शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अकरा गावातील सरपंचांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:40 IST

इटियाडोह धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील झरी तलावात सोडण्यास गत दहा वर्षापूर्वी मंजूरी मिळाली. मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांनी शासनाला वारंवार निवेदन पाठविले. मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही.

ठळक मुद्देमुर्झा येथे आंदोलन : इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्याची सिंचनासाठी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : इटियाडोह धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील झरी तलावात सोडण्यास गत दहा वर्षापूर्वी मंजूरी मिळाली. मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांनी शासनाला वारंवार निवेदन पाठविले. मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही. अखेर मंगळवारपासून ११ गावातील सरपंच, बेरोजगार युवक व शेतकऱ्यांनी मुर्झा येथे तंबू उभारून आमरण उपोषणाला सुरुवात केली.या तलावात इटियाडोह धरणाचे पाणी सोडल्यास जवळपास अकरा गावातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी मिटू शकतो. याआधी मंजूरीपण मिळालेली होती. पण माशी कुठे शिंकली कळले नाही. या तलावाचे कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. इटियाडोह धरणाचे पाणी झरी तलावात आल्यास झरी, मुर्झा, पारडी, मालदा, चिचाळ, दहेगाव यासारख्या असंख्य गावांना शेतीला सिंचनाची पुरेपुर सोय उपलब्ध होऊ शकते.याशिवाय परिसरात बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आवासून उभा ठाकला आहे. झरी, मुर्झा व पारडी हे गावे जंगलव्याप्त असून मोठ्या प्रमाणात वनसंपदा उपलब्ध आहे. त्यावर आधारित उद्योग उभारून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच या ठिकाणी दहेगाव माइंस बरेच वर्षे कार्यरत होती. ती आता बंद असून माईन्स पूर्ववत सुरु करून बेरोजगारांना त्याठिकाणी रोजगार मिळेल या प्रमुख तीन कारणांसाठी सामाजिक कार्यकतर्ये मानबिंदू दहिवले यांच्या नेतृत्वात दिघोरीचे सरपंच अरुण गभणे, दिघोरीचे उपसरपंच रोहिदास देशमुख, राजूरी थुलकर, तावशीचे सरपंच रामदास बडोले, खोलमाराचे सरपंच अम्रृत मदनकर, मुर्झाचे सरपंच भोजराम ठलाल, चिचाळचे सरपंच लक्ष्मण जांगळे, चिकनाचे सरपंच ज्ञानेश्वर कांबळे, दहेगावचे सरपंच राकेश झाडे, पारडीचे सरपंच मिना ब्राम्हणकर, मुरमाडीचे सरपंच सुवर्णलता सोनटक्के, साखराचे सरपंच गीता बांगरे आणि शेतकरी संतोष गोंधोळे, ईश्वर मेश्राम, अभिमन पारधी, गजानन कावळे, नेपाल ठवकर, धर्मपाल किरझान, बाजीराव टेंभुर्णे, नीळकंठ डडमल, रामदास बन्सोड, लालदास कांबळे, दुधराम ठलाल, कैलाश सूर्यवंशी, नारायण मेश्राम, किशोर चव्हारे, देवराम कांबळे आणि उर्मिला ब्राम्हणकर उपोषणाला बसले आहेत. सदर उपोषणकर्त्यांच्या मागणीकडे शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.