शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

धानाची बांधावर विक्री

By admin | Updated: November 9, 2015 04:47 IST

धानाचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या तुमसर तालुक्यात अद्याप शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. येथे

मोहन भोयर ल्ल तुमसरधानाचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या तुमसर तालुक्यात अद्याप शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. येथे शेतकऱ्यांच्या बांधावर व्यापारी जाऊन धान खरेदी करीत आहेत. बाजार समितीतील सुध्दा धानाला कमी भाव मिळत असून २५० ते ३०० रूपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.राज्य शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केल्याची घोषणा केली. परंंतू, प्रत्यक्षात धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. १ आॅक्टोबरपासून तालुक्यात हलके धान निघाले. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी धान विक्री करणे सुरू केले. धानाला व्यापाऱ्यांनी सुरूवातीपासून भाव दिला नाही. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील २० दिवसापासून धानाची आवक वाढली. येथेही प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांना किमान २०० ते ३०० रूपये तोटा सहन करावा लागत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डावर अडतीया मार्फत धानाची बोली बोलली जाते. निश्चितच बोलीची सुरूवात येथे कमीच राहते. धानाची आवक वाढल्याने दलालांची तथा व्यापाऱ्यांची सध्या बल्ले-बल्ले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी प्रत्यक्षात बांधावर जावून धान खरेदी करणे सुरू केले आहे. येथे शेतकऱ्यांची मोठी लूट होत आहे. परंतु, नगदी रक्कम मिळत असल्याने सर्वसामान्य शेतकरी या व्यापाऱ्यांकडे आकर्षित होत आहे. आधारभूत धान खरेदी आज होईल, उद्या होईल याकडे बळीराजा नजरा लावून होते. मात्र, अद्याप धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही, ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल.दिवाळी आली असतानाही शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही, बाजारात गर्दी नाही त्यामुळे व्यापारीसुध्दा हातावार हात देऊन ग्राहकांची प्रतिक्षा करीत आहेत. मागील शासनाच काळात सप्टेंबर महिन्यात नियोजन करून १५ आॅक्टोबरपर्यंत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले होते. सध्या तसे आदेश प्राप्त झालेले नाही. आदेश प्राप्त झाल्यावरही किमान १५ दिवस नियोजनाकरिता लागणार आहेत. नियोजनाचा येथे अभाव दिसून येतो. मागील एक महिन्यापासून शेतकरी धान विक्री करीत आहेत. हे धान व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतले आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्यावर ही व्यापारी मंडळी धान खरेदी केंद्रावर हे धान विक्री करून मोठा नफा कमावण्याची शक्यता अधिक आहे. उशिरा धान खरेदी केंद्र सुरू करण्यामागची ठोस कारणे शासन सांगण्यास असमर्थ ठरले आहे.शेतकऱ्यांना संपवण्याचा हा कुटील डाव आहे. भाजप प्रणित केंद्र व राज्य शासन लहान शेतकऱ्यांचा बळी घेत आहेत. मागील शासनाच्या काळात सप्टेंबरमध्येच नियोजन होऊन १५ आॅक्टोबरपर्यंत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले होते.- अनिल बावनकर,माजी आमदार, तुमसर.