शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
4
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
5
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
6
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
7
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
8
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
9
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
10
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
11
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
12
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
13
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
14
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
15
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
16
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
17
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
18
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
19
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
20
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा

पोलिसांच्या टेलिफोनबंदचे रहस्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 00:27 IST

गंभीरता, तत्परता, कर्तव्यपरायणता, शिस्त अशा अनेक गुणांची व्याप्ती असणारा कोणता विभाग असेल.

राजू बांते। लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गंभीरता, तत्परता, कर्तव्यपरायणता, शिस्त अशा अनेक गुणांची व्याप्ती असणारा कोणता विभाग असेल. आठवले ना? तो आहे पोलीस विभाग. संवेदनशील असलेल्या या विभागाच्या काही पोलिसांमुळे अख्खा पोलीस विभाग आरोपीच्या पिंजऱ्यात पाहिला जातोय.पोलीस हे जनतेचे मित्र असावे. यासाठी पोलीस खात्यानेच पोलीस मित्र उपक्रम राबविला होता. आठवतेय. पण, हे मित्र केवळ ओळखपत्र घेण्यासाठीच होती काय असा प्रश्न त्यावेळी पडला. आताही पडतोय. सामान्य जनतेची मित्र पोलीस असू शकतात याचे उत्तर अनेकांना देता येईल. त्यातून सरासरी उत्तर येईल ‘नाही’. असे काय करतात पोलीस. जी अजूनही सामान्य माणसांशी मैत्री जोडू शकली नाही. नेता, सत्ता, राजकारण अन् याच्या प्रभावाखाली चेपलेली ही यंत्रणा आपला केविलवाणा धाक, जोर अन् हिसका कमजोर माणसांवरच दाखवू शकतात. कारण ती इतकी शक्तीहिन असतात त्याचा जोर चालूच शकत नाही. खरे असूनही ते आपले म्हणणे सिद्ध करू शकत नाही. सत्ता, पैसा अन् राजकारण्यांच्या भोवती हिंडणारी माणसे अंग चोरल्यासारखी उभी राहतात. एकंदर विषय असा सामान्यांसाठी पोलीस यंत्रणाच नाही. त्याचा पुरावा अन् आंखो देखी प्रकरणातून दिसायला लागेल. मोहाडी पोलीस स्टेशनचा टेलिफोन बंद राहतो. याचा प्रत्यय अनेकांना आलाय. पण, तो टेलिफोन बंद राहत होता काय? याचे बिंग फोडले ‘लोकमत’ने. पोलीस स्टेशनमधील काही पोलीस टेलिफोनचा आवाजच बंद करीत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. त्यानंतर पुढे जे काही समोर आले ते अगदी भयानक होत. पोलीस निरीक्षकांना सांगितले फोन बंद आहे, तक्रार दिली आहे. पण, दूरभाष केंद्रात तक्रारच नाही. दुसऱ्या दिवशी दूरभाष केंद्राच्या आॅपरेटरनी सत्यच बाहेर काढले. पोलीस स्टेशनचे ठाणेदार असे खोटे का बोलले. त्या अगोदर काही पोलिसांना दूरभाष केंद्राला अन् पावसाला दोषी ठरविले. पण जेव्हा सत्यता बाहेर पडली तेव्हा पोलीस स्टेशनची चांगलीच रिंग वाजली. एका संवेदनशिल कार्यालयाने फोन बंद पाडणे गुन्हा ठरतो. आजवर यावर पांघरून घातले गेले. झाकले गेले. पण, झाकून किती झाकणार एक दिवस उघडच होतो ही जाणीव पोलीस खात्याला ठाऊक असताना असा खोडकरपणा का केला असावा. याला कारण अशी, दिवसभर कोणत्या ना कोणत्या कारणांनी रिंग वाजत असते. रात्रीलाही या रिंगने झोपमोड होते. ही रिंगची कटकटच बंद केली तर किती आराम मिळेल ही भावना पोलिसांच्या डोक्यात शिरली. तेव्हापासून फोन बंदचा नाटकी देखावा होत असावा. मोठे पोलीस अधिकारी नेते टेलिफोनवर कॉल करीत नाही. ते आता सरळ अधिकाऱ्यांनी मोबाईलवर संवाद साधतात. मोबाईलमुळे या टेलिफोनची रिंग वाजली काय? नाही काय फरक पडत नव्हता. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये राहणाऱ्या पोलिसांना आरामच आराम. हे प्रकरण साधे नाही. हे प्रकरण गुन्ह्यास पात्र आहे. किती दिवसापासून हा टेलिफोन बंदचा कारभार सुरु होता. मागील पाच सहा महिन्यात या टेलिफोनवर कुणाकुणाचे कॉल झाले. किती फोन रिसीव्ह झाले. याची चौकशी होणे गरजेचे झाले आहे. तसेच पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. यातही दिसेल कोण आहेत ते ज्यांनी टेलिफोन मधील बटणाशी छेडछाड केली. याची पोलीस अधीक्षकांनी चौकशी करायला पाहिजे. टेलिफोन बंदमुळे अनेक तक्रारी पोलिसात येण्यापूर्वीच निरस्त झाल्या. काही गुपीत तक्रारी देणारी माणसे, खबर देणारी व्यक्तींना फटका बसला. लहान घटना दबून गेल्या. या टेलिफोनवर सामान्य व्यक्तीच बहुधा फोन करतो. त्यामुळे त्या सामान्य माणसांच्या तक्रारीचा आवाज दाबला गेला. संवेदनशिल अन् कर्तव्य पार पाडणारा हा विभाग संवेदनाहिन कसा होवू शकतो. जनतेनी मित्र म्हणावे ही अपेक्षा पोलीस विभागानी का करायची. सामान्य माणून पोलीस विभागापासून दूर का पळतो याची कारणे माहित असतानाही मूल्य हरविलेल्या पोलिसांना कोण समजावून सांगणार. पोलिसांना पुन्हा एकदा त्यांचे कर्तव्य, निष्ठ, शिस्ती सोबतच सामाजिकतेची जाण अन् प्रेरणा देणारे धडे व सकारात्मक दृष्टीकोनाचे प्रशिक्षण देण्याची वेळ आता आली आहे.