शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सोंड्याटोला उपसा प्रकल्पाच्या ‘सम’मध्ये रेतीचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नदीच्या पात्रातील पाण्याचा उपसा करण्यासाठी सम (टाकी) ची निर्मिती करण्यात आली आहे. नदीपात्रातील पाणी सममध्ये जमा करण्यात येत आहे. या सममध्ये नदीपात्रातील लाकडी ओंडके येणार नाही, यासाठी जाळी लावण्यात आली आहे; परंतु जाळीची नासधूस झाली असल्याने पुराचे पाण्यात वाहून येणारे लाकडी ओंडके, केरकचरा थेट सममध्ये शिरत असल्याने पंपाचे अडचणी वाढवीत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या सममधील पावसाळ्याचे पूर्वी रेती, माती, लाकडी ओंडके व अन्य केरकचऱ्याचा उपसा करण्यात आलेला नाही. यामुळे पावसाळ्यात नदीच्या पात्रातून पाण्याचा उपसा अडचणीत येणार आहे. पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपात तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाने वातानुकूलित खोलीत बसून निर्णय घेत असल्याने प्रकल्पाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नदीच्या पात्रातील पाण्याचा उपसा करण्यासाठी सम (टाकी) ची निर्मिती करण्यात आली आहे. नदीपात्रातील पाणी सममध्ये जमा करण्यात येत आहे. या सममध्ये नदीपात्रातील लाकडी ओंडके येणार नाही, यासाठी जाळी लावण्यात आली आहे; परंतु जाळीची नासधूस झाली असल्याने पुराचे पाण्यात वाहून येणारे लाकडी ओंडके, केरकचरा थेट सममध्ये शिरत असल्याने पंपाचे अडचणी वाढवीत आहेत. टाकीत गत अनेक वर्षांपासून रेती, माती आणि लाकडी ओंडके, केरकचरा जमा झालेला आहे. रेतीचे ढीग तयार झाले असल्याने नदीच्या पात्रातील पाणी टाकीत जमा होत नाही. टाकीच्या दिशेने असणाऱ्या नदीपात्रातील पाण्याचे प्रवाहात बदल झालेला आहे. यामुळे पाण्याचे प्रवाहात गती दिसून येत नाही. अखेरच्या क्षणात पाण्याचा उपसा बंद करण्यात येत आहे. प्रकल्प वर्षभरातून फक्त तीन महिने पाण्याचा उपसा करीत आहे. यामुळे टाकीतील रेतीचा उपसा करण्याची मागणी आहे. वातानुकूलित खोलीत बसून नियोजन तयार करण्यात येत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातील समस्या व अडचणी निकाली काढण्यासाठी जून महिन्याचा कालावधी शिल्लक आहे; परंतु नियोजनाचा थांगपत्ता नाही. अधिकाऱ्यानी अद्यापपर्यंत प्रकल्पस्थळात आढावा घेतला नाही. पंपगृहात समस्या आहेत. 

प्रकल्प वाऱ्यावर सोडले - प्रकल्प अडचणीत पाण्याचा उपसा करीत आहे. डागडुजीत डोलारा सुरू आहे. नियंत्रण सुटल्याने प्रकल्प स्थळात वांधे वाढले आहेत. पंपांची देखभाल व दुरुस्ती करण्यात विलंब करण्यात येत आहे. टाकीतील गाळ उपसा करण्यात आला नाही. नदीपात्रातील झुडपे, माती व रेतीचे ढिगारे काढण्यात आले नाहीत. टाकीच्या समोरील गाळ उपसा करण्यात आला नाही. यामुळे प्रकल्प वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा अनुभव येतो आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प