शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या टेलिफोनबंदचे रहस्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 00:27 IST

गंभीरता, तत्परता, कर्तव्यपरायणता, शिस्त अशा अनेक गुणांची व्याप्ती असणारा कोणता विभाग असेल.

राजू बांते। लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गंभीरता, तत्परता, कर्तव्यपरायणता, शिस्त अशा अनेक गुणांची व्याप्ती असणारा कोणता विभाग असेल. आठवले ना? तो आहे पोलीस विभाग. संवेदनशील असलेल्या या विभागाच्या काही पोलिसांमुळे अख्खा पोलीस विभाग आरोपीच्या पिंजऱ्यात पाहिला जातोय.पोलीस हे जनतेचे मित्र असावे. यासाठी पोलीस खात्यानेच पोलीस मित्र उपक्रम राबविला होता. आठवतेय. पण, हे मित्र केवळ ओळखपत्र घेण्यासाठीच होती काय असा प्रश्न त्यावेळी पडला. आताही पडतोय. सामान्य जनतेची मित्र पोलीस असू शकतात याचे उत्तर अनेकांना देता येईल. त्यातून सरासरी उत्तर येईल ‘नाही’. असे काय करतात पोलीस. जी अजूनही सामान्य माणसांशी मैत्री जोडू शकली नाही. नेता, सत्ता, राजकारण अन् याच्या प्रभावाखाली चेपलेली ही यंत्रणा आपला केविलवाणा धाक, जोर अन् हिसका कमजोर माणसांवरच दाखवू शकतात. कारण ती इतकी शक्तीहिन असतात त्याचा जोर चालूच शकत नाही. खरे असूनही ते आपले म्हणणे सिद्ध करू शकत नाही. सत्ता, पैसा अन् राजकारण्यांच्या भोवती हिंडणारी माणसे अंग चोरल्यासारखी उभी राहतात. एकंदर विषय असा सामान्यांसाठी पोलीस यंत्रणाच नाही. त्याचा पुरावा अन् आंखो देखी प्रकरणातून दिसायला लागेल. मोहाडी पोलीस स्टेशनचा टेलिफोन बंद राहतो. याचा प्रत्यय अनेकांना आलाय. पण, तो टेलिफोन बंद राहत होता काय? याचे बिंग फोडले ‘लोकमत’ने. पोलीस स्टेशनमधील काही पोलीस टेलिफोनचा आवाजच बंद करीत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. त्यानंतर पुढे जे काही समोर आले ते अगदी भयानक होत. पोलीस निरीक्षकांना सांगितले फोन बंद आहे, तक्रार दिली आहे. पण, दूरभाष केंद्रात तक्रारच नाही. दुसऱ्या दिवशी दूरभाष केंद्राच्या आॅपरेटरनी सत्यच बाहेर काढले. पोलीस स्टेशनचे ठाणेदार असे खोटे का बोलले. त्या अगोदर काही पोलिसांना दूरभाष केंद्राला अन् पावसाला दोषी ठरविले. पण जेव्हा सत्यता बाहेर पडली तेव्हा पोलीस स्टेशनची चांगलीच रिंग वाजली. एका संवेदनशिल कार्यालयाने फोन बंद पाडणे गुन्हा ठरतो. आजवर यावर पांघरून घातले गेले. झाकले गेले. पण, झाकून किती झाकणार एक दिवस उघडच होतो ही जाणीव पोलीस खात्याला ठाऊक असताना असा खोडकरपणा का केला असावा. याला कारण अशी, दिवसभर कोणत्या ना कोणत्या कारणांनी रिंग वाजत असते. रात्रीलाही या रिंगने झोपमोड होते. ही रिंगची कटकटच बंद केली तर किती आराम मिळेल ही भावना पोलिसांच्या डोक्यात शिरली. तेव्हापासून फोन बंदचा नाटकी देखावा होत असावा. मोठे पोलीस अधिकारी नेते टेलिफोनवर कॉल करीत नाही. ते आता सरळ अधिकाऱ्यांनी मोबाईलवर संवाद साधतात. मोबाईलमुळे या टेलिफोनची रिंग वाजली काय? नाही काय फरक पडत नव्हता. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये राहणाऱ्या पोलिसांना आरामच आराम. हे प्रकरण साधे नाही. हे प्रकरण गुन्ह्यास पात्र आहे. किती दिवसापासून हा टेलिफोन बंदचा कारभार सुरु होता. मागील पाच सहा महिन्यात या टेलिफोनवर कुणाकुणाचे कॉल झाले. किती फोन रिसीव्ह झाले. याची चौकशी होणे गरजेचे झाले आहे. तसेच पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. यातही दिसेल कोण आहेत ते ज्यांनी टेलिफोन मधील बटणाशी छेडछाड केली. याची पोलीस अधीक्षकांनी चौकशी करायला पाहिजे. टेलिफोन बंदमुळे अनेक तक्रारी पोलिसात येण्यापूर्वीच निरस्त झाल्या. काही गुपीत तक्रारी देणारी माणसे, खबर देणारी व्यक्तींना फटका बसला. लहान घटना दबून गेल्या. या टेलिफोनवर सामान्य व्यक्तीच बहुधा फोन करतो. त्यामुळे त्या सामान्य माणसांच्या तक्रारीचा आवाज दाबला गेला. संवेदनशिल अन् कर्तव्य पार पाडणारा हा विभाग संवेदनाहिन कसा होवू शकतो. जनतेनी मित्र म्हणावे ही अपेक्षा पोलीस विभागानी का करायची. सामान्य माणून पोलीस विभागापासून दूर का पळतो याची कारणे माहित असतानाही मूल्य हरविलेल्या पोलिसांना कोण समजावून सांगणार. पोलिसांना पुन्हा एकदा त्यांचे कर्तव्य, निष्ठ, शिस्ती सोबतच सामाजिकतेची जाण अन् प्रेरणा देणारे धडे व सकारात्मक दृष्टीकोनाचे प्रशिक्षण देण्याची वेळ आता आली आहे.