शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गुराखी ते अभिनेता असा संजूचा संघर्षमय प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 13:20 IST

Jara Hatke कधीकाळी गुरे राखणारा आता अभिनेता, दिग्दर्शक झाला. गुराखी ते अभिनेता असा संघर्षमय प्रवास करणारा हा तरुण आहे मोहाडी तालुक्यातील कन्हाळगाव येथील संजय मोहारे.

ठळक मुद्दे मोहाडी तालुक्याच्या कन्हाळगावचा तरुण

राजू बांते

लोकमत न्यूज नेटवर्क   भंडारा : साहस, इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. याचा प्रत्यय ग्रामीण भागातील एका तरुणाने आणून दिला. कधीकाळी गुरे राखणारा आता अभिनेता, दिग्दर्शक झाला. गुराखी ते अभिनेता असा संघर्षमय प्रवास करणारा हा तरुण आहे मोहाडी तालुक्यातील कन्हाळगाव येथील संजय मोहारे.

एखाद्या चित्रपटात शोभावी असे ही जिद्दीची कहाणी आहे. संजूचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर गावात काही गुरे चारली. त्यानंतर तुमसर येथे बीएस्सी केले. ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी २००४ साली गाव सोडले. नागपुरात बाॅक्सिंगचे प्रशिक्षण घेतले. मात्र, प्रशिक्षणात जखमी झाल्याने त्याला बाॅक्सिंग सोडावे लागले. त्यानंतर नागपुरात सायकल रिक्षा चालवू लागला. नाटक कंपनीतही काम करीत होता. संजूने त्यावेळी ५० ते ६० नाटकांत काम केले. घरून कोणतीही आर्थिक मदत नाही. त्यामुळे स्वत:च्या मेहनतीवर उदरनिर्वाह करून ध्येयपूर्तीकडे वाटचाल करीत होता.

आपल्या प्रतिभेला वाव मायानगरी मुंबईत मिळू शकते म्हणून त्याने २००५ मध्ये मुंबई गाठली. वेटरचे काम करीत असताना अर्धवेळ शूटिंगचे दिग्दर्शन करायचा. २००६ साली सेन्सार बोर्ड प्रतिनिधी प्रकाश कदम यांच्याकडे त्याला काम मिळाले. स्वत:च्या मुलासारखे संजूला वागवू लागले. कदम यांच्या निधनानंतर संजूची सचोटी आणि प्रामाणिकपणा बघून कदम यांच्या मुलींनी सेन्सार बोर्डाचे काम संजूकडे सोपविले. आठ वर्षे सेन्सार बोर्डाचा प्रतिनिधी म्हणून काम करीत होता. संजू मोहारे आता १५ वर्षांपासून मुंबईत राहत आहे. त्याने तेलगू, हिंदी सिनेमांत सहायक अभिनेता आणि ४० सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. सनी देओल यांच्या ‘सिंग ऑफ द ग्रेट’ या चित्रपटात सहायक दिग्दर्शकाचे काम केले. आता त्याची पावले चित्रपट निर्मितीकडे पडत असून अलीकडेच त्याने एका डाक्युमेंटरीची निर्मिती केली. आपल्या मायभूमीत तो याचे चित्रीकरण करणार आहे.

४० दिवस आर्थर रोड कारागृहात

सेन्सार बोर्डात प्रतिनिधी असताना तेथील बनावट प्रमाणपत्राचे प्रकरण पुढे आणले. १४ ऑगस्ट २०१४ मध्ये सीबीआयच्या मदतीने काही व्यक्तींना अटक झाली. मात्र, या धाडसी कामाचा परिणाम त्याला भोगावा लागला. केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र बोर्डाच्या प्रतिनिधीचे काम काढण्यात आले. उपजीविकेसाठी त्याने भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मोठ्या लोकांशी लढा देणे त्याला चांगलेच भोवले. ऑगस्ट २०१९ मध्ये याच प्रकरणात अटकविण्यात आले. तो ४० दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये होता. मात्र आरोप सिद्ध झाला नाही आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडला. या लढाईत मुंबईतील काही अभिनेत्यांनी संजूच्या पाठीवर हात ठेवला आणि त्यामुळेच आज तो मायानगरीत पाय रोवू शकला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके