शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

सामान्य नागरिकांची सेवा हाच शासकीय सेवेचा खरा उद्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:02 IST

शासकीय सेवेत शेवटचा दिवस फार अवघड असतो. माणूस भावनाविवश होतो. सहकाऱ्यांमधून सुटका होणार ही कल्पनाच सहन होत नाही. तसेच जबाबदारी मुक्त झालो याचा आनंदही होत असतो. प्रदीर्घ शासकीय सेवेत सामान्य नागरिकांची सेवा हाच आपल्या सेवेचा खरा उद्देश आहे.

ठळक मुद्देरवींंद्र जगताप : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्तांचा निरोप समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय सेवेत शेवटचा दिवस फार अवघड असतो. माणूस भावनाविवश होतो. सहकाऱ्यांमधून सुटका होणार ही कल्पनाच सहन होत नाही. तसेच जबाबदारी मुक्त झालो याचा आनंदही होत असतो. प्रदीर्घ शासकीय सेवेत सामान्य नागरिकांची सेवा हाच आपल्या सेवेचा खरा उद्देश आहे. या उद्देशाने सेवा केलेल्या व लोकांच्या अडीअडचणी सोडविणाºया अधिकाऱ्यांना नागरिक कायम सन्मान देत असतात. ही बाब समोर ठेवून शासकीय सेवा करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.शासकीय कामकाज करताना नागरिकांना सौजन्याची वागणूक द्यावी, प्रत्येकाचे बोलणे समजावून घ्यावे. कनिष्ठांना कामाचे महत्व समजावावे. लोकांचे काम करा, तरच शेवटचे आयुष्य सुखा-समाधानाने जाईल, असेही ते म्हणाले. अधिकारी कर्मचाºयांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. दररोज नियमित कामकाजातून एक तास काढून व्यायाम करावा, असा सल्ला त्यांनी दिला.अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले व जिल्हाधिकारी यांचे स्विय सहाय्यक ज्ञानेश्वर तिनखेडे यांच्या सेवानिवृत्तीप्रीत्यर्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद सभागृहात निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भुसारी, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, अभिमन्यु बोदवड प्रामुख्याने उपस्थित होते.महसूल यंत्रणेची परंपरा कायम ठेवा, तसेच नागरिकांना मदत करा. आधुनिक टेक्नॉलाजी मुळे कामात भर पडली आहे. परंतु कामात पारदर्शकता ठेवा अशा दृष्टीकोनामुळे आपला शासकीय प्रवास सुकर होईल असे जिल्हाधिकारी म्हणाले.सेवा प्रवासात गंतव्यस्थानाकडे जाणे अटळ आहे. सेवानिवृत्तीचा दिवस हा सेवा काळातील सोनियाचा दिवस आहे. शासकीय सेवेत नेहमी प्रत्येक दिवस अडथळयांच्या शर्यतीतून जावे लागते. सेवा प्रवासात येणाºया प्रसंगाचे सिंहावलोकन करणे आज गरजेचे आहे. महसूल विभागात काम करतांना तळागाळातील लोकांची सेवा करण्यास मिळते, ग्रामीणांशी जवळीक साधता येते म्हणूनच मी या विभागात आल्याचे सत्कारमूर्ती दिलीप तलमले यांनी सांगितले. लोकांच्या तक्रारी मार्गी लावतांना नकारार्थी भूमिका न घेता सकारात्मक काम करावे, असेही ते म्हणाले.उपजिल्हाधिकारी बोदवड यांनी महसूल यंत्रणेच्या कामाची व येणाºया अडचणींविषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी ज्ञानेश्वर तिनखेडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी यांनी केले तर, उपस्थितांचे आभार जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी मानले. कार्यक्रमाचे संचलन जिल्हा आपत्ती अधिकारी अभिषेक नामदास यांनी केले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, मुकुंद टोनगावकर, सर्व तहसिलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.