शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

साहेब ! किमान हक्काची रोजी तरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:11 IST

साहेब, राबराबराबूनही रोजी पडत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. कामानुसार दाम देण्याची शासनाची पद्धत आहे. मात्र किमान वेतन कायद्याचीही थट्टा होत आहे. साहेब, आम्हाला किमान हक्काची रोजी तरी द्या, असा आर्त टाहो रोजगार हमी योजनेच्या कामावर राबणारे मजूर करीत आहे.

ठळक मुद्देरोहयो मजुरांची मागणी : राबराब राबूनही रोजी पडत नसल्याची ओरड

तथागत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : साहेब, राबराबराबूनही रोजी पडत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. कामानुसार दाम देण्याची शासनाची पद्धत आहे. मात्र किमान वेतन कायद्याचीही थट्टा होत आहे. साहेब, आम्हाला किमान हक्काची रोजी तरी द्या, असा आर्त टाहो रोजगार हमी योजनेच्या कामावर राबणारे मजूर करीत आहे.राजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना कामानुसार दाम धोरण शासन राबवित आहे. किमान वेतन कायदा असताना रोहयो मजुरांना कामानुसार दाम हे धोरण का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने झालीत. शासनाकडे मागणी केली. परंतु कुणी लक्ष द्यायला तयार नाही. केंद्र व राज्य सरकारने मजुरांसाठी किमान वेतन निश्चित केले आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना किमान वेतन देण्याची सक्ती आहे, यासाठी कायदा आहे. परंतु शासनाने तयार केलेले कायदे प्रशासनाकडून पाळले जात नसल्याचे चित्र आहे.प्रत्येक नोंदणीकृत मजुराला किमान १०० दिवस काम दिले जाते. या विकास कामातून अनेक गावांचा चेहरा मोहरा बदलला आहे. गावातील तलाव, तलावाच्या पाळ, बुजलेले नाले, पांदण रस्ते, नाल्या यासारखे अनेक कामे रोहयोमधून केली गेली आहेत. कुशल, अकुशल कामगारांची नोंदणी करून कामे देण्यात येतात. ही कामे भर उन्हाळ्यातही सुरू राहतात. शेतीचा हंगाम सुरू झाल्यावर थोड्या प्रमाणात विश्रांती देण्यात येते. पण राबराबराबूनही मजुरांना तोकड्या मजुरीवर समाधान मानावे लागते. मजुरांना किमान १०० दिवस कामाची योजना आखून दिली. परंतु अन्यायकारक नियम लादण्यात आला आहे.रोहयोच्या कामावर पुरूषांच्या तुलनेत महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. शेतीचा हंगाम संपल्यानंतर हाताला काम नसले की मजूर रोहयोच्या कामावर जातात. परंतु याठिकाणी तोकडी मजुरी मिळत आहे. गत काही दशकांपासून हा प्रकार सुरू आहे.मेहनतीचे काम पण दाम कमीकुशल व अकुशल कामावर जाणाºया मजुरांना मिळणारे काम साधे नसते. माती खोदकामापासून अनेक अंग मेहनतीचे कामे करावी लागतात. मेहनतीच्या मानाने त्यांना मजुरी मात्र तोकडी मिळते. जेवढे काम केले जाईल ते मोजून मजुरी दिली जाते. त्यातही शासकीय दर एकदम कमी आहे.