शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचा अवैध व्यवसाय जोरात

By admin | Updated: January 18, 2015 22:39 IST

शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेला वाळू तस्करीचा अवैध व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. यामध्ये दररोज लक्षावधी रुपयांची उलाढाल होत आहे. यात महसुल अधिकाऱ्यांचे संगणमत

पवनी : शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेला वाळू तस्करीचा अवैध व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. यामध्ये दररोज लक्षावधी रुपयांची उलाढाल होत आहे. यात महसुल अधिकाऱ्यांचे संगणमत असल्याने अनेकांचे फावले आहे. भर वस्तीत भाईतलाव वॉर्ड परिसर या व्यवसायाचे केंद्र असल्याने धुळीच्या प्रदूषणामुळे जनता त्रस्त झाली आहे. येथील वैनगंगा नदीच्या वाळूमध्ये ०.५० ते २ टक्के पर्यंत मातीचे प्रमाण असल्यामुळे ही वाळू चांगल्या प्रतीची मानली जाते. त्यामुळे येथील वाळूला विदर्भात दूरपर्यंत मागणी आहे. येथील वाळू सर्वात अधिक दररोज मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात जाते. मागील वर्षापासून येथील नदीघाटांचे लिलाव न झाल्यामुळे वाळूचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मध्यंतरी या व्यवसायविरुद्ध आवाज उठल्यामुळे प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध आणले होते. पण या रेतीमाफियांनी यावर नवीन शक्कल शोधून काढली. रेतीमाफिया हे रात्रभर नदीतून वाळूचा उपसा करून अनेक ठिकाणी साठा करून रात्रंदिवस वाळूची विक्री करीत आहेत. ही वाळू पवनी, इटगाव, येनोळा, गुडेगाव आदी रेतीघाटावरून उपसा करण्यात येत आहे. या अवैध धंद्याचे मुख्य केंद्र शहरातील भाईतलाव वॉर्डातील भर वस्तीत आहे. येणारे जाणारे वाळूचे वाहने धुळ उडवीत असल्याने व येथे साठा केलेल्या वाळूमध्ये या भागात मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण होत आाहे. येथील रहिवाशांनी या संबंधी तक्रार प्रशासनाला केल्यावर तात्पुरती कारवाई करण्यात आली. या गोरखधंद्यात लक्षावधी रुपयांची उलाढाल होत आहे. प्रशासनाचा वचक नसल्याने वाळू माफियांची दादागिरी वाढली आहे. या वाळूमाफियांनी शासकीय कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आहे. अनेक वेळा पत्रकारांनाही त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन करून त्यांना धमक्या दिल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)