शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

अकरा गावातील सरपंचांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:40 IST

इटियाडोह धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील झरी तलावात सोडण्यास गत दहा वर्षापूर्वी मंजूरी मिळाली. मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांनी शासनाला वारंवार निवेदन पाठविले. मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही.

ठळक मुद्देमुर्झा येथे आंदोलन : इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्याची सिंचनासाठी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : इटियाडोह धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील झरी तलावात सोडण्यास गत दहा वर्षापूर्वी मंजूरी मिळाली. मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांनी शासनाला वारंवार निवेदन पाठविले. मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही. अखेर मंगळवारपासून ११ गावातील सरपंच, बेरोजगार युवक व शेतकऱ्यांनी मुर्झा येथे तंबू उभारून आमरण उपोषणाला सुरुवात केली.या तलावात इटियाडोह धरणाचे पाणी सोडल्यास जवळपास अकरा गावातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी मिटू शकतो. याआधी मंजूरीपण मिळालेली होती. पण माशी कुठे शिंकली कळले नाही. या तलावाचे कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. इटियाडोह धरणाचे पाणी झरी तलावात आल्यास झरी, मुर्झा, पारडी, मालदा, चिचाळ, दहेगाव यासारख्या असंख्य गावांना शेतीला सिंचनाची पुरेपुर सोय उपलब्ध होऊ शकते.याशिवाय परिसरात बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आवासून उभा ठाकला आहे. झरी, मुर्झा व पारडी हे गावे जंगलव्याप्त असून मोठ्या प्रमाणात वनसंपदा उपलब्ध आहे. त्यावर आधारित उद्योग उभारून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच या ठिकाणी दहेगाव माइंस बरेच वर्षे कार्यरत होती. ती आता बंद असून माईन्स पूर्ववत सुरु करून बेरोजगारांना त्याठिकाणी रोजगार मिळेल या प्रमुख तीन कारणांसाठी सामाजिक कार्यकतर्ये मानबिंदू दहिवले यांच्या नेतृत्वात दिघोरीचे सरपंच अरुण गभणे, दिघोरीचे उपसरपंच रोहिदास देशमुख, राजूरी थुलकर, तावशीचे सरपंच रामदास बडोले, खोलमाराचे सरपंच अम्रृत मदनकर, मुर्झाचे सरपंच भोजराम ठलाल, चिचाळचे सरपंच लक्ष्मण जांगळे, चिकनाचे सरपंच ज्ञानेश्वर कांबळे, दहेगावचे सरपंच राकेश झाडे, पारडीचे सरपंच मिना ब्राम्हणकर, मुरमाडीचे सरपंच सुवर्णलता सोनटक्के, साखराचे सरपंच गीता बांगरे आणि शेतकरी संतोष गोंधोळे, ईश्वर मेश्राम, अभिमन पारधी, गजानन कावळे, नेपाल ठवकर, धर्मपाल किरझान, बाजीराव टेंभुर्णे, नीळकंठ डडमल, रामदास बन्सोड, लालदास कांबळे, दुधराम ठलाल, कैलाश सूर्यवंशी, नारायण मेश्राम, किशोर चव्हारे, देवराम कांबळे आणि उर्मिला ब्राम्हणकर उपोषणाला बसले आहेत. सदर उपोषणकर्त्यांच्या मागणीकडे शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.