शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

जिल्ह्यात ‘प्लेटलेटस्’चा तुटवडा

By admin | Updated: November 29, 2014 00:39 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून डेंग्यू व मलेरियाने उच्छाद मांडला आहे. आॅक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ५५५ रूग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.

भंडारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून डेंग्यू व मलेरियाने उच्छाद मांडला आहे. आॅक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ५५५ रूग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील ६२ रूग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यातील सहा रुग्णांचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे निष्पन्न झाले. असे असतानाही जिल्ह्यात प्लेटलेट्सचा तुटवडा असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. असे असले तरी सामान्य रुग्णालय प्रशासनाने प्लेटलेट्सची गरज भासली नसल्याचे म्हटले आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयात आॅगस्ट ते आॅक्टोबर या महिन्यात डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या १२१ रूग्णांवर उपचार करण्यात आले. त्यातील ८८ रग्णांची रक्तजल नमुने तपासणी करण्यात आले. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील २८ रूग्णांना नागपूरला हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून ९३ रूग्णांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. जिल्हा हिवताप कार्यालयांतर्गत एप्रिल ते आॅक्टोंबरपर्यंत ५५५ रूग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. त्यातील ६२ रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.भंडारा जिल्ह्यात आॅक्टोंबर अखेरपर्यंत डेंग्यूची लागण झालेल्या सहा रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागात करण्यात आली आहे. हिवताप विभागाने आॅक्टोबर महिन्यात २४ रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यातील दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शरिरातील प्लेटलेट्स कमी होत असल्याने डेंग्यूची लागण होते. साधारण व रक्तस्त्राव असे दोन डेंग्यूची लक्षणे आहेत. १.५० लाखांवर प्लेटलेट असले तर प्रकृती ठणठणीत आहे, असे मानले जाते. मात्र ५० हजारांवर ते घसरल्यास डेंग्यूची लागण संभवते. जिल्ह्यात सध्यास्थितीत डेंग्यू नियंत्रणात असला तरी एखाद्यावेळी आवश्यकता भासल्यास रूग्णाच्या नातेवार्इंकासमोर संकट उभे राहू शकते. (शहर प्रतिनिधी)