शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वाळूचा अवैध व्यवसाय जोरात

By admin | Updated: January 18, 2015 22:39 IST

शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेला वाळू तस्करीचा अवैध व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. यामध्ये दररोज लक्षावधी रुपयांची उलाढाल होत आहे. यात महसुल अधिकाऱ्यांचे संगणमत

पवनी : शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेला वाळू तस्करीचा अवैध व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. यामध्ये दररोज लक्षावधी रुपयांची उलाढाल होत आहे. यात महसुल अधिकाऱ्यांचे संगणमत असल्याने अनेकांचे फावले आहे. भर वस्तीत भाईतलाव वॉर्ड परिसर या व्यवसायाचे केंद्र असल्याने धुळीच्या प्रदूषणामुळे जनता त्रस्त झाली आहे. येथील वैनगंगा नदीच्या वाळूमध्ये ०.५० ते २ टक्के पर्यंत मातीचे प्रमाण असल्यामुळे ही वाळू चांगल्या प्रतीची मानली जाते. त्यामुळे येथील वाळूला विदर्भात दूरपर्यंत मागणी आहे. येथील वाळू सर्वात अधिक दररोज मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात जाते. मागील वर्षापासून येथील नदीघाटांचे लिलाव न झाल्यामुळे वाळूचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मध्यंतरी या व्यवसायविरुद्ध आवाज उठल्यामुळे प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध आणले होते. पण या रेतीमाफियांनी यावर नवीन शक्कल शोधून काढली. रेतीमाफिया हे रात्रभर नदीतून वाळूचा उपसा करून अनेक ठिकाणी साठा करून रात्रंदिवस वाळूची विक्री करीत आहेत. ही वाळू पवनी, इटगाव, येनोळा, गुडेगाव आदी रेतीघाटावरून उपसा करण्यात येत आहे. या अवैध धंद्याचे मुख्य केंद्र शहरातील भाईतलाव वॉर्डातील भर वस्तीत आहे. येणारे जाणारे वाळूचे वाहने धुळ उडवीत असल्याने व येथे साठा केलेल्या वाळूमध्ये या भागात मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण होत आाहे. येथील रहिवाशांनी या संबंधी तक्रार प्रशासनाला केल्यावर तात्पुरती कारवाई करण्यात आली. या गोरखधंद्यात लक्षावधी रुपयांची उलाढाल होत आहे. प्रशासनाचा वचक नसल्याने वाळू माफियांची दादागिरी वाढली आहे. या वाळूमाफियांनी शासकीय कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आहे. अनेक वेळा पत्रकारांनाही त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन करून त्यांना धमक्या दिल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)