शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठ्याचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:31 IST

सर्वांना शुध्द पाणी मिळावे या हेतुने भारत निर्माण योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. यात कोरंभी येथे पाण्याचे स्त्रोत तर बेला येथे जलशुध्दीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र मागील पंधरा दिवसापासुन आचारसंहितेच्या विळख्यात येथील दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याने शुध्द पाण्यासाठी महिलांची भटकंती होत आहे.

ठळक मुद्देदहा वर्षांची पूर्ण खर्चित योजना रखडली : नवीन पाणीपुरवठा योजना तिसऱ्यांदा मंजूर

प्रल्हाद हुमणे।लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : सर्वांना शुध्द पाणी मिळावे या हेतुने भारत निर्माण योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. यात कोरंभी येथे पाण्याचे स्त्रोत तर बेला येथे जलशुध्दीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र मागील पंधरा दिवसापासुन आचारसंहितेच्या विळख्यात येथील दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याने शुध्द पाण्यासाठी महिलांची भटकंती होत आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भंडारा अंतर्गत शहापुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाद्वारे बेला, भोजापूर, उमरी-फुलमोगरा, शहापुर, गोपीवाडा, परसोडी, ठाणा येथील गावांना बेला येथील जलशुध्दीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा सुमारे बाराशे नळ धारकांना केला जातो. ही पाणीपुरवठा योजना पुर्वी म्हणजे चारवर्षापुर्वी जिल्हा परिषद भंडाराकडे देखभाल दुरुस्तीचे कामे होती.यावेळी सोळा ते सतरा लाख रुपये वार्षिक खर्च हिशेब होता. आता बेला ग्रामपंचायतीकडे देखभाल दुरुस्तीचे कामे दिली. तेही फक्त तेरा ते चौदा लाख रुपयाचा. या तफावतीचे नेमके कोणते कारण अद्याप गुलदस्त्यात दडलेले आहे. दुसरी बाब म्हणजे बाब अत्यंत जिव्हाळ्याचा दैनिक गरजेचा विषय. मात्र मागील पंधरा दिवसापासून शहापूर येथील राष्टÑीय महामार्ग दरम्यान मुख्य जलवाहिनी नादुरुस्त अवस्थेत तसीच जिल्हाधिकारी यांच्या दालनात आचारसंहितेमुळे पडून आहे.यामुळे परसोडी, ठाणा येथील अडीचशे नळधारकांना शुध्द पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे. याउलट ठाणा येथील दिड कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना १० वर्षापासुन रेंगाळत पडलेली आहे. जवळपास पुर्ण पैसे खर्च झाले. मात्र ठाणा वासीयांना एक थेंब पाण्याचा मिळालेला नाही. यात ग्रामस्थांनी झालेल्या खर्चात अफरातफरचा ठपका ठेऊन संबंधी यंत्रणेला दोषी माणून त्यांच्याविरुध्द एकमुखी न्यायालयात जनहित याचीका दाखल करण्याचा ठराव ११ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आला आहे.यालाही आम्हाला न्यायालयात जनहित याचीका दाखल करण्याचा ठराव ११ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आले. यालाही आम्हाला न्यायालयात जाण्याच्या व जनहित याचीका दाखल करण्याचा अधिकार नाही असे ग्रामपंचायत व पंचायत समिती विभाग म्हणतात. असे मागील आठवड्याच्या तहकुब ग्रामसभेत उपस्थित जनतेला सांगण्यात आले. मात्र लेखी पुरावा देण्यात आलेला नाही. येथे मात्र घोडे कुठतरी भिझतय.संपूर्ण याउलट दिड कोटीची पाणीपुरवठा योजनाचे पाईप लाईन निकामी झाले, यामुळे यंत्रणा पाणीपुरवठा करु शकत नाही. अशी सारवा सारव करीत ग्रामसभेत नवीन विद्यमान ग्रामपंचायत कमेटी व पाणीपुरवठा समितीने ग्रामस्थासमोर प्रस्ताव ठेवला. याला विरोध जनतेनी केले. याकडे आता कोण मायबाप उरलेला आहे की जो ठाणा पाणीपुरवठा योजना तळीस नेणार याचा शोध घेणे आज सर्व गावकऱ्यांकडे प्रश्न पडलेला आहे. जिल्ह्याचे मुख्य याकडे जातीने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई