शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

भंडारा-वरठी महामार्गाची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:31 IST

भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा वळण, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते ...

भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा वळण, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते रेल्वेस्थानकापर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. यामुळे गंतव्य ठिकाणी वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे. वरठी येथे जिल्ह्याचे मुख्य रेल्वेस्टेशन व सनफ्लॅग स्टील कारखाना आहे. या मार्गावर दिवसभर रहदारी असते. हा राज्यमार्ग तुमसरवरून मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांना जोडतो. त्यामुळे वाहनांचा सतत राबता असतो. भंडारा-वरठीचे अंतर ११ किलोमीटर आहे, मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सदर अंतर पार करण्यास तासभर वेळ लागतो. भंडारा शहरातील खांबतलाव ते शास्त्री चौकादरम्यान रस्त्याची अवस्था पायी चालणाऱ्यांकरिताही तारेवरची कसरत करणारी आहे. तर शास्त्री चौक ते टाकळीर्यंत रस्त्यांची चाळणी झाली आहे. दरवर्षी या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु कामाची कोणतीही गुणवत्ता राखली जात नसल्याने येथील खड्ड्यांना जणू अमरत्व प्राप्त झाले आहे.

या डागडुजीच्या कामातून केवळ कंत्राटदाराचे पोट भरले जात असून संबंधित अधिकाऱ्यांचे खिसेही भरले जात आहे. तर प्रवाशांचे हाल कायम आहे. खड्डे बुजविण्याकरिता वापरण्यात आलेल्या चुरीने दररोज अनेक वाहनांचे टायर पंक्चर होताना दिसतात. या समस्येमुळे दुचाकीचालक त्रस्त झाले आहेत. बहुतेक ठिकाणी एका बाजूने रस्ता खराब असल्याने वाहन चालक चुकीच्या बाजूने वाहने चालवतात. त्यामुळे किरकोळ अपघातही घडले आहेत.

पावसामुळे खड्ड्यांचा अंदाजही येत नाही. या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने एखाद्याचा बळी जाण्यापूर्वी सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.