शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

फाटलेले छत अन् ‘टेकू’ वरची शाळा धोकादायक

By admin | Published: July 03, 2017 12:40 AM

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविणाऱ्या जिल्हा परिषदांच्या शाळा तुटलेल्या वरुन फाटलेल्या अन् टेकूवर उभ्या आहेत.

विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात : संवेदनहीन शिक्षण विभागराजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविणाऱ्या जिल्हा परिषदांच्या शाळा तुटलेल्या वरुन फाटलेल्या अन् टेकूवर उभ्या आहेत. त्या शाळेच्या आतील भागातून पांढऱ्या आभाळाचे दर्शन होते. अशा या फाटक्या, तुटक्या टेकूवरच्या शाळेत लहान बालके अध्ययन करीत असल्याचा प्रकार शिक्षण विभागाला माहित आहे. तथापि, संवेदनहीन झालेल्या जिल्हा परिषद भंडाराच्या शिक्षण विभागाची झोप अजूनही उघडलेली नाहीे.कान्हळगाव / सिरसोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्वातंत्र्यापूर्वीची ईमारत पूर्णत: धोकादायक अवस्थेत आहे. याबाबत "लोकमत"ने २७ मार्च रोजी "टेकूवर उभी आहे शाळेची भिस्त" या शिर्षकाखाली बातमी प्रसिध्द केली होती. त्या बातमीने जिल्हा परिषदेने शिक्षण विभागात खळबळ माजली होती. दोन दिवसानंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविकांत देशपांडे, कार्यकारी अभियंता सुशिल कानेकर यांनी जिल्हा परिषद कान्हाळगावच्या प्राथमिक शाळेला भेट दिली होती. शाळेने निर्लेखन प्रकरण पाठविल्यानंतर दोन महिन्यात दोन वर्ग खोल्या उभ्या करुन दिल्या जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी त्यावेळी दिले होते. सदर शाळेने निर्लेखन प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविले आहे. एक आठवडा होवून शाळा सुरु झाल्या आहेत. पंरतु जिल्हा परिषद शाळा, कान्हळगावला नवीन वर्गखोल्या मंजूरीचे पत्रच आले नाही. तसेच धोकादायक ईमारतीत बसणारी छोटी बालके बसण्यासाठी कुठे पर्यायी व्यवस्था करायची याबाबत शिक्षण विभागाने कोणतेच मार्गदर्शन दिले नाही. जूनी ईमारत निर्लेखनाची मंजूरीही आजपर्यंत शिक्षण विभागाने दिली नाही. मुख्याध्यापक जगदिश निमजे यांनी धोकादायक ईमारतीत बसणारे विद्यार्थी कुठे बसवायचे याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना गटशिक्षणाधिकारी मोहाडी यांच्यामार्फत मार्गदर्शन मागविले आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकारी सदर शाळेची इमारत निर्लेखित करायची काय, नवीन वर्गखोल्या मंजूर झाल्या काय याविषयी खरं काय सांगायला तयार नाहीत. एका कर्मचाऱ्यांनी तर वर्गखोली मंजूर झाली असल्याचे सांगितले. पण, मंजूर झाल्याची माहिती कागदावर नसल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगीतले. तसेच पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला कान्हळगाव प्राथमिक शाळेच्या नवीन वर्गखोल्या मंजूर झाल्या काय, निर्लेखनाची मंजूरी याची कोणतीच खबर नसल्याचे सांगण्यात आले. कान्हळगाव शिवाय मोहाडी तालुक्यातील सात शाळा निर्लेखन मंजूरीची प्रतिक्षा करीत आहेत. कान्हळगाव/ सिरसोली प्राथमिक शाळेच्या पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या मोहाडी तालुक्यात ५२ वर्ग खोल्या धोकादायक वर्गखोल्या असल्याची माहिती पंचायत समिती मोहाडीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सादर केली.जिल्हा परिषदने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालविला आहे. अधिकारी, पदाधिकारी, जनप्रतिनिधी, जिल्हा परिषद शाळेने शिक्षणाचा दर्जा वाढवावा, प्रत्येक उपक्रमात भाग घ्यावा, दर्जेदार शिक्षणाची कास धरावी आदी बोधामृत शिक्षकांना पाजले जातात. पण, ज्या शाळेत अध्यापन व अध्ययन करतांनी विद्यार्थी व शिक्षकांना जीव धोक्यात घालून धोकादायक इमारतीत राहावे लागते. याबाबत मात्र गंभीरतेने पदाधिकारी ना अधिकारी बघत नसल्याचे उघड आहे.