शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धानपीक उत्पादक दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: October 25, 2014 22:35 IST

मागील दोन तीन वर्षात शेतकरी धानपिकाला त्रस्त झाले आहेत. दरवर्षी येणारे नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यावर्षी कोरडवाहू शेतकऱ्यांना चौरास भागात पावसाने पाठ फिरवल्याने

कोंढा (कोसरा) : मागील दोन तीन वर्षात शेतकरी धानपिकाला त्रस्त झाले आहेत. दरवर्षी येणारे नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यावर्षी कोरडवाहू शेतकऱ्यांना चौरास भागात पावसाने पाठ फिरवल्याने धानाची उतारी झपाट्याने कमी झाली आहे. अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांना तर धानाचे वाळलेले रोप कापण्याची पाळी आल्याने दिवाळीपुर्वी शेतकरी आर्थिक चिंतेत आहे.कोंढा परिसरातील चौरास भागात धान हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. १०० दिवसाचे धानाचे पिक दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या हातात येते. पाणी पाऊस ठिक असल्यास हलक्याप्रतीच्या धानपिकाचे चूर्णा करून शेतकऱ्याजवळ दिवाळीसाठी पैसा येत असे. यावर्षी पावसाचे प्रमाण परिसरात अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना दुबार तिबार धानाचे रोप लावावे लागले. अशातच पावसाने आॅक्टोंबर महिन्यात पाठ फिरवल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांचे पिक गेले. ज्यांचे धानपीक तलाव, कालव्याचे पाणी घेवून पीकले ते देखिल पूर्णत: निघण्यास उशिर आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा विचारदेखील प्रशासनाने केला नाही. त्यामुळे शेतकरी सध्यातरी चिंतेत सापडला आहे. धान शेतीचा खर्च ऐकरी जवळपास २० हजार रूपये आला आहे. पण हे रूपयेदेखील कोरडवाहू शेतकऱ्यांची निघण्याची चिन्हे दिसत नाही. कोंढा, कोसरा, चुऱ्हाड, सोमनाळा, नवेगाव, सोनेगाव, विरली खं. व इतर गावच्या कोरडवाहू शेतकरी संकटात सापडला आहे. (वार्ताहर)