शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

साहेब ! किमान हक्काची रोजी तरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:11 IST

साहेब, राबराबराबूनही रोजी पडत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. कामानुसार दाम देण्याची शासनाची पद्धत आहे. मात्र किमान वेतन कायद्याचीही थट्टा होत आहे. साहेब, आम्हाला किमान हक्काची रोजी तरी द्या, असा आर्त टाहो रोजगार हमी योजनेच्या कामावर राबणारे मजूर करीत आहे.

ठळक मुद्देरोहयो मजुरांची मागणी : राबराब राबूनही रोजी पडत नसल्याची ओरड

तथागत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : साहेब, राबराबराबूनही रोजी पडत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. कामानुसार दाम देण्याची शासनाची पद्धत आहे. मात्र किमान वेतन कायद्याचीही थट्टा होत आहे. साहेब, आम्हाला किमान हक्काची रोजी तरी द्या, असा आर्त टाहो रोजगार हमी योजनेच्या कामावर राबणारे मजूर करीत आहे.राजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना कामानुसार दाम धोरण शासन राबवित आहे. किमान वेतन कायदा असताना रोहयो मजुरांना कामानुसार दाम हे धोरण का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने झालीत. शासनाकडे मागणी केली. परंतु कुणी लक्ष द्यायला तयार नाही. केंद्र व राज्य सरकारने मजुरांसाठी किमान वेतन निश्चित केले आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना किमान वेतन देण्याची सक्ती आहे, यासाठी कायदा आहे. परंतु शासनाने तयार केलेले कायदे प्रशासनाकडून पाळले जात नसल्याचे चित्र आहे.प्रत्येक नोंदणीकृत मजुराला किमान १०० दिवस काम दिले जाते. या विकास कामातून अनेक गावांचा चेहरा मोहरा बदलला आहे. गावातील तलाव, तलावाच्या पाळ, बुजलेले नाले, पांदण रस्ते, नाल्या यासारखे अनेक कामे रोहयोमधून केली गेली आहेत. कुशल, अकुशल कामगारांची नोंदणी करून कामे देण्यात येतात. ही कामे भर उन्हाळ्यातही सुरू राहतात. शेतीचा हंगाम सुरू झाल्यावर थोड्या प्रमाणात विश्रांती देण्यात येते. पण राबराबराबूनही मजुरांना तोकड्या मजुरीवर समाधान मानावे लागते. मजुरांना किमान १०० दिवस कामाची योजना आखून दिली. परंतु अन्यायकारक नियम लादण्यात आला आहे.रोहयोच्या कामावर पुरूषांच्या तुलनेत महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. शेतीचा हंगाम संपल्यानंतर हाताला काम नसले की मजूर रोहयोच्या कामावर जातात. परंतु याठिकाणी तोकडी मजुरी मिळत आहे. गत काही दशकांपासून हा प्रकार सुरू आहे.मेहनतीचे काम पण दाम कमीकुशल व अकुशल कामावर जाणाºया मजुरांना मिळणारे काम साधे नसते. माती खोदकामापासून अनेक अंग मेहनतीचे कामे करावी लागतात. मेहनतीच्या मानाने त्यांना मजुरी मात्र तोकडी मिळते. जेवढे काम केले जाईल ते मोजून मजुरी दिली जाते. त्यातही शासकीय दर एकदम कमी आहे.