शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

साहेब, पुरात सर्वस्व वाहून गेले पण मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 07:00 IST

साहेब, तांदूळ-डाळ यासह जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, पण मदत मिळाली नाही, असा टाहो फोडणारे भंडारा शहरातील अनेक नागरिक आपली व्यथा सांगत होते.

ठळक मुद्दे आनंदनगर, कपिलनगरात शासकीय यंत्रणा पोहचलीच नाहीशेकडो कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार दिवसांपूर्वी आलेल्या महापुराने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्यही वाहून गेल्याने खायचे काय? असा बिकट प्रश्न अनेकांसमोर उपस्थित झाला. पुरानंतरच्या परिस्थितीची बिकट अवस्था काय? याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या भेटीत भीषण वास्तव समोर आले. जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरातील आनंदनगर, कपिलनगरात अद्यापही शासकीय यंत्रणा पोहोचली नाही. साहेब, तांदूळ-डाळ यासह जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, पण मदत मिळाली नाही, असा टाहो फोडणारे अनेक नागरिक आपली व्यथा सांगत होते.

भंडारा शहरातील एकेकाळची विरळ वस्ती तर आता घनदाट रहिवासी वस्ती म्हणून प्रभाग क्रमांक ९ मधील आनंदनगर व कपिलनगराची ओळख आहे. या दोन्ही नगरात जवळपास चारशेच्या जवळपास घरे आहेत. गत शनिवार व रविवारी वैनगंगा नदीला आलेल्या महापुराने या नगरालाही सोडले नाही. वैनगंगा नदीचे बॅकवॉटर नाल्यातून या दोन्ही नगरात शिरले. पाहता-पाहता अनेकांची घरे पाण्याखाली आली. घरातील साहित्य पाण्यात बुडाले. घरात इलेक्ट्रॉनिक साहित्य अक्षरश: पाण्यावर तरंगत होते. सहा ते सात फूट पाणी असलेल्या घरातून बाहेर कसे पडावे, याची भीती असलेल्या नागरिकांनी घराच्या स्लॅबवर राहणे पसंत केले.

माजी नगरसेवकाने नावेची व्यवस्था केली होती. उल्लेखनीय म्हणजे आनंदनगरातील काही उमद्या तरुणांनी साहस दाखवित अनेकांना मदतीचा हात दिला. शनिवारी चार फुटांपर्यंत पाणी साचले असताना रविवारी पाणी पातळीत वाढ होऊन सात फुटांपर्यंत पोहोचली. आनंदनगरातून गेलेल्या नाल्यामुळे दोन्ही नगरातील नागरिकांचा जीव संकटात सापडला. रात्र वैऱ्याची असली तरी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करून धीर देण्याचा प्रयत्न केला. हा धीर ऐन संकटाच्या काळी उमेद म्हणून कामी आला. मात्र शासकीय यंत्रणा पुराच्या वेळी बेपत्ता असल्याचे दिसून आले.

आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या परिसराची पाहणी केली, निर्देशही दिले, मात्र गाफील यंत्रणा कुणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. एकाला मदत तर दुसºयाला नाही, अशीही स्थिती बघावयास मिळाली. पूर ओसरून चार दिवसांचा कालावधी झाला पण साधे पंचनामेही झाले नाहीत. तलाठी इकडे फिरकलेच नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपालिका हद्दीत येत असलेल्या या प्रभागात नगरसेवकांनी रात्रीला मदत देऊ केली. काहींची जेवणाची सोय करण्यात आली. येथील स्थानिक दोन नागरिक देवदूत बनून नागरिकांच्या मदतीसाठी धावले.

अनेकांसाठी अन्न व पाण्याची सोय करून दिली. नगरसेवक आशू गोंडाणे यांनी नागरिकांसाठी जेवणाची सोय केली होती. मात्र पूर बाधितांची संख्या जास्त असल्याने व घरात पाण्याच्या शिरकाव जास्त प्रमाणात झाल्याने लोकांपर्यंत नागरिकांना पूर्णत: मदत मिळू शकली नाही. सद्य स्थितीत काही ठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पूर ओसरल्यानंतर शासकीय यंत्रणा इकडे फिरकायला तयार नसल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :floodपूर