शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भातखाचऱ्यांमध्ये शिंगाडा पीक

By admin | Updated: May 21, 2015 00:46 IST

जिल्ह्यातील तलावांमध्ये अतिशय पौष्टिक मूल्य असलेले शिंगाडा पीक घेण्यात येते.

भंडारा : जिल्ह्यातील तलावांमध्ये अतिशय पौष्टिक मूल्य असलेले शिंगाडा पीक घेण्यात येते. मात्र या पारंपारिक पद्धतीला फाटा देत पवनी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी भात खाचऱ्यामध्ये शिंगाडा लागवड करून पडिक राहणाऱ्या भात खाचऱ्यातून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे.भंडारा हा तलावांचा जिल्हा आहे. येथे तलावांमध्ये मासे उत्पादनासोबतच येथील शेतकरी शिंगाड्याचे उत्पादनही घेतात. पवनी तालुक्यात ३४ हजार ६४२ हेक्टर एकूण पीक लागवडीखाील क्षेत्रापैकी ३८.२४ हेक्टर क्षेत्रावर शिंगाडा पीक घेण्यात येते. तालुक्यातील ढिवर-कहार जमातीचे सुमारे २५-३० शेतकरी शिंगाडा लागवड करतात. मात्र शास्त्रशुद्ध माहिती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावी त्यांचे उत्पादन कमी होत असे.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत २०१३-१४ मध्ये पवनी येथे शिंगाडा शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेतकऱ्यांना शिंगाडा पिक लागवडीसंदर्भात शास्त्रशुद्ध तांत्रिक माहिती देण्यात आली. सोबतच भातखाचऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी शिंगाडा पिक घ्यावे यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. कृषि विभागाने २०१४-१५ मध्ये पायाभूत सर्वेक्षण करून शिंगाडा लागवडीसाठी शेतकऱ्यांची निवड केली. यामध्ये कोटनापालार येथील पुंडलीक घ्यार, सुरज वाघमारे, सुदाम वाघधरे, भेंडाळा येथील रमेश मेंढे, विलास पारधी, रनाळा येथील हरिभाऊ घ्यार, रमेश दुधपचारे, हरीचंद्र दुधपचारे, संतोष दुधपचारे, शिरसाळा येथील श्रावण कांबळे, भोजापूर येथील रामाजी शेनमारे आणि पवनी येथील वंगणू शिवरकर या बारा शेतकऱ्यांच्या शेतावर शिंगाडा लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतावर ६ शेतीशाळेच्या माध्यमातून त्यांना लागवड पद्धती, काढणी, तोडणी, तणाचे नियंत्रण, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व किडीची ओळख, बाजार व्यवस्थापन इत्यादी माहिती देण्यात आली. धानाच्या लागवडीसाठी खाचरे करण्यात येतात. शेतातील उताराच्या भागातील खाचऱ्यांमध्ये जास्त पाणी जमा होते. त्यात धानाचे पिक बरोबर येत नसल्यामुळे तेवढा भाग पडीत राहतो. याच पडीत व उतारामधील भातखाचऱ्यांचा उपयोग शिंगाडा पिकासाठी करण्यात आला. यातून शेतकऱ्यांना ३५ क्विंटल एकरी उत्पादन मिळाले असून ४० हजार रूपये नफा मिळाला आहे. या बारा शेतकऱ्यांनी शिंगाड्याचे उत्पादन घेवून इतर शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे. पुढील दोन वर्षात शिंगाडा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न कृषी विभाग व आत्मा मार्फत करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)