शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

शालेय विद्यार्थी धुतात पोषण आहाराची भांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:28 IST

लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाºया तावशी येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील विद्यार्थ्यांकडून चक्क पोषण आहाराची भांडी धुऊन घेतली जात आहेत. ज्या हातात पुस्तक, पेन असायला हवे, त्या हातात शाळेतील शिक्षकांनी पोषण आहाराची भांडी धुण्यास भाग पाडले.

ठळक मुद्देपालक संतप्त : तावशी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील प्रकार

रविंद्र चन्नेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाºया तावशी येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील विद्यार्थ्यांकडून चक्क पोषण आहाराची भांडी धुऊन घेतली जात आहेत. ज्या हातात पुस्तक, पेन असायला हवे, त्या हातात शाळेतील शिक्षकांनी पोषण आहाराची भांडी धुण्यास भाग पाडले. या किळसवाण्या प्रकारामुळे तावशी परीसरात रोष व्यक्त केला जात आहे.तावशी येथील जिल्हा परिषद शाळेत शेकडो विद्यार्थी विद्यार्जनासाठी येत असतात. शाळेतील मुलांची पटसंख्या कमी होऊ नये, याकरीता शासनाने अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. शाळेत विद्यार्थ्यांची अधिक उपस्थिती राहावी, याकरिता शाळेत मध्यान्ह भोजन देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र गत १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांना केवळ पांढरा भात दिला जात होता. विद्यार्थी शाळेतील भात खाण्यासाठी भाजी घरून आणावी लागत होती. या प्रकाराबद्दल माहिती घेतली असता शासनाकडून आहाराचे देयक थकित असल्यामुळे मुलांना केवळ भात दिला जात होता. मात्र दोन दिवसांपासून आहार पुरवठा सुरक्षित असल्याचे दिसून आले. शनिवारला विद्यार्थ्यांना मध्यान्ह पोषण आहार वाटप करण्यात आले. मात्र भांडी स्वत: विद्यार्थीच धुऊन स्वच्छ करत असल्याचे लक्षात येताच 'लोकमत'ने या प्रकाराची माहिती मुख्याध्यापक सिंधीमेश्राम यांना दिली. वीज पुरवठा खंडित असल्यामुळे शाळेत पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेवनानंतर आपली भांडी स्वत: धुऊन ठेवावी, असे बजावण्यात आले. ऐन थंडीत कुडकुडत विद्यार्थ्यांनी आपली उष्टी भांडी धुताना आढळली. पोषण आहाराची भांडी आहार शिजविण्याकरिता असलेल्या स्वयंपाकी महिलेकडून धुऊन घेतली जातात. त्याकरिता शासनाकडून या स्वयंपाकी महिलांना मानधन दिले जाते. शाळेत होणाºया गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम शिक्षण समिती अशा अनेक समिती शासनाकडून नेमण्यात येतात. मात्र या समित्या आपली जबाबदारी योग्य रितीने सांभाळतात काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच शिक्षक मुख्यालयी न राहता स्व:गावावरून 'अपडाऊन' करीत आहेत. शाळेचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांनाच उघडावे लागते. शाळेतील केरकचरा सुद्धा विद्यार्थ्यांना गोळा करावा लागतो. वर्गखोल्याची स्वच्छता विद्यार्थीच करतात. यावरून मुले शाळा शिकण्यासाठी येतात की शाळेची कामे करण्याकरिता, असा गंभीर प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणावर वरिष्ठ पांघरून घालणार की कारवाई करणार, याकडे तावशीवासीयांचे लक्ष लागले आहे.विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:च्या भोजनाची ताटी स्वत: धूण्यास सांगितले. शाळेत पाणी नसल्यामुळे शाळेजवळील बोअरवेलवर विद्यार्थी भांडी धूतात. पाणी उपलब्ध करण्याची जबाबदारी माझी नाही.- व्ही.आर. सिंधीमेश्राम, मुख्याध्यापक जि.प. शाळा तावशी.