शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

रेती महाराष्ट्राची, राॅयल्टी मध्यप्रदेशची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

महाराष्ट्रातील तुमसर तालुक्यातील केवळ उमरवाडा घाटाचा लिलाव झाला आणि ताेही सीमेवर नाही. तर मध्य प्रदेशातील बहुतांश सर्वच घाटांचे लिलाव झाले आहेत. त्यामुळे पैल तिरावरून रेतीचे उत्खनन सुरू आहे. जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात अहाेरात्र उत्खनन केले जाते. मात्र, उत्खनन करताना मध्य प्रदेशातील कंत्राटदार महाराष्ट्राच्या सीमेतील रेतीचे उत्खनन करतात. असाच प्रकार वैनगंगा नदीपात्रातही सुरू असताे.

ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरून वाहणाऱ्या बावनथडी आणि वैनगंगा नदी रेती तस्करांसाठी परवणी ठरली आहे. कुठलेही सीमांकन नसल्याने महाराष्ट्राच्या हद्दीतील रेती उत्खननाचा सपाटा मध्य प्रदेशातील ठेकेदारांनी लावला आहे. रेती महाराष्ट्राची आणि राॅयल्टी मध्य प्रदेशाची असा प्रकार गत काही वर्षांपासून सुरू आहे. यात भंडारा जिल्ह्याच्या महसुलाला माेठा चुना लागत आहे. यात सर्वच जण डाेळ्यावर पट्टी बांधून आहेत.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरून बावनथडी नदी वाहते. या नदीवर नाकाडाेंगरी, आष्टी, पाथरी, चिखली, देवनारा, बपेरा असे रेती घाट आहेत. तर मध्य प्रदेशाच्या सीमेत भाेरगड, अंजनविरी, बाह्मणी आदी घाट आहेत. महाराष्ट्रातील तुमसर तालुक्यातील केवळ उमरवाडा घाटाचा लिलाव झाला आणि ताेही सीमेवर नाही. तर मध्य प्रदेशातील बहुतांश सर्वच घाटांचे लिलाव झाले आहेत. त्यामुळे पैल तिरावरून रेतीचे उत्खनन सुरू आहे. जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात अहाेरात्र उत्खनन केले जाते. मात्र, उत्खनन करताना मध्य प्रदेशातील कंत्राटदार महाराष्ट्राच्या सीमेतील रेतीचे उत्खनन करतात. असाच प्रकार वैनगंगा नदीपात्रातही सुरू असताे.सीमेवरून वाहणाऱ्या नदीत कुठेही सीमांकन झाले नाही. त्यामुळे काेणता भाग महाराष्ट्राचा आणि काेणता मध्य प्रदेशाचा हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे येथे रेती कंत्राटदारांसाठी चांगलीच पर्वणी असते. मध्यप्रदेशाच्या सीमेतून रेतीचे उत्खनन केले जाते. त्यासाठी मध्य प्रदेशच्या राॅयल्टीचा वापरही हाेताे. त्यामुळे त्यांच्यावर काेणती कारवाई करणे शक्य नाही. मात्र, रेती महाराष्ट्राची असल्याने भंडारा जिल्ह्याचा महसूल मात्र बुडत आहे.

दरराेज ५०० ट्रकमधून वाहतूकमध्य प्रदेशातील कंत्राटदार बावनथडी आणि वैनगंगा नदीपात्रातून दरराेज ५००च्या वर रेतीची वाहतूक करीत आहेत. सहा ते सात घाटांवर त्यांचा बाेलबाला आहे. जेसीबी मशीनने उत्खनन करून ट्रक, टिप्परने त्याची वाहतूक केली जात आहे. राॅयल्टी असल्याने त्यांच्यावर कारवाई करणेही शक्य नाही.

रेती कंत्राटदारांचा तुमसरमध्ये ठिय्या-    मध्य प्रदेशातील वाराशिवणी, बालाघाट आणि कटंगी येथील कंत्राटदारांनी मध्य प्रदेश सीमेतील रेतीघाट लिलावात घेतले आहेत. मात्र, त्यांची सर्व नजर महाराष्ट्रातील रेतीवर असते. त्यामुळेच कंत्राटदार व त्यांची माणसे तुमसर तहसीलच्या परिसरात ठिय्या देऊन असतात. कारवाई हाेऊ नये यासाठी ते दक्ष असतात. अर्थकारणामुळे महसूल विभाग काेणतीही कारवाई करीत नाही. हा प्रकार गत कित्येक वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्रातील घाटांचे लिलाव झाले असते तर कंत्राटदारांनीच आपल्या पद्धतीने याेग्य ताे बंदाेबस्त केला असता; परंतु आता तेही शक्य नाही. त्यासाठी आता महसूल विभागानेच पुढाकार घेवून सीमांकन निश्चित करावे.

 

टॅग्स :riverनदीsandवाळू