शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न वाढीसाठी कृषी विद्यापीठाचेच बियाणे वापरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना विज्ञानाची कास धरुन कृषी विभाग, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ व महाबिजचे तांत्रिक अधिकारी यांची वेळोवेळी मदत घेण्याचे व उत्पन्न वाढविण्याचे मनोगत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी भात शेतीसह भाजीपाला व फळपिकाचे नियोजन करुन शेतीतून उत्पन्न वाढविण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देजी. आर. श्यामकुंवर : पहेला येथे धान पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम, परिसरातील १५० शेतकऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भात पिकाची लागवड, योग्य वाणाची निवड, रोग किडीचा बंदोबस्त तसेच योग्य वेळी योग्य प्रमाणात खताचे नियोजन करण्याचे आवाहन कृषी संशोधन केंद्र साकोलीचे वरिष्ट भात पैदासकार डॉ. जी. आर. श्यामकुंवर यांनी केले. बियाणांची निवड करतांना आवश्यक त्या सर्व चाचण्यांमधून पास होणारे महाबिज किंवा कृषी विद्यापिठाचेच बियाणे प्राधान्याने वापरण्याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.बियाणे व्यवसायात मोलाचे कार्य गत चार दशकापासून करीत असलेल्या महाबिज या शेतकऱ्यांच्या व महाराष्ट्र शासनाच्या बियाणे कंपनीचे वतीने व कृषी विभाग तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ, कृषी संशोधन केंद्र साकोली यांचे सौजन्याने महाबिज उत्पादित नवीन भाताचे वाण सीओ-५१ व पीडीकेव्ही-तिलक या वाणाचा पिक प्रात्यक्षिक पहेला येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना विज्ञानाची कास धरुन कृषी विभाग, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ व महाबिजचे तांत्रिक अधिकारी यांची वेळोवेळी मदत घेण्याचे व उत्पन्न वाढविण्याचे मनोगत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी भात शेतीसह भाजीपाला व फळपिकाचे नियोजन करुन शेतीतून उत्पन्न वाढविण्याचे आवाहन केले.उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना महाबिजचे विभागीय व्यवस्थापक सुरेश गायकवाड म्हणाले, शेतीला विज्ञानाच्या जोडीने करण्याशिवाय पर्याय नाही. दिवसेंदिवस होत असलेल्या वातावरण व हवामानातील बदलावर मात करायची असल्यास विज्ञान व शास्त्रज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. पयार्याने उत्पन्न वाढेल, असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक यशवंत कामडी यांनी सीओ-५१ व पीडीकेव्ही-तिलक या नवीन भाताचे वाणाचे गुणधर्म उपस्थितांना सांगितले. शेतीतून उत्पन्न वाढविण्याकरीता भात पिकासोबतच केळी व पपई सारखे फळ पिके घेतल्यास शेतीतून उत्पन्न वाढविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाबिजकडे केळीची जी-९ या वाणाची उती संवर्धित एक सारख्या वयाची आणि सारख्या आकाराची विषाणू रहित रोगमुक्त रोपे प्रती रोप १३.५० रुपये प्रमाणे उपलब्ध आहेत. संकरीत पपई या वाणे तैवाण-रेड लेडी-७८६ या वाणाचे अनुवांशिक शुध्दता असलेले रोपे रुपये १३ प्रती रोप प्रमाणे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.संचालन महाबिजचे सहाय्यक क्षेत्र अधिकारी आनंद चौधरी यांनी केले. आभार मंडळ कृषी अधिकारी पाल यांनी मानले. या कार्यक्रमास पहेला व जवळपासच्या गावातील १५० शेतकºयांनी पिक प्रात्यक्षिकचा लाभ घेतला.

टॅग्स :agricultureशेतीuniversityविद्यापीठ