शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धक्कादायक! रेती तस्करांनी पोखरले बावनथडी नदीपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:37 IST

तुमसर : आंतरराज्य बावनथडी नदीवरील आठ रेती घाट रेती तस्करांचे पोखरणे सुरू आहे. नदीपात्राच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची, ...

तुमसर : आंतरराज्य बावनथडी नदीवरील आठ रेती घाट रेती तस्करांचे पोखरणे सुरू आहे. नदीपात्राच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न पडत आहे. लाखोंचा महसूल तर बुडत आहे. सोबतच नदीच्या अस्तित्वाला व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटांचीही अशीच स्थिती आहे.

तुमसर तालुक्यात बावनथडी नदीचे पात्र सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर लांब असून, मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. यात चांदमारा, आष्टी, चिखली, देवनारा, लोभी, पाथरी या रेती घाटांचा समावेश आहे. यापैकी राज्य शासनाने एकाही रेती घाटाचा लिलाव दीड वर्षापासून केला नाही. परंतु, राजरोसपणे या रेती घटातून रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. संघटनात्मक पद्धतीने रेतीची सर्रास चोरी सुरू आहे. यापूर्वी या रेती घाटांचा लाखो रुपयांत रेती घाट लिलाव करण्यात आले होते.

मध्यप्रदेशातून उगम पावणाऱ्या बावनथडीचे पात्र विस्तीर्ण आहे. या नदीपात्रात उच्च गुणवत्तेची रेती उपलब्ध आहे. बेसुमार रेती उपशामुळे अनेक ठिकाणी झुडपी वनस्पती उगवली आहे. नदीपात्रात सर्वत्र खड्डेच खड्डे दृष्टीस पडतात. मध्यप्रदेश शासनाने या नदीपात्रातील अनेक घटांचे लिलाव केले आहे. महाराष्ट्र शासनाने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली नाही. परंतु, रेती चोरी मात्र सर्रास सुरू आहे. तालुक्याची सीमा नागपूर जिल्ह्याला लागून आहे. लेंडेझरी मार्गाने थेट हिवरा बाजार, रामटेक येथे हा रस्ता जातो. चोरीची रेती याच मार्गाने वाहतूक सुरू असल्याची माहिती आहे.

बॉक्स

कोतवाल, तलाठ्याकडे संरक्षणाची जबाबदारी

रेती चोरी होऊ नये त्यासाठी रेती घाट संरक्षणाची जबाबदारी स्थानिक कोतवाल व तलाठ्याकडे सोपविण्यात आली आहे. परंतु, कोरोना संक्रमण काळात कोतवाल व तलाठ्यांना विविध कामे करायची आहेत. एका तलाठ्याकडे दोन ते तीन गावांचा प्रभार आहे. त्यातच त्यांना माहिती गोळा करणे, त्याची ऑनलाइन माहिती शासनाला पाठविणे आदी कामे करावी लागतात. त्यामुळे रेती घाटांचे संरक्षण करण्याकरिता त्यांनाही मर्यादा येथे येत आहे.

बाॅक्स

पर्यावरणाची हानी

रेती घाट लिलाव करत असताना खनिकर्म विभाग व महसूल विभाग पर्यावरणाची हानी होणार नाही, या दृष्टिकोनातून अहवाल मागवून त्यानंतर लिलाव करण्यात येतो. नियमानुसार पर्यावरणाची हानी होऊ नये, हा येथे नियम आहे. दुसरीकडे रेती तस्करांचे मात्र येथे राजरोसपणे संपूर्ण नदीपात्र पोखरणे सर्रास सुरूच आहे. यामुळे पर्यावरणाची येथे मोठी हानी होत आहे. बावनथडी नदीवर धरण बांधले असल्याने वर्षातून किमान नऊ महिने ही नदी कोरडी राहते. त्या कारणामुळे रेती तस्करांचे येथे चांगभले होते.