शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राज्यातील सात हजार ५०० अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या सावटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:10 IST

राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना संकटकाळात सुरक्षा साधनांचा पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी सात हजार ५०० अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावीत आहे.

ठळक मुद्दे सुरक्षा साधनांअभावी करावे लागते कामकाज

देवानंद नंदेश्वर

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना संकटकाळात सुरक्षा साधनांचा पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी सात हजार ५०० अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावीत आहे. आतापर्यंत राज्यातील नऊ जणांचा मृत्यू, तर २९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या उपाययोजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने आंदोलनाचा अल्टिमेटम दिला आहे.

२०१२ च्या पशुगणनेनुसार राज्यात एकूण ३ कोटी २४ लक्ष ८९ हजार पशूधन आहे. यात गोजातीय एक कोटी ५४ लक्ष ८४ हजार , म्हैसवर्गीय ५५ लक्ष ९५ हजार पशुधन आहे. सध्यास्थितीत राज्यात १ हजार ८०० पशुधन विकास अधिकारी, पाच हजार पर्यवेक्षक व ७०० शिपाई आहेत. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये त्यांची सेवा अखंडपणे सुरु आहे. सदर कार्य करीत असताना वैयक्तिक संरक्षक साहित्य शासनाकडून पुरविण्यात आले नाही. शेतकऱ्यांच्या दारात पशूवैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत. त्यानंतर जनावरांना टॅग मारुन लाळ खुरकुत लसीकरण मोहीम राबविणे सुरु आहे. विदर्भ व मराठवाड्यात लम्पी स्क्रीन आजाराचा प्रादूर्भाव सुरु आहे. पशुवैद्यकीय सेवा देत असतांना पशुपालकांच्या संपर्कात येवून कुठेही सामाजिक अंतर पाहणे शक्य नसते. याचाच परिणाम आजपर्यंत राज्यातील पशुसंवर्धन खात्यातील २९० अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर नऊ जणांचा सेवा देत असतांना मृत्यू झालेला आहे. त्यांना कोणतीही विमा कवच अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे सेवा देताना कोरोनाची धास्ती त्यांच्या मनात भरली आहे. पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यास शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संघटना तीव्र आंदोलनाचा तयारीत दिसत आहे.संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदनपशुसंवर्धन खात्यातील समस्यांवर वेळोवेळी मागणी व पुरवठा करुनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे समस्यांकडे लक्ष देवून मागण्यांची पुर्तता करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मागण्यांमध्ये लाळ खुरकूत फेरी पुढे ढकलण्यात यावी, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा पुरवठा व्हावा, विमा कवच, सानुग्रह अनुदान तत्काळ मंजूर करावे, कोरोना आजाराची संपूर्ण वैद्यकीय खर्चाची प्रतीपूर्ती करावी, संसर्ग काळातील विलगीकरणाची स्वतंत्र रजा मंजूर करावी आदींचा समावेश आहे.कोरोना काळात मागण्यांसाठी आंदोलन करण्याची इच्छा नाही. चर्चेतून मागण्या मान्य कराव्यात. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा धोका लक्षात घेवून त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.डॉ. शशिकांत मांडेकर,कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस