शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आधार हरपलेल्या निराधारांची योजनेच्या लाभासाठी ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:12 IST

ज्या मुलांना मोठे करण्यासाठी आयुष्य वेचले, रक्ताच पाणी करून शिकवले, तिच मुलं आपल्या आई-बापांना आयुष्याच्या शेवटी वाºयावर सोडतात. रक्ताचं नातं असलेली मुलं नोकरीच्या निमित्ताने शहरात अथवा परदेशात रममान झालेली आहेत.

ठळक मुद्देलाखांदूर तालुक्यातील प्रकार : निराधार योजना कार्यालय वाऱ्यावर, योजनांमध्ये गरजूंपेक्षा श्रीमंतांचा अधिक भरणा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : ज्या मुलांना मोठे करण्यासाठी आयुष्य वेचले, रक्ताच पाणी करून शिकवले, तिच मुलं आपल्या आई-बापांना आयुष्याच्या शेवटी वाºयावर सोडतात. रक्ताचं नातं असलेली मुलं नोकरीच्या निमित्ताने शहरात अथवा परदेशात रममान झालेली आहेत. मुलं असतानाही निराधार झालेल्या वयोवृध्दांसाठी शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील गरजू, गरीब, वृद्ध, निराधार, परितक्ता, विधवा व अपंगाना अर्थसहाय्य देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील निराधार व वृद्ध संबंधित शासकीय कार्यालय, बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. एवढी ससेहोलपट करुनही लाभ मिळत नसल्याची व्यथा आहेत.समाजातील निराधार, दुर्बल घटकास तसेच निराधार वयोवृद्ध व्यक्तींना जीवन जगण्यासाठी बळ मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय कुंटुब योजना या योजना राबविल्या जातात. या लाभार्थ्यांना वेळेवर व पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना बँकाकडून हेळसांड होत असून काही ठिकाणी निराधारांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे. काही बँकांमध्ये निराधारांचे खाते काढण्यास टाळाटाळ होत आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या लाभार्थ्यांपेक्षा जास्त नागरिक अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत असताना प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कुठलीच कारवाई केली नाही. एखाद्या पात्र लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवून लाभ मिळत नाही. बोगस लाभार्थ्यांना दलालामार्फेत तत्काळ लाभ दिला जात असल्याने या योजनांपासून खरे लाभार्थी वंचित राहिले आहेत.प्रत्येक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाल्याने निराधारांचे आर्थिक शोषण होत आहे. तालुक्यात संजय गांधी निराधार समित्यांच्या बैठका वेळच्यावेळी होत नसल्याने लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मंजूर केले जात नसल्याची स्थिती तालुक्यात आहे. निराधार योजनांच्या कार्यालयाला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. जिल्हास्तरीय कार्यालयात निम्यापेक्षाही जास्त पदे रिक्त असून तालुकस्तरावरील कार्यालयात कर्मचाºयांची वाणवा आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात माहितीचा अभाव असून निराधार नागरिकांचे कामे प्रलंबित आहेत. शासनातर्फे राबविल्या जाणाºया या अनुदान योजनांचे अनुदान आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. योजनेच्या लाभार्थ्यांपैकी बहुतेक नागरिकांचे जीवन या अनुदानावरच अवलंबून आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत असताना पण बºयाच वेळा लाभार्थ्यांना या अनुदानांचे वितरण वेळेवर होत नाही. एकतर शासन बँकाकडे वेळच्या वेळी अनुदान पाठवित नाही. पाठविलेच तर बँका लाभार्थ्यांना निर्धारित वेळेत अनुदानाचे वितरण करीत नाही. त्यामुळे या अनुदानासाठी बँकाकडे चकरा मारुन थकून जातात. त्यामुळे बँकाकडून लाभार्थ्यांची नेहमी हेळसांड होत आहे. लाभ मिळवून देण्याच्या नावावर दलाल तहसील कार्यालयात सक्रीय झाले आहेत.