शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

17 ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का? पालक संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

आपल्या पाल्यांना शाळेत पाठवल्यावर ते सुरक्षित राहतील काय? हीच मुख्य चिंता पालकांना सतावत आहे. ज्येष्ठांना  किंवा १८ वर्ष वयोगटावरील नागरिकांना जसे लसीकरण करण्यात आले तसेच बालकांबाबतही लसीकरण होणार आहे काय? ते सुरक्षित कसे राहतील याची आता चर्चा होऊ लागली आहे. १७ ऑगस्टपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या  असल्याने हा विषय चांगलाच रंगला आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आधी आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहे आहेत. आता इयत्ता पहिली त्या सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात ऊहापोह सुरू आहे.  मात्र काेरोनाची भीती कायम असून पालकगण १७ ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का? या विचारात गुंतले आहेत.माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या एकूण ९६५ शाळा आहेत. त्यामधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे दुसऱ्या लाटेमुळे शाळा सुरू झाल्या नव्हत्या. मात्र जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची स्थिती पाहता इयत्ता आठवी ते बारावीची वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र तिथेही विद्यार्थ्यांची पटसंख्या हव्या त्या प्रमाणात दिसून येत नाही. अजूनही पालकांच्या मनात कोरोना संक्रमणाची स्थिती व भीती कायम आहे. शहरातही हवा तेवढा प्रतिसाद दिसून आलेला नाही. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवल्यावर ते सुरक्षित राहतील काय? हीच मुख्य चिंता पालकांना सतावत आहे. ज्येष्ठांना  किंवा १८ वर्ष वयोगटावरील नागरिकांना जसे लसीकरण करण्यात आले तसेच बालकांबाबतही लसीकरण होणार आहे काय? ते सुरक्षित कसे राहतील याची आता चर्चा होऊ लागली आहे. १७ ऑगस्टपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या  असल्याने हा विषय चांगलाच रंगला आहे. शिक्षण  वर्तुळातही शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे शाळा परिसर निर्जंतुकीकरण करणे, कोविड नियमांचे पालन व अन्य बाबींवरही भर दिला जात आहे. जिल्ह्यात सातवीच्या ९६५ शाळा असल्या तरी त्यातील तीनशेच्या जवळपास शाळा सुरू होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. शाळा सुरू व्हायला अजून आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने त्यात वाढ होण्याची दाट  शक्यता व्यक्त केली जात आहे वर्गनिहाय विद्यार्थी संख्येवर नजर घातल्यास जिल्ह्यातील पहिली इयत्तामध्ये १६५४३ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. तसेच इयत्ता चौथी अंतर्गत १७६१७ तर पाचवीमध्ये १७२१७ विद्यार्थी शाळेत जातील मात्र यापैकी किती शाळा उघडणार ही येणारी वेळच ठरविणार आहे. पुन्हा शाळा परिसर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजणार असल्याचे दृश्य आहे.

पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता

मुलांचा पुढचा पाया मजबूत करायचा असेल तर शाळा सुरू झाल्या पाहिजेत. मात्र लहान मुलांच्या आरोग्याची काळजी शिक्षण व आरोग्य विभागाने घेतली पाहिजे. ज्याप्रमाणात १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होत आहे, तसेच मुलांचे लसीकरण ही व्हायला हवे. यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत. याची माहिती पालकांना मिळणे अपेक्षित आहे. जेणेकरून पालकांमध्ये संभ्रम राहणार नाही. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.-नितीन मोहारे, पालक, कान्हळगाव (सिर.) 

गत १५ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मूल घरी गोंधळ करतात. मूलभूत शिक्षणाचा पाया कच्चा राहता कामा नये. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण अश्यक्य आहे. आता कोरोना कमी झाला आहे. पहिलीपासूनची शाळा सुरू करायला हरकत नसावी. पण, पालकांच्या मनात शंका राहू नये म्हणून सुरक्षेतेसाठी मुलांचे लसीकरण केले पाहिजे. समन्वय करूनच विचाराअंती शाळा सुरू कराव्यात.-श्याम चकोले,  पालक, मोहगाव देवी

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या