शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'१०८'ने चार वर्षात दिली ४४ हजार रुग्णांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:44 IST

अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी नातेवाईकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत सुरू झालेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेने शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात चार वर्षात या सेवेच्या माध्यमातून ४४ हजारांवर रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय आरोग्य अभियान : भंडारा जिल्ह्यातील काना-कोपऱ्यात रुग्णांना मिळते २४ तास आपात्कालीन सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी नातेवाईकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत सुरू झालेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेने शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात चार वर्षात या सेवेच्या माध्यमातून ४४ हजारांवर रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे.शेतकरी बहुल, दुर्गम आणि मागास जिल्हा म्हणून भंडाराची ओळख आहे. आरोग्याच्या सुविधेबाबत नेहमीच बोंबाबोंब सुरू असते. एखाद्या रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहचविताना नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. अपघात असो की एखादी मोठी घटना रुग्णालयापर्यंत संबंधिताला तात्काळ पोहचविले तर त्याचे प्राण वाचू शकते, याचाच प्रत्येक आता गत चार वर्षापासून १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून येत आहे. भंडारा जिल्ह्यात २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेत आतापर्यंत ४४ हजार ३६९ रुग्णांना रुग्णालयापर्यंत वेळेत पोहचविण्यास मदत झाली.भंडारा जिल्ह्यात ११ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यापैकी तीन अत्याधुनिक एएलएस आणि आठ बीएलएल रुग्णवाहिका आहेत. भंडारा जिल्हा रुग्णालय, तुमसर, साकोली, उपजिल्हा रुग्णालय, पालांदूर, लाखनी, लाखांदूर, पवनी, मोहाडी, सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालय आणि शहापूर व लेंडेझरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत या रुग्णवाहिका उपलब्ध असतात. रुग्णवाहिकेची गरज भासल्यास तात्काळ १०८ क्रमांकावर दूरध्वनी केला जातो. त्यानंतर अवघ्या काही वेळातच रुग्णवाहिका पोहचते आणि जवळच्या रुग्णालयाला घेवून जाते. भंडारा जिल्ह्यात २०१४ मध्ये ही सेवा सुरू करण्यात आली. पहिल्यावर्षी दोन हजार ३२७ रुग्णांना सेवा देण्यात आली. तेव्हापासून सेवा घेणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. २०१५ मध्ये सहा हजार ३५०, २०१६ मध्ये आठ हजार ४७५, २०१७ मध्ये नऊ हजार २२९ आणि २०१८ मध्ये १७ हजार ९८८ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या सेवेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. पुर्वी रुग्णालयात जाण्यासाठी खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत होता. त्यातही कोणत्याच आरोग्य सेविधा रस्त्यात मिळत नव्हत्या. मात्र १०८ रुग्णवाहिका सुरू झाल्यापासून रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. या रुग्णवाहिकेत तज्ज्ञ डॉक्टर राहत असल्याने आपात्कालीन परिस्थती निर्माण झाल्यास रुग्णवाहिकेत उपचार करता येऊ शकते.भंडारा जिल्ह्यात अत्याधुनिक जीवनरक्षक यंत्रणा असलेल्या तीन रुग्णवाहिकेसह इतर आठ रुग्णवाहिका कार्यरत आहे. गत चार वर्षात रुग्णांना रुग्णवाहिकेने तात्काळ सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे अनेक रुग्णांचा प्राण वाचविण्यास आम्हाला यश आले.-डॉ. समीर शेंडे, जिल्हा व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका सेवा भंडारा.