शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ वनजमीन वनविकास महामंडळाला मिळू देणार नाही

By admin | Updated: April 8, 2015 00:44 IST

वनविभागाच्या अखत्यारीत असलेली २० हजार हेक्टर वनजमिन वनविकास महामंडळाला देण्यात येऊ नये. ..

प्रकरण जागा हस्तांतरणाचे : भोंडेकरांचा आंदोलनाचा इशाराभंडारा : वनविभागाच्या अखत्यारीत असलेली २० हजार हेक्टर वनजमिन वनविकास महामंडळाला देण्यात येऊ नये. ही जमिन महामंडळाला दिल्यास जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होऊन वृक्षतोड वाढेल, परिणामी पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होईल, याविरुद्ध आंदोलन पेटविण्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिला.यावेळी भोंडेकर म्हणाले, कोका अभयारण्य तथा विविध उपक्र मासाठी वन विभागाने वनविकास महामंडळाची जागा अधिग्रहीत केली. त्यामुळे आता वनविकास महामंडळाचे क्षेत्र भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील वन विभागाचे २० हजार हेक्टर क्षेत्र वनविकास महामंडळाला देणे आहे. याबाबत सन २०१४ मध्ये शासननिर्णयसुद्धा निर्गमित झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरूवात झाली असतानाच माजी आ. भोंडेकर यांनी यावर आक्षेप घेतला आहे.भंडारा जिल्ह्यात १२०३५५.४५२ हेक्टरवर एकूण वनक्षेत्र आहे. त्यापैकी वन विभागाकडे ८८१८६.३८५ हेक्टर, मोहघाटा रिसर्च सेंटरकडे ४७८.३०० हेक्टर, वन्यजीव विभागाकडे २१८३६.८२७ हेक्टर तर महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे ९ हजार ८५३ हेक्टर क्षेत्र आहे. यापुर्वी वनविकास महामंडळाकडे मोठे वनक्षेत्र होते. परंतु, भंडारा जिल्ह्यात अलिकडेच निर्माण झालेले कोका अभयारण्य याशिवाय विविध उपक्र मासाठी महामंडळाची जागा वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली. त्यामुळे या वनक्षेत्राची नुकसानभरपाई म्हणून सुमारे ६१ हजार क्षेत्र वनविभागाकडून महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. राज्य शासनाने यावर निर्णय देत कोल्हापूर वनवृत्तातील सुमारे तीन हजार हेक्टर वनक्षेत्र, नागपूर वनवृत्तातील २० हजार हेक्टर वनक्षेत्र गडचिरोली वनवृत्तातील ११ हजार हेक्टर क्षेत्र तर यवतमाळ जिल्ह्यातील ३ हजार ८०० हेक्टर वनक्षेत्र महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला. यात सर्वाधिक क्षेत्र नागपूर वनवृत्तांतर्गत भंडारा वनविभागातील २० हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे एवढे मोठे क्षेत्र वनविकास महामंडळाला दिल्यास जिल्ह्यात पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण होणार असून त्याचा परिणाम जंगलातील प्राणी सोबतच सर्वसामान्य जनतेवर पडणार आहे.या निर्णयाला विरोध दर्शविला असून या निर्णयाची अंमलबजावणी थांबविण्यात यावी, याबाबत निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांना देण्यात येणार असल्याचेही भोंडेकर यांनी सांगितले. त्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी सुरूच राहीली तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)अच्छे दिन नव्हे बुरे दिन!४तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात विरोधी बाकावर असलेल्या भाजपने धानाला ३,५०० रुपये हमी भावाची मागणी केली होती. आता सत्तेवर येताच मागील सरकारच्या काळापेक्षाही कमी भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. ईतके वाईट दिवस आल्याचे त्यांनी सांगितले. गव्हाची खरेदी फूड कारपोरेशनने बंद केली आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढे आले पाहिजे. शेतकऱ्यांवर संकट असताना भूमिपूत्र गेले कुठे? असा सवाल करुन शिवसेना हा गोरगरीबांचा पक्ष असल्यामुळे त्यांच्या समस्यांना वाचा फोडणे, हे कर्तव्य आपले समजतो, असेही नरेंद्र भोंडेकर यांनी स्पष्ट केले.