शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठ्याचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:31 IST

सर्वांना शुध्द पाणी मिळावे या हेतुने भारत निर्माण योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. यात कोरंभी येथे पाण्याचे स्त्रोत तर बेला येथे जलशुध्दीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र मागील पंधरा दिवसापासुन आचारसंहितेच्या विळख्यात येथील दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याने शुध्द पाण्यासाठी महिलांची भटकंती होत आहे.

ठळक मुद्देदहा वर्षांची पूर्ण खर्चित योजना रखडली : नवीन पाणीपुरवठा योजना तिसऱ्यांदा मंजूर

प्रल्हाद हुमणे।लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : सर्वांना शुध्द पाणी मिळावे या हेतुने भारत निर्माण योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. यात कोरंभी येथे पाण्याचे स्त्रोत तर बेला येथे जलशुध्दीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र मागील पंधरा दिवसापासुन आचारसंहितेच्या विळख्यात येथील दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याने शुध्द पाण्यासाठी महिलांची भटकंती होत आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भंडारा अंतर्गत शहापुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाद्वारे बेला, भोजापूर, उमरी-फुलमोगरा, शहापुर, गोपीवाडा, परसोडी, ठाणा येथील गावांना बेला येथील जलशुध्दीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा सुमारे बाराशे नळ धारकांना केला जातो. ही पाणीपुरवठा योजना पुर्वी म्हणजे चारवर्षापुर्वी जिल्हा परिषद भंडाराकडे देखभाल दुरुस्तीचे कामे होती.यावेळी सोळा ते सतरा लाख रुपये वार्षिक खर्च हिशेब होता. आता बेला ग्रामपंचायतीकडे देखभाल दुरुस्तीचे कामे दिली. तेही फक्त तेरा ते चौदा लाख रुपयाचा. या तफावतीचे नेमके कोणते कारण अद्याप गुलदस्त्यात दडलेले आहे. दुसरी बाब म्हणजे बाब अत्यंत जिव्हाळ्याचा दैनिक गरजेचा विषय. मात्र मागील पंधरा दिवसापासून शहापूर येथील राष्टÑीय महामार्ग दरम्यान मुख्य जलवाहिनी नादुरुस्त अवस्थेत तसीच जिल्हाधिकारी यांच्या दालनात आचारसंहितेमुळे पडून आहे.यामुळे परसोडी, ठाणा येथील अडीचशे नळधारकांना शुध्द पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे. याउलट ठाणा येथील दिड कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना १० वर्षापासुन रेंगाळत पडलेली आहे. जवळपास पुर्ण पैसे खर्च झाले. मात्र ठाणा वासीयांना एक थेंब पाण्याचा मिळालेला नाही. यात ग्रामस्थांनी झालेल्या खर्चात अफरातफरचा ठपका ठेऊन संबंधी यंत्रणेला दोषी माणून त्यांच्याविरुध्द एकमुखी न्यायालयात जनहित याचीका दाखल करण्याचा ठराव ११ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आला आहे.यालाही आम्हाला न्यायालयात जनहित याचीका दाखल करण्याचा ठराव ११ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आले. यालाही आम्हाला न्यायालयात जाण्याच्या व जनहित याचीका दाखल करण्याचा अधिकार नाही असे ग्रामपंचायत व पंचायत समिती विभाग म्हणतात. असे मागील आठवड्याच्या तहकुब ग्रामसभेत उपस्थित जनतेला सांगण्यात आले. मात्र लेखी पुरावा देण्यात आलेला नाही. येथे मात्र घोडे कुठतरी भिझतय.संपूर्ण याउलट दिड कोटीची पाणीपुरवठा योजनाचे पाईप लाईन निकामी झाले, यामुळे यंत्रणा पाणीपुरवठा करु शकत नाही. अशी सारवा सारव करीत ग्रामसभेत नवीन विद्यमान ग्रामपंचायत कमेटी व पाणीपुरवठा समितीने ग्रामस्थासमोर प्रस्ताव ठेवला. याला विरोध जनतेनी केले. याकडे आता कोण मायबाप उरलेला आहे की जो ठाणा पाणीपुरवठा योजना तळीस नेणार याचा शोध घेणे आज सर्व गावकऱ्यांकडे प्रश्न पडलेला आहे. जिल्ह्याचे मुख्य याकडे जातीने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई