्याची वेळ आली. मैत्रीस्तव गावातीलच पाटलाला क्षुल्लक रकमेत तात्पुरती जमिन कसायला दिली असता, बनावट कागदपत्रांच्या आधारे माझ्या शेतजमीनीवर कब्जा केल्याचे उपविभागीय अधिकारी साकोली, यांचे न्यायालयीन निर्णयाद्वारे स्पष्ट झाले. तलाठी यांनी लेखी पुराव्यानिशी सदर शेतजमीन मोकळी असल्याचे स्पष्ट केले असताना कारवाईच्या प्रतिक्षेत न्यायाची मागणी जिल्हाधिकारी संदीप कदम यांचेकडे केली आहे.

चंद्रभान मारोती हेडाऊ असे अन्यायग्रस्त शेतक-याचे नाव आहे. १९७५-७६ मध्ये सरकारी पट्ट्यातील भूमापन क्रमांक ३२४, मधील १०:११ हे. आर. क्षेत्रफळातील एक हेक्टर आर. काबिल कास्तकारी शासकीय वाटपात मिळाली. जमिनीचा सातबाराही नावावरती झाला. १९९२ पर्यंत त्या शेतजमीनीची मशागत करून, धानपिकाचे उत्पन्न घेऊन कुटुंबाचे चरितार्थ चालू होता. मात्र दुष्काळ ओढावून बिकट परिस्थिती निर्माण झाली. आता शेती कशी कसावी? कुटुंबाचे उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे गावातीलच गर्भश्रीमंत पाटलाकडून १९९३ ला ५,०००/- रुपयांत तात्पुरती कसायला दिली. मात्र पाटलाने १०० वर्षाच्या करारनाम्याच्या आधारे माझ्या शेतजमीनीवर कायमस्वरूपी कब्जा केला. कब्जा हटविण्यास सांगितले असता, अरेरावी करुन जिवानीशी मारण्याची धमकी दिली. प्रकरण पो. स्टे. पालांदूर मार्फत कलम १४५ जा. फौ. नुसार कारवाई होऊन, उपविभागीय अधिकारी साकोली, यांचे न्यायालयात न्यायप्रविष्ट होऊन, गैरअर्जदाराचे दस्तावेज अवैध असल्याचे पुढे आले. त्यामुळे एक हेक्टर आर. शेतजमीन २०१४ चे पारित आदेशाप्रमाणे २०१६ रोजी शासनजमा करण्यात आली. मात्र त्याचे अतिक्रमण सुरुच असल्याने तहसीलदार लाखनी यांचे कडे लेखी तक्रार केली. २ आगष्ट २०१९ रोजी सबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांचे समक्ष मोका पंचनामा केला. त्यात गैरअर्जदाराने खरीप हंगाम २०१९ चे धानपिक निघाल्यावर जमिनीवरुन कब्जा सोडणार असल्याचे लेखी बयानात कबूल केले होते. एकंदरीत बेकायदेशीर दस्तावेजाच्या आधारे २५ वर्षे मालकी हक्क गाजवून चक्क शासनाची दिशाभूल केली . तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी २०१७ रोजी गैरअर्जदाराचे अतिक्रमण हटवून सदर जमिन मुळ मालकाचे नावे करण्याचे पत्र तहसीलदार लाखनी यांना दिले होते.

प्रकरणात लक्ष पुरवित तत्कालीन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी २४ जून २०२० रोजी उपविभागीय अधिकारी साकोली, यांना दिलेल्या पत्रानुसार सदर काबिल कास्तकारी वरील २५ वर्षापासून असलेला कब्जा हटविले आहे. व एक हेक्टर शेतजमीन मोकळी असल्याचा लेखी पुरावा ५ आगष्ट २०२० तलाठी कार्यालयातून मुळ मालकाला प्राप्त झालेला आहे. मात्र आता पुन्हा मालकी हक्क मिळावा म्हणून जिल्हाधिकारी संदीप कदम यांना २२ डिसेंबर रोजी परस्पर भेटून, व्यथा सांगत, काबिल कास्तकारीचे सर्व दस्तऐवज पुरवित न्यायाची अपेक्षा केली आहे.

वृद्धापकाळात कुटुंबाचे चरितार्थ चालविण्यासाठी दुसरे काहीच साधन नाही. म्हातारपणात कष्ट सोसवत नाही. आता पोट कसे भरावे? १५ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिजवून आयुष्याच्या या सांजवेळी जीव मेटाकुटीस आला आहे. जिल्हाधिका-यांना दया येईल. व माझी काबिल कास्तकारी मलाच परत मिळेल, या आशेवर दिवस काढीत आहे. शासनजमा १.००हे.आर. शेतजमीनीचा जिवंतपणी कब्जा मिळावा. व म्हातारपणाची शिदोरी व्हावी.

चंद्रभान हेडाऊ

भुमिहीन शेतकरी, किटाडी