शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:21 IST

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती १९८२ सालापासून समितीचे संस्थापक, राष्ट्रीय संघटक तथा जादुटोना विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात प्रबोधनाचे कार्य करीत आहे.

ठळक मुद्देपंकज वंजारे : युवा शिबिराचे आयोजन, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती १९८२ सालापासून समितीचे संस्थापक, राष्ट्रीय संघटक तथा जादुटोना विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात प्रबोधनाचे कार्य करीत आहे. समिती कुठल्याही देवा धर्माला विरोध न करता समाजातील अनिष्ठ प्रथा आणि अंधद्धांच्या निर्मूलनासाठी व वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविण्यासाठी प्रयत्न करते, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंनिसचे युवा शाखेचे महाराष्ट्र राज्य संघटक पंकज वंजारे यांनी केले.अ.भा. अंनिस व रासेयो भंउारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जादूटोना विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विषयावर आयोजित युवा प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. कार्तिक पनीकर, प्रशासकीय प्रमुख जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. राजेंद्र शहा, जिल्हा समन्वयक रासेयो भंडारा प्रा. ममता वासनिक आजीवन अध्ययन केंद आणि विस्तार विभाग प्रमुख जे.एम. पटेल महाविद्यालय डी.जी. रंगारी उपाध्यक्ष अ.भा. अंनिस भंडारा जिल्हा कोषाध्यक्ष ए.बी. भोयर जि. महिला संघटक प्रिया शहारे, सोनिया डोंगरे उपस्थित होते.पंकज वंजारे यांनी जादूटोना विरोधी कायद्याच्या अनुसुचीची विविध उदाहरण आणि प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून माहिती देताना सांगितले की, संतांनी व महापुरूषांनी केलेल्या प्रबोधनाचा सार या कायद्यात आलेला आहे. या कायद्याच्या प्रचाराची जबाबदारी युवकांनी आपल्या खांद्यावर घेत आदर्श समाज घडवण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. कार्तिक पानीकर म्हणाले की, अ.भा. अंनिसचे कार्य अत्यंत महत्वाचे असून अशा प्रकारचे कार्य अत्यंत महत्वाचे असून अशा प्रकारचे शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याची आज गरज आहे.डॉ. राजेंद्र शहा यांनी प्रास्ताविकात रासेयो अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सतत प्रसारित करत असते. सशक्त युवापीढी निर्माण करण्यासाठी युवकांनी विवेकवादी होण्याची, जागृती घडवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. प्रिया शहारे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनिया डोंगरे यांनी केले. यावेळी जे.एम. पटेल, आर.एम. पटेल, प्रगती महाविद्यालय, आठवले महाविद्यालय, पडोळे महाविद्यालय भंडारा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अ.भा. अंनिस व रासेयो योजना यांच्या संयुकत विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज या विषयावर जिल्ह्यात महाविद्यालय तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जाणार आहे.