शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

'त्या' तलावात सोडले जाते शहरातील सांडपाणी

By admin | Updated: August 6, 2016 00:30 IST

शहरातील भूजली तलावात मागील आठवड्यात हजारो माशांचा मृत्यू झाला होता.

जिल्हा परिषदचे दुर्लक्ष : तलावाची स्वच्छता कुणी करावी, मासे मृत्यूचा अहवाल निरी पाठविणारमोहन भोयर तुमसरशहरातील भूजली तलावात मागील आठवड्यात हजारो माशांचा मृत्यू झाला होता. येथील पाणी व मृत माशांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. या तलावात शहरातील काही भागातील सांडपाणी जाते. जिल्हा परिषद प्रशासनाचे येथे दुर्लक्ष आहे. नैसर्गीक पाणी दूषित करण्याचा अधिकार कुणालाच नाही. शहर परिसरातील तलावांची काळजी कोण घेणार हा प्रश्न येथे उपस्थित होतो.तुमसरात जुन्या शहराच्या मध्यभागी भूजली तलाव आहे. या तलावाची मालकी जिल्हा परिषद प्रशासनाकडे आहे. परंतु तलावाकडे जिल्हा परिषदचे कायम दुर्लक्ष आहे. मागील आठवड्यात या तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाला होता. तलावातील पाण्याचे व माशांचे नमूने नागपूर येथील निरी या संस्थेकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.उपजिल्हा रुग्णालय, तुमसर व जिल्हा परिषदेच्या प्रयोगशाळेने पाणी गढूळ असल्याचा अहवाल दिला आहे. तलावाच्या सभोवताल नागरिकांची वस्ती आहे. शहरातील काही वॉर्डांचे सांडपाणी नालीद्वारे या तलावात विसर्ग केल्या जात आहे. नालीचे बांधकाम येथे करण्यात आले. तलाव परिसरात अतिक्रमणही करण्यात आले आहे. त्यांचेही सांडपाणी सर्रास तलावात सोडण्यात येत आहे.मच्छिंद्रनाथ सहकारी मच्छीमार सोसायटीकडे हा तलाव भाडे तत्वावर आहे. सुमारे सात ते आठ लाखांचे मासे येथे मृत्युमूखी पडले. या तलावात सध्या एक मासाही जिवंत नाही. जिल्हा परिषद प्रशासन तलाव भाडे तत्वावर देते, परंतु तलाव खोलीकरण व तलावाची काळजी मात्र घेत नाही. त्यामुळे हा तलाव नगरपरिषदेकडे हस्तांतरण करण्याची गरज आहे. मासे मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाईची मागणी मासेमार बांधवांनी शासनाकडे केली आहे.शहराच्या हद्दीतील तलावांची काळजी कोण घेणार हा मुख्य प्रश्न आहे. नैसर्गिक तलावातील पाणी दूषित करण्याचा अधिकार कुणालाच नाही. पाणी दूषित करणे हा गुन्हा आहे. संबंधितावर येथे कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे, परंतु प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहे.पाणी दूषित करण्याचा अधिकार कुणालाच नाही. शहरातील सांडपाणी येथे जात असेल तर ते तात्काळ बंद करण्यात येईल. तलाव स्वच्छ असणे गरजेचे आहे.-चंद्रशेखर गुल्हाणे, मुख्याधिकारी, तुमसर.शहराच्या हद्दीत तलाव स्वच्छ ठेवणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. मालकी कुणाचीही असो, शहरातील हा तलाव शेवटची घटका मोजत आहे. -मो. तारिक कुरैशी, जिल्हाध्यक्ष, भाजप.तलावातील पाणी व मृत मासे नागपूर येथील निरी येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. लवकरच तिथून अहवाल प्राप्त होईल. त्यानंतरच माशांचा मृत्यू कशाने झाला हे कडेल.-शिल्पा सोनुले, उपविभागीय अधिकारी, तुमसर.