शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

शिवनी होणार जिल्ह्यातील पहिले ‘कॅशलेस’ गाव

By admin | Updated: December 29, 2016 01:59 IST

भ्रष्टाचाराला थोपविण्यासाठी सरकारची वाटचाल सुरू आहे. या प्रक्रियेत आता ‘कॅशलेस’ व्यवहारावर भर देण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली निवड : २६ जानेवारीपासून ग्रामस्थ करणार कार्डवर व्यवहार भंडारा : भ्रष्टाचाराला थोपविण्यासाठी सरकारची वाटचाल सुरू आहे. या प्रक्रियेत आता ‘कॅशलेस’ व्यवहारावर भर देण्यात आले आहे. या अुनशंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारला लाखनी तालुक्यातील शिवनी (मोगरा) येथे जनजागृती मेळावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पहिले ‘कॅशलेस’ गाव म्हणून शिवनीची निवड केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या धनाच्या विरोधात मोहीम उघडत ५०० व १००० रूपयांच्या नोटांवर बंदी आणली. त्यानंतर सरकारने ‘कॅशलेस’ व्यवहारावर भर दिला आहे. ठाणे जिल्ह्यातील धसई हे गाव देशातील पहिले ‘कॅशलेस’ गाव ठरले आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शासनाने ‘कॅशलेस’साठी पुढाकार घेतला असल्याने राज्यभरात यासाठी अधिकारीही सरसावले आहेत. मंगळवारला जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी शिवनी (मोगरा) भेट दिली. औचित्य होते, जनजागृती मेळाव्याचे. यावेळी त्यांनी सुरूवातीला गावात करण्यात आलेल्या शासकीय योजनांच्या कामांची पाहणी करून ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी गावाचा केलेल्या कायापालटची स्तुती केली. यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे, सरपंच माया कुथे, खंड विकास अधिकारी के. के. ब्राम्हणकर, सहायक खंड विकास अधिकारी मिलींद बडगे, विस्तार अधिकारी (पंचायत) धनश्याम चकोले, पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे, सचिव जयंत गडपायले उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करून त्यांना ‘कॅशलेस’ व्यवहाराची उपयुक्तता व फायदे सांगितले. प्रगत शिवनी येथील नागरिक उपजिवेसाठी दैनंदिनी रोखीने व्यवहार करतात. ते यानंतर डेबीट कॉर्ड व स्वाईप मशिनच्या माध्यमातून करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून ग्रामस्थांना विचारना केली असता त्यांनीही ‘कॅशलेस’ व्यवहार करण्याला होकार दिला. त्यामुळे हा व्यवहार होण्याच्या दृष्टिने आता ग्रामस्थांना यंत्रणांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २६ जानेवारीपर्यंत ‘कॅशलेस’ प्रणाली गावात लागावी यासाठी आता शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. जनजागृगती कार्यक्रमाला गट संसाधन केंद्राच्या नमिशा ब्राम्हणकर, ग्रामपंचायत सदस्य जीवनदास नागलवाडे, भिमराव खांडेकर, तलाठी डांबरे, पोलीस पाटील रोहिदास कुनभरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी) गावाची निवड करण्याचे कारण शासकीय योजनांची अंमलबजावणी शिवनी ग्रामपंचायत करीत आहे. यातून ग्रामस्थांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामसेवक यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी पुढाकार घेतात. या ग्रामपंचायतीला शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी चौधरी यांनी शिवनीची ‘कॅशलेस’ गावासाठी निवड केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी गावात फेरफटका मारून बंदिस्त गटारे, पिण्याच्या पाण्याच्या सोयी, शौचालय बांधकाम, गोबरगॅसवर चालणारे दिव्यांची पाहणी करून मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांकडील एटीएम कॉर्डची माहिती घेवून लागणाऱ्या सुविधेबाबत आढावा घेण्यात आला.