शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

गल्लीबोळात शिकवणी वर्गांची "दुकानदारी"

By admin | Updated: May 27, 2017 00:26 IST

शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाचे पेव फुटले आहे. गुणवंतांच्या टक्केवारीचे भांडवल करीत शिकवणी संचालक आपले खिसे भरीत आहेत.

आर्थिक पिळवणूक : गुणवंतांच्या टक्केवारीचे भांडवललोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाचे पेव फुटले आहे. गुणवंतांच्या टक्केवारीचे भांडवल करीत शिकवणी संचालक आपले खिसे भरीत आहेत. लाखो रुपये कमावणाऱ्या या शिकवणी वर्गांकडे कुणाचेही लक्ष नसते. सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या जागेत विद्यार्थी शिकताना दिसतात.स्पर्धेच्या युगात टक्केवारीला महत्व आले आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला पैकीच्या पैकी गुण हवे असतात. त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. याच मानसिकतेचा फायदा शिकवणी वर्ग चालकांनी घेतला आहे. उमरखेड शहरातील गल्लीबोळात शिकवणीवर्ग सुरू झालेले आहेत. दहावी, बारावी आणि उच्च शिक्षणाच्या शिकवणीचे ठिक आहे परंतु शहरात नर्सरीपासूनच शिकवणी घेतली जात आहे.आपल्याकडे विद्यार्थी ओढण्यासाठी शिकवणी वर्ग चालकांमध्ये जाहिरातीचे युद्ध सुरू असते. लवकरच दहावीचा निकाल लागणार आहे. या निकालात गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो काढून त्यांचे फ्लेक्स शहरात लावले जातात. त्यावर विद्यार्थ्यांच्या फोटोसह शिक्षकांचाही फोटो असतो. आमच्या शिकवणी वर्गात गुणवंत विद्यार्थी कसे घडतात, याचे गुणगाण या जाहिरात फलकात दिसून येते. मात्र त्याच शिकवणीवगार्तील नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी मात्र शिकवणी संचालक झटकतात. आमचे विद्यार्थी असले तरी त्यांनी अभ्यास केला नसेल असे सांगतात. गुणवंतांचे श्रेय घ्यायचे आणि नापासांना दूर करायचे असा हा प्रकार आहे. शहरात असलेल्या शिकवणी वर्गात विद्यार्थी नियमित येतात तर दुसरीकडे सर्व सुविधा असलेल्या महाविद्यालयाला मात्र बुट्टी मारतात. पालकही शाळा बुडली तरी चालेले शिकवणी बुडवू नको असे सांगतात.शिकवणी वर्गात सुविधांचा अभावशहरातील शिकवणी वर्गात सुविधांचा अभाव आहे. एखाद्या कोंदट खोलीत बाकडे टाकून शिकवणीवर्ग भरविले जातात. एका-एका बाकड्यावर चार-चार विद्यार्थी बसलेले असतात. शाळेत नसेल एवढी गर्दी या वर्गात असते. अनेकदा तर शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकाचा आवाजही जात नाही. आता तर शिकवणी चालकांनी पॅकेजेस सुरू केले आहेत. विविध विषयांचे पॅकेज घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना गुणवंत करायचे, असा प्रकार सुरू असतो. विशेष म्हणजे लाखो रुपये कमावणाऱ्या या शिकवणी चालकांकडे आयकर विभागाचे लक्ष नसते.