शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

'१०८'ने चार वर्षात दिली ४४ हजार रुग्णांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:44 IST

अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी नातेवाईकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत सुरू झालेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेने शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात चार वर्षात या सेवेच्या माध्यमातून ४४ हजारांवर रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय आरोग्य अभियान : भंडारा जिल्ह्यातील काना-कोपऱ्यात रुग्णांना मिळते २४ तास आपात्कालीन सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी नातेवाईकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत सुरू झालेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेने शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात चार वर्षात या सेवेच्या माध्यमातून ४४ हजारांवर रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे.शेतकरी बहुल, दुर्गम आणि मागास जिल्हा म्हणून भंडाराची ओळख आहे. आरोग्याच्या सुविधेबाबत नेहमीच बोंबाबोंब सुरू असते. एखाद्या रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहचविताना नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. अपघात असो की एखादी मोठी घटना रुग्णालयापर्यंत संबंधिताला तात्काळ पोहचविले तर त्याचे प्राण वाचू शकते, याचाच प्रत्येक आता गत चार वर्षापासून १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून येत आहे. भंडारा जिल्ह्यात २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेत आतापर्यंत ४४ हजार ३६९ रुग्णांना रुग्णालयापर्यंत वेळेत पोहचविण्यास मदत झाली.भंडारा जिल्ह्यात ११ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यापैकी तीन अत्याधुनिक एएलएस आणि आठ बीएलएल रुग्णवाहिका आहेत. भंडारा जिल्हा रुग्णालय, तुमसर, साकोली, उपजिल्हा रुग्णालय, पालांदूर, लाखनी, लाखांदूर, पवनी, मोहाडी, सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालय आणि शहापूर व लेंडेझरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत या रुग्णवाहिका उपलब्ध असतात. रुग्णवाहिकेची गरज भासल्यास तात्काळ १०८ क्रमांकावर दूरध्वनी केला जातो. त्यानंतर अवघ्या काही वेळातच रुग्णवाहिका पोहचते आणि जवळच्या रुग्णालयाला घेवून जाते. भंडारा जिल्ह्यात २०१४ मध्ये ही सेवा सुरू करण्यात आली. पहिल्यावर्षी दोन हजार ३२७ रुग्णांना सेवा देण्यात आली. तेव्हापासून सेवा घेणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. २०१५ मध्ये सहा हजार ३५०, २०१६ मध्ये आठ हजार ४७५, २०१७ मध्ये नऊ हजार २२९ आणि २०१८ मध्ये १७ हजार ९८८ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या सेवेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. पुर्वी रुग्णालयात जाण्यासाठी खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत होता. त्यातही कोणत्याच आरोग्य सेविधा रस्त्यात मिळत नव्हत्या. मात्र १०८ रुग्णवाहिका सुरू झाल्यापासून रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. या रुग्णवाहिकेत तज्ज्ञ डॉक्टर राहत असल्याने आपात्कालीन परिस्थती निर्माण झाल्यास रुग्णवाहिकेत उपचार करता येऊ शकते.भंडारा जिल्ह्यात अत्याधुनिक जीवनरक्षक यंत्रणा असलेल्या तीन रुग्णवाहिकेसह इतर आठ रुग्णवाहिका कार्यरत आहे. गत चार वर्षात रुग्णांना रुग्णवाहिकेने तात्काळ सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे अनेक रुग्णांचा प्राण वाचविण्यास आम्हाला यश आले.-डॉ. समीर शेंडे, जिल्हा व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका सेवा भंडारा.