शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-वरठी महामार्गाची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:31 IST

भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा वळण, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते ...

भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा वळण, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते रेल्वेस्थानकापर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. यामुळे गंतव्य ठिकाणी वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे. वरठी येथे जिल्ह्याचे मुख्य रेल्वेस्टेशन व सनफ्लॅग स्टील कारखाना आहे. या मार्गावर दिवसभर रहदारी असते. हा राज्यमार्ग तुमसरवरून मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांना जोडतो. त्यामुळे वाहनांचा सतत राबता असतो. भंडारा-वरठीचे अंतर ११ किलोमीटर आहे, मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सदर अंतर पार करण्यास तासभर वेळ लागतो. भंडारा शहरातील खांबतलाव ते शास्त्री चौकादरम्यान रस्त्याची अवस्था पायी चालणाऱ्यांकरिताही तारेवरची कसरत करणारी आहे. तर शास्त्री चौक ते टाकळीर्यंत रस्त्यांची चाळणी झाली आहे. दरवर्षी या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु कामाची कोणतीही गुणवत्ता राखली जात नसल्याने येथील खड्ड्यांना जणू अमरत्व प्राप्त झाले आहे.

या डागडुजीच्या कामातून केवळ कंत्राटदाराचे पोट भरले जात असून संबंधित अधिकाऱ्यांचे खिसेही भरले जात आहे. तर प्रवाशांचे हाल कायम आहे. खड्डे बुजविण्याकरिता वापरण्यात आलेल्या चुरीने दररोज अनेक वाहनांचे टायर पंक्चर होताना दिसतात. या समस्येमुळे दुचाकीचालक त्रस्त झाले आहेत. बहुतेक ठिकाणी एका बाजूने रस्ता खराब असल्याने वाहन चालक चुकीच्या बाजूने वाहने चालवतात. त्यामुळे किरकोळ अपघातही घडले आहेत.

पावसामुळे खड्ड्यांचा अंदाजही येत नाही. या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने एखाद्याचा बळी जाण्यापूर्वी सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.