शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

सामान्य नागरिकांची सेवा हाच शासकीय सेवेचा खरा उद्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:02 IST

शासकीय सेवेत शेवटचा दिवस फार अवघड असतो. माणूस भावनाविवश होतो. सहकाऱ्यांमधून सुटका होणार ही कल्पनाच सहन होत नाही. तसेच जबाबदारी मुक्त झालो याचा आनंदही होत असतो. प्रदीर्घ शासकीय सेवेत सामान्य नागरिकांची सेवा हाच आपल्या सेवेचा खरा उद्देश आहे.

ठळक मुद्देरवींंद्र जगताप : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्तांचा निरोप समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय सेवेत शेवटचा दिवस फार अवघड असतो. माणूस भावनाविवश होतो. सहकाऱ्यांमधून सुटका होणार ही कल्पनाच सहन होत नाही. तसेच जबाबदारी मुक्त झालो याचा आनंदही होत असतो. प्रदीर्घ शासकीय सेवेत सामान्य नागरिकांची सेवा हाच आपल्या सेवेचा खरा उद्देश आहे. या उद्देशाने सेवा केलेल्या व लोकांच्या अडीअडचणी सोडविणाºया अधिकाऱ्यांना नागरिक कायम सन्मान देत असतात. ही बाब समोर ठेवून शासकीय सेवा करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.शासकीय कामकाज करताना नागरिकांना सौजन्याची वागणूक द्यावी, प्रत्येकाचे बोलणे समजावून घ्यावे. कनिष्ठांना कामाचे महत्व समजावावे. लोकांचे काम करा, तरच शेवटचे आयुष्य सुखा-समाधानाने जाईल, असेही ते म्हणाले. अधिकारी कर्मचाºयांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. दररोज नियमित कामकाजातून एक तास काढून व्यायाम करावा, असा सल्ला त्यांनी दिला.अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले व जिल्हाधिकारी यांचे स्विय सहाय्यक ज्ञानेश्वर तिनखेडे यांच्या सेवानिवृत्तीप्रीत्यर्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद सभागृहात निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भुसारी, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, अभिमन्यु बोदवड प्रामुख्याने उपस्थित होते.महसूल यंत्रणेची परंपरा कायम ठेवा, तसेच नागरिकांना मदत करा. आधुनिक टेक्नॉलाजी मुळे कामात भर पडली आहे. परंतु कामात पारदर्शकता ठेवा अशा दृष्टीकोनामुळे आपला शासकीय प्रवास सुकर होईल असे जिल्हाधिकारी म्हणाले.सेवा प्रवासात गंतव्यस्थानाकडे जाणे अटळ आहे. सेवानिवृत्तीचा दिवस हा सेवा काळातील सोनियाचा दिवस आहे. शासकीय सेवेत नेहमी प्रत्येक दिवस अडथळयांच्या शर्यतीतून जावे लागते. सेवा प्रवासात येणाºया प्रसंगाचे सिंहावलोकन करणे आज गरजेचे आहे. महसूल विभागात काम करतांना तळागाळातील लोकांची सेवा करण्यास मिळते, ग्रामीणांशी जवळीक साधता येते म्हणूनच मी या विभागात आल्याचे सत्कारमूर्ती दिलीप तलमले यांनी सांगितले. लोकांच्या तक्रारी मार्गी लावतांना नकारार्थी भूमिका न घेता सकारात्मक काम करावे, असेही ते म्हणाले.उपजिल्हाधिकारी बोदवड यांनी महसूल यंत्रणेच्या कामाची व येणाºया अडचणींविषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी ज्ञानेश्वर तिनखेडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी यांनी केले तर, उपस्थितांचे आभार जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी मानले. कार्यक्रमाचे संचलन जिल्हा आपत्ती अधिकारी अभिषेक नामदास यांनी केले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, मुकुंद टोनगावकर, सर्व तहसिलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.