शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

सिल्ली येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST

भंडारा शहरापासून अवघ्या ६ किमीवर वसलेल्या सिल्ली गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, भर उन्हाळ्यात पाणी टंचाईत आणखी ...

भंडारा शहरापासून अवघ्या ६ किमीवर वसलेल्या सिल्ली गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, भर उन्हाळ्यात पाणी टंचाईत आणखी भर पडली आहे. सिल्ली गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली असल्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. सिल्ली येथील बसस्थानक परिसरात सिंटेक्स टँक लावून त्या टँकमधून नळफिटिंग करून नळाद्वारे गावकऱ्यांना पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र सद्यस्थितीत विहिरी व बोअरवेल आटल्याने सिल्ली येथील अर्धा गाव येथे पिण्याचे पाणी भरण्यासाठी एकाच ठिकाणी महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. पाणी मिळण्यासाठी महिलांचे दररोज भांडणतंटे होत असून, ग्रामपंचायतीचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. बोअरवेल असलेल्या परिसरात काही ठिकाणी खासगी विहिरी आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी महिलावर्गाने केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पाणी व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे.