शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

धानाची बांधावर विक्री

By admin | Updated: November 9, 2015 04:47 IST

धानाचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या तुमसर तालुक्यात अद्याप शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. येथे

मोहन भोयर ल्ल तुमसरधानाचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या तुमसर तालुक्यात अद्याप शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. येथे शेतकऱ्यांच्या बांधावर व्यापारी जाऊन धान खरेदी करीत आहेत. बाजार समितीतील सुध्दा धानाला कमी भाव मिळत असून २५० ते ३०० रूपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.राज्य शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केल्याची घोषणा केली. परंंतू, प्रत्यक्षात धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. १ आॅक्टोबरपासून तालुक्यात हलके धान निघाले. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी धान विक्री करणे सुरू केले. धानाला व्यापाऱ्यांनी सुरूवातीपासून भाव दिला नाही. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील २० दिवसापासून धानाची आवक वाढली. येथेही प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांना किमान २०० ते ३०० रूपये तोटा सहन करावा लागत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डावर अडतीया मार्फत धानाची बोली बोलली जाते. निश्चितच बोलीची सुरूवात येथे कमीच राहते. धानाची आवक वाढल्याने दलालांची तथा व्यापाऱ्यांची सध्या बल्ले-बल्ले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी प्रत्यक्षात बांधावर जावून धान खरेदी करणे सुरू केले आहे. येथे शेतकऱ्यांची मोठी लूट होत आहे. परंतु, नगदी रक्कम मिळत असल्याने सर्वसामान्य शेतकरी या व्यापाऱ्यांकडे आकर्षित होत आहे. आधारभूत धान खरेदी आज होईल, उद्या होईल याकडे बळीराजा नजरा लावून होते. मात्र, अद्याप धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही, ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल.दिवाळी आली असतानाही शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही, बाजारात गर्दी नाही त्यामुळे व्यापारीसुध्दा हातावार हात देऊन ग्राहकांची प्रतिक्षा करीत आहेत. मागील शासनाच काळात सप्टेंबर महिन्यात नियोजन करून १५ आॅक्टोबरपर्यंत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले होते. सध्या तसे आदेश प्राप्त झालेले नाही. आदेश प्राप्त झाल्यावरही किमान १५ दिवस नियोजनाकरिता लागणार आहेत. नियोजनाचा येथे अभाव दिसून येतो. मागील एक महिन्यापासून शेतकरी धान विक्री करीत आहेत. हे धान व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतले आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्यावर ही व्यापारी मंडळी धान खरेदी केंद्रावर हे धान विक्री करून मोठा नफा कमावण्याची शक्यता अधिक आहे. उशिरा धान खरेदी केंद्र सुरू करण्यामागची ठोस कारणे शासन सांगण्यास असमर्थ ठरले आहे.शेतकऱ्यांना संपवण्याचा हा कुटील डाव आहे. भाजप प्रणित केंद्र व राज्य शासन लहान शेतकऱ्यांचा बळी घेत आहेत. मागील शासनाच्या काळात सप्टेंबरमध्येच नियोजन होऊन १५ आॅक्टोबरपर्यंत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले होते.- अनिल बावनकर,माजी आमदार, तुमसर.