शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

‘त्या’ दुकानदाराकडे मूळ डी-वन रजिस्टरच नाही

By admin | Updated: April 21, 2017 00:41 IST

मोरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराकडे मुळचा डी-वन रजिस्टर नाही. प्रमाणित न केलेला चौकशी

चौकशीला दिरंगाई : चौकशी अधिकारी आल्यापावली परतलेमोहाडी : मोरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराकडे मुळचा डी-वन रजिस्टर नाही. प्रमाणित न केलेला चौकशी अधिकाऱ्यांनी आनलेला डी-वन वर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. धान्य दुकानदारांनी बनावट डी-वन सादर करुन दिशाभूल केली आहे. तथापि, या चौकशी प्रकरणात होणारी दिरंगाईच खूप खोलवर अनियमिततेचा पाणी मूरत असल्याचे दिसून येत आहे.सरकारी स्वस्त धान दुकानदाराचे मागील सहा वर्षापासून बनावट नावाने अधिकचा धान्य साठा उचलून शासकीय कोष आपल्या घशात घातले. याचा बिंग गावकऱ्यांनी २७ मार्च रोजी तहसील कार्यालयात तहसीलदारांसमोर उघड केला. याआधी लेखी, तोंडी निवेदन देवूनही प्रशासनाने दखल घेतली नव्हती. त्यामुळे मोरगाववासियांनी तहसीलमध्ये ठाण मांडून एल्गार पुकारला होता. त्यानंतर त्याच दिवशी मौका पंचनामा करण्यात आला. धान्य साठा पोलीस पाटलांकडे हस्तातरीत करण्यात आला. कासवगतीने चौकशी होत राहीली. मोरगावचे दुकान मोहाडीला जोडण्यात आले. दुकानदारांनी दस्ताऐवज काही दिवसांनी तहसील कार्यालयात जमा केले. पण, मुळ डी-वन रजिष्टर जमा झालाच नाही. गावातील किती शिधापत्रिकाधारकांना अन्न-धान्य प्राप्त झाले. बनावट शिधापत्रिका किती याचा शोध घेण्यासाठी तलाठयांकडून चावडी वाचन ठेवण्यात आली. पण, मूळ डी-वन रजिष्टर नसल्याने चावडी वाचन होवू शकली नाही. बनावट डी-वन आणण्यात आला होता. त्यावर कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रति स्वाक्षरी नव्हती. गावकऱ्यांनी आधी मूळ डी-वन आना नंतरच पुढची चौकशी होईल अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतरही पुरवठा निरीक्षक सागर बावरे व कोतवाल चंदन नंदनवार चौकशीला गेले. पण त्यांना आल्या पावली परतावे लागले. चौकशी तीन दिवसात करु असे सांगणारे अधिकारी एक महिना लावत आहेत. गावकऱ्यांनी आयुक्ताची भेट घेतली. चौकशी संबधात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा पत्र आलाय. पण, अंतिम निकालापर्यंत चौकशी का जात नाही याबाबत गावकऱ्यांच्या शंकेला जागा मिळाली आहे. गावकऱ्यांनी २४ एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे ठरविले आहे. चौकशी अहवाल तयार करण्यात आला असून दुकानदाराला दोषी ठरविण्यात आल्याचे वृत्त आहे.(तालुका प्रतिनिधी)