शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

खुनाचा तपास सीआयडीला सोपवा

By admin | Updated: August 6, 2015 01:43 IST

शहरातील म्हाडा कॉलनी व समृद्धीनगरात दरोडा टाकून महिलेचा खून व अन्य दोघांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सर्वपक्षीय नेत्यांची मागणी : शुक्र वारी काढणार निषेध मोर्चाभंडारा : शहरातील म्हाडा कॉलनी व समृद्धीनगरात दरोडा टाकून महिलेचा खून व अन्य दोघांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषन विभागाकडे सोपविण्यात यावा. या घटनेसंदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींचा जिल्हाधिकाऱ्यांनी अपमान केला. कायदा व सुव्यवस्थेबद्दल गंभीर नसलेल्या जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांविरुद्ध शुक्र वारला निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारला आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी बोलताना परमानंद मेश्राम म्हणाले, अमीर शेख व सचिन राऊत या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी यात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे. परंतु, त्या दिशेने पोलिसांनी तपास केलेला नाही. म्हाडा कॉलनीतील अश्विनी शिंदे या तरुणीवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी वेळीच तपासाला गती दिली असती प्रिती पटेल या महिलेचा मृत्यू झाला नसता. दोन्ही आरोपी हे अंमली पदार्थाच्या आहारी गेले होते. परंतु, घटना घडल्यापासून पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. हे अंमली पदार्थ कुठून येतात, त्याचा सूत्रधार कोण हे पोलिसांना ठाऊक असूनही अद्यापही कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या मुकसंमतीनेच हे व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोपी अमीर शेख हा अस्वस्थ झाल्यानंतर सिटी स्कॅनसाठी त्याला नागपूरला नेण्यात आले. त्याचे सिटी स्कॅन भंडाऱ्यातही होऊ शकले असते. परंतु, पोलिसांनी त्याला नागपूरला पाठविले. आरोपीच्या कुटुंबीयांना त्याला भेटण्याची मुभा दिली जात असून बाटलीबंद पाणी पुरविले जात आहे. आरोपींना मिळणाऱ्या अशा सुविधेवर नगराध्यक्ष बाबुराव बागडे, प्रेमसागर गणवीर, महेंद्र गडकरी, प्रशांत लांजेवार यांनी आक्षेप घेत पोलिसांच्या तपासावर टीका केली. या संवेदनशील घटनेसंबंधात सर्वपक्षीय नेते जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता जिल्हाधिकाऱ्यांनी हे माझ्या अधिकारात येत नसल्याचे म्हणने चुकीचे आहे.यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे उपस्थित होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासावर शंका असल्याने हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावे व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्र वारी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पत्रपरिषदेला किरीट पटेल, विकास मदनकर, सूर्यकांत इलमे, अ‍ॅड. श्रीकांत वैरागडे, नरेश गोंडाणे, सचिन घनमारे, अमृत पटेल, प्रभात मिश्रा, जितू पटेल, संजय सतदेवे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)