शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भटक्यांनी उभारली भटक्यांसाठी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 00:26 IST

देश प्रगतीकडे झेपावत असल्याच्या बाता होत असल्या तरी भटक्या विमुक्तांचे जगणे अजूनही उपेक्षित आहे.

सेवाभावनेतून घेतला ज्ञानदानाचा वसा : पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादभंडारा : देश प्रगतीकडे झेपावत असल्याच्या बाता होत असल्या तरी भटक्या विमुक्तांचे जगणे अजूनही उपेक्षित आहे. पोटापाण्याचा प्रश्न बिकट असताना शिक्षण घेणे मैलोगणिक दूर आहे. त्यांना शिकवून शहाणे करुन सोडण्याच्या उमेदीने भटक्या समाजातील सुशिक्षितांनी आपल्या भावंडांसाठी पालावर शाळा सुरू केली आहे. शिवजयंतीचा मुहूर्त साधून या शाळांना प्रारंभ करण्यात आला. भंडाऱ्यात झालेल्या बिऱ्हाड परिषदेतून मिळालेल्या ऊर्जेतून त्यांनी समाजबांधवांना अज्ञानाच्या गर्तेतून शिक्षणाची वाट दाखविण्याचा प्रण केला. भंडारा जिल्ह्यातील चोरखमारी, गिरोला, कारधा, भिलेवाडा, वडद, कोदामेडी व गोंदिया जिल्ह्यातील मुंडीकोटा, कुडवा येथे या शाळांचा शुभारंभ केला आहे. भिलेवाडा येथे राहुल चौहान, निशा गोविंद मखरे, विकेश अंकोश तांदूळकर, विनोद बांते यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले. गिरोला येथे निशिकांत लेंडे, उपसरपंच दुर्गा शेंडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल साकुरे, भीमराव ठाकरे, प्रशांत खोब्रागडे उपस्थित होते. कारधा येथे पंचायत समिती सभापती प्रल्हाद भुरे, निलेश मोरेश्वर शेंडे, आनंद खडसे, प्रशांत खोब्रागाडे, विनोद बांते, रामेश्वर, भोवते, प्रभू पाथरे, शंकर दोनोडे, ज्ञानेश्वर सोनवणे, शिवा कांबळे, प्रा. राजेंद्र दोनाडकर उपस्थित होते. कोदामेडी, ता. लाखांदूर येथे दिलीप चित्रीवेकर, लक्ष्मन जांगळे, बळीराम लांडगे, बाजीराव चव्हाण, कार्तिक मोहनलाल वडस्कर, भारत लाल वडस्कर, रोहित शिंद उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी व्हावा, यासाठी गोविंद केवल मखरे, रुपेश भानारकर, शंकर सार्वे, सुरभी चित्रीवेकर प्रयत्नरत आहेत. (नगर प्रतिनिधी)भिक्षेतून देणार मानधनसरकारच्या योजनांचा प्रकाश भटक्या व वंचितांच्या घरात पडलेला नाही. शिक्षकांची यंत्रणाही त्यांना ज्ञानाची गुरुकिल्ली देण्यात कमी पडली. अशा स्थितीत आपल्या लोकांना आपणच शिकविले पाहिजे, या भावनेतून भटक्या समाजातील शिक्षित तरुण पुढे आले आहेत. त्यांना मोबदल्याची अपेक्षा नाही. तरीही त्यांना मासिक ८०० रुपये मानधन दिले जाईल. हे मानधन भिक्षा मागून गोळा केलेल्या पैशातून देण्यात येणार आहे.कार्यकर्त्यांची धडपडसमाजाला समोर न्यायचे आहे, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी केवळ शासकीय मदतीवर विसंबून राहून चालणार नाही. फक्त मेळावे अन् परिषदा घेऊन आपल्या समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. ही बाब काही धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांनी जाणली. आम्हीच आमच्या समाजाचे भवितव्य घडविणार, या उमेदीने ७० कार्यकर्ते एकत्र येऊन आपल्या जिवाचे रान करीत आहेत.