शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

शंकरपटातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत होते लाखोंची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:39 IST

Bhandara : कृषी संस्कृतीशी जुळली नाळ

लोकमत न्यूज नेटवर्क जेवनाळा : दिवाळी पश्चात शेतीचा हंगाम आटोपल्यानंतर ग्रामीण भागात कृषी संस्कृतीशी नाळ जपलेला शेतकरी बांधवांचा अत्यंत जिव्हाळ्याचा व आनंदाचा खेळ म्हणजेच बैलांचा 'शंकरपट' होय. साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गावोगावी पटांचे आयोजन करण्यात येते. यातून मनोरंजनासोबतच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत लाखोंची उलाढाल होत असून, अनेकांना रोजगारसुद्धा मिळत असतो.

शंकरपट हा केवळ खेळ नसून ती ग्रामीण भागाची परंपरासुद्धा आहे. बैलगाडी शर्यतीला जवळपास ३०० वर्षांची परंपरा आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जानेवारी महिन्यात शंकरपटांचे आयोजन करण्यात येते डिसेंबर महिना आटोपताच पटाच्या दानी तयार करण्याचे काम केले जाते. जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये पूर्वीपासूनच पटाच्या दानींसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे. तसेच महिन्याच्या तारखासुद्धा पटासाठी फार पूर्वीपासूनच राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्या गावात पटाचे आयोजन केले जाते त्या गावातील लोकांमध्ये जणू उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळते. गावाशेजारील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना पट पाहण्यासाठी सुट्टी देण्यात येते. तसेच पटाच्या गावी व परिसरातील घरोघरी पाहुण्यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. शंकरपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळते. पट कमीतकमी दोन दिवसांचा तर अधिकाधिक तीन ते चार दिवसांचासुद्धा असतो. त्यामुळे या काळात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, कपडे, सौंदर्यप्रसाधने, चहा पाणी, खाद्यपदार्थ, खेळणी, मनोरंजन साहित्याची दुकाने लागून त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. रात्री नाटक, कीर्तन, गोंधळ, लावणी, कव्वाली यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असून, ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण दिसून येते. 

थरार व आनंदसाधारणपणे पहिल्या दिवशी एक एक जोडी सोडून त्यांचे सेकंद लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी समान सेकंद असणाऱ्या जोडीची शर्यंत लावली जाते. या शर्यतीचा आनंद व थरार पाहून अंगावर काटे येतात.

कारागीर, सुतारांना सुगीचे दिवससद्यःस्थितीत शेतीच्या कामात बैलांचा वापर फार कमी झालेला असला तरी शंकरपटामुळे देशी गाय व बैल पाळणे यात वाढ होत आहे. पटांच्या आयोजनामुळे छकडा व इतर साहित्य बनविण्यासाठी शेतकऱ्यांची सुताराकडे गर्दी दिसून येत असून, कारागिरांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा