भंडाऱ्यात दुकाने बंद : निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणीतुमसर : कोटी कोटी मुजिंनन कराही अन्तराम काही आवत नाही, या मंगल भावनेचा साक्षात्कार संल्लेखना (संथारा) मध्ये होत असताना राजस्थान उच्च न्यायालयाने तिला आत्महत्या संबोधून संथारावर बंदी आणल्याने त्या निर्णयाच्या निषेधार्थ जैन धर्मिय बांधवांनी सोमवारला काळ्या फिती बांधून मौन रॅली काढली. संल्लेखना किंवा संथारा (देहत्याग) ही प्रथा पुरातन काळापासून सुरु असून जैन धर्मिय गुरु, मुनी हे सल्लेखना करून मोक्ष प्राप्त करतात. सल्लेखनेत उपवास, अल्पहार घेवून शरीराचा शुद्धीकरण करतात तो फक्त आपले अंतकरण सुधारण्याकरिता केला जातो. मरण्याकरिता नाही आणि म्हणूनच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संल्लेखनात करण्याची विनंती केल्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी देखील सल्लेखनाच्या नियमाचे पालन करून त्यांनी आत्मकल्याण केला होता. असे असताना राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने संथाराला आत्महत्या सांगून प्रथेवर बंदी आणल्याने संपूर्ण विश्वात या निर्णयाचा विरोध सुरु असून राष्ट्रपतींनी राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुर्नविचार करून प्रथेवरील बंदी हटवावी याकरिता तुमसरात काळ्या फिती बांधून शांतीच्या मार्गाने रॅली काढून तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना त्या निर्णयावर फेरविचार करण्यासंबंधी निवेदन सादर केले. यावेळी जैन धर्मियांचे प्रमुख धरमचंद जैन, महेंद्र जैन, संजय जैन, शैलेंद्र कारंजकर, अनमोल जैन, शैलेश जैन, आलोक जैन, अभिषेक जैन, सुदेश जैन, अरविंद जैन, अंकुश जैन, मदन भांडवलकर, शरद खापरे, प्रदीप जैन, सचिन जैन, अजित जैन, संदिप जैन, सुशिल जैन, रोहीत जैन, अंकुश जैन, नयन सुपाडिया, योगेश जोधानी व असंख्य जैन धर्मिय बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)व्यापारी प्रतिष्ठाने बंदभंडारा : संथारा या जैन धर्मियांच्या व्रतावर बंदी घातल्याच्या निषेधार्थ भंडारा येथे जैन समुदायाने आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून विरोध व्यक्त केला. यात २० दुकाने बंद ठेवण्यात आली होती. संथारा व्रतावर बंदी आणण्यात येवू नये, अशी एकमुखी मागणीही यावेळी समाजबांधवांनी केली.यावेळी धर्मराज सुराणा, अजित भुरावत, भरत भलगट, अमित भलगट, बंटी मेहर, बबन गांधी, राजकुमार बंब आदी समाज बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काळ्या फिती बांधून जैन धर्मियांचे मौन आंदोलन
By admin | Updated: August 25, 2015 00:46 IST