शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

साहेब, पुरात सर्वस्व वाहून गेले पण मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 07:00 IST

साहेब, तांदूळ-डाळ यासह जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, पण मदत मिळाली नाही, असा टाहो फोडणारे भंडारा शहरातील अनेक नागरिक आपली व्यथा सांगत होते.

ठळक मुद्दे आनंदनगर, कपिलनगरात शासकीय यंत्रणा पोहचलीच नाहीशेकडो कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार दिवसांपूर्वी आलेल्या महापुराने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्यही वाहून गेल्याने खायचे काय? असा बिकट प्रश्न अनेकांसमोर उपस्थित झाला. पुरानंतरच्या परिस्थितीची बिकट अवस्था काय? याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या भेटीत भीषण वास्तव समोर आले. जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरातील आनंदनगर, कपिलनगरात अद्यापही शासकीय यंत्रणा पोहोचली नाही. साहेब, तांदूळ-डाळ यासह जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, पण मदत मिळाली नाही, असा टाहो फोडणारे अनेक नागरिक आपली व्यथा सांगत होते.

भंडारा शहरातील एकेकाळची विरळ वस्ती तर आता घनदाट रहिवासी वस्ती म्हणून प्रभाग क्रमांक ९ मधील आनंदनगर व कपिलनगराची ओळख आहे. या दोन्ही नगरात जवळपास चारशेच्या जवळपास घरे आहेत. गत शनिवार व रविवारी वैनगंगा नदीला आलेल्या महापुराने या नगरालाही सोडले नाही. वैनगंगा नदीचे बॅकवॉटर नाल्यातून या दोन्ही नगरात शिरले. पाहता-पाहता अनेकांची घरे पाण्याखाली आली. घरातील साहित्य पाण्यात बुडाले. घरात इलेक्ट्रॉनिक साहित्य अक्षरश: पाण्यावर तरंगत होते. सहा ते सात फूट पाणी असलेल्या घरातून बाहेर कसे पडावे, याची भीती असलेल्या नागरिकांनी घराच्या स्लॅबवर राहणे पसंत केले.

माजी नगरसेवकाने नावेची व्यवस्था केली होती. उल्लेखनीय म्हणजे आनंदनगरातील काही उमद्या तरुणांनी साहस दाखवित अनेकांना मदतीचा हात दिला. शनिवारी चार फुटांपर्यंत पाणी साचले असताना रविवारी पाणी पातळीत वाढ होऊन सात फुटांपर्यंत पोहोचली. आनंदनगरातून गेलेल्या नाल्यामुळे दोन्ही नगरातील नागरिकांचा जीव संकटात सापडला. रात्र वैऱ्याची असली तरी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करून धीर देण्याचा प्रयत्न केला. हा धीर ऐन संकटाच्या काळी उमेद म्हणून कामी आला. मात्र शासकीय यंत्रणा पुराच्या वेळी बेपत्ता असल्याचे दिसून आले.

आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या परिसराची पाहणी केली, निर्देशही दिले, मात्र गाफील यंत्रणा कुणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. एकाला मदत तर दुसºयाला नाही, अशीही स्थिती बघावयास मिळाली. पूर ओसरून चार दिवसांचा कालावधी झाला पण साधे पंचनामेही झाले नाहीत. तलाठी इकडे फिरकलेच नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपालिका हद्दीत येत असलेल्या या प्रभागात नगरसेवकांनी रात्रीला मदत देऊ केली. काहींची जेवणाची सोय करण्यात आली. येथील स्थानिक दोन नागरिक देवदूत बनून नागरिकांच्या मदतीसाठी धावले.

अनेकांसाठी अन्न व पाण्याची सोय करून दिली. नगरसेवक आशू गोंडाणे यांनी नागरिकांसाठी जेवणाची सोय केली होती. मात्र पूर बाधितांची संख्या जास्त असल्याने व घरात पाण्याच्या शिरकाव जास्त प्रमाणात झाल्याने लोकांपर्यंत नागरिकांना पूर्णत: मदत मिळू शकली नाही. सद्य स्थितीत काही ठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पूर ओसरल्यानंतर शासकीय यंत्रणा इकडे फिरकायला तयार नसल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :floodपूर