शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला उपसा प्रकल्पाच्या ‘सम’मध्ये रेतीचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नदीच्या पात्रातील पाण्याचा उपसा करण्यासाठी सम (टाकी) ची निर्मिती करण्यात आली आहे. नदीपात्रातील पाणी सममध्ये जमा करण्यात येत आहे. या सममध्ये नदीपात्रातील लाकडी ओंडके येणार नाही, यासाठी जाळी लावण्यात आली आहे; परंतु जाळीची नासधूस झाली असल्याने पुराचे पाण्यात वाहून येणारे लाकडी ओंडके, केरकचरा थेट सममध्ये शिरत असल्याने पंपाचे अडचणी वाढवीत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या सममधील पावसाळ्याचे पूर्वी रेती, माती, लाकडी ओंडके व अन्य केरकचऱ्याचा उपसा करण्यात आलेला नाही. यामुळे पावसाळ्यात नदीच्या पात्रातून पाण्याचा उपसा अडचणीत येणार आहे. पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपात तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाने वातानुकूलित खोलीत बसून निर्णय घेत असल्याने प्रकल्पाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नदीच्या पात्रातील पाण्याचा उपसा करण्यासाठी सम (टाकी) ची निर्मिती करण्यात आली आहे. नदीपात्रातील पाणी सममध्ये जमा करण्यात येत आहे. या सममध्ये नदीपात्रातील लाकडी ओंडके येणार नाही, यासाठी जाळी लावण्यात आली आहे; परंतु जाळीची नासधूस झाली असल्याने पुराचे पाण्यात वाहून येणारे लाकडी ओंडके, केरकचरा थेट सममध्ये शिरत असल्याने पंपाचे अडचणी वाढवीत आहेत. टाकीत गत अनेक वर्षांपासून रेती, माती आणि लाकडी ओंडके, केरकचरा जमा झालेला आहे. रेतीचे ढीग तयार झाले असल्याने नदीच्या पात्रातील पाणी टाकीत जमा होत नाही. टाकीच्या दिशेने असणाऱ्या नदीपात्रातील पाण्याचे प्रवाहात बदल झालेला आहे. यामुळे पाण्याचे प्रवाहात गती दिसून येत नाही. अखेरच्या क्षणात पाण्याचा उपसा बंद करण्यात येत आहे. प्रकल्प वर्षभरातून फक्त तीन महिने पाण्याचा उपसा करीत आहे. यामुळे टाकीतील रेतीचा उपसा करण्याची मागणी आहे. वातानुकूलित खोलीत बसून नियोजन तयार करण्यात येत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातील समस्या व अडचणी निकाली काढण्यासाठी जून महिन्याचा कालावधी शिल्लक आहे; परंतु नियोजनाचा थांगपत्ता नाही. अधिकाऱ्यानी अद्यापपर्यंत प्रकल्पस्थळात आढावा घेतला नाही. पंपगृहात समस्या आहेत. 

प्रकल्प वाऱ्यावर सोडले - प्रकल्प अडचणीत पाण्याचा उपसा करीत आहे. डागडुजीत डोलारा सुरू आहे. नियंत्रण सुटल्याने प्रकल्प स्थळात वांधे वाढले आहेत. पंपांची देखभाल व दुरुस्ती करण्यात विलंब करण्यात येत आहे. टाकीतील गाळ उपसा करण्यात आला नाही. नदीपात्रातील झुडपे, माती व रेतीचे ढिगारे काढण्यात आले नाहीत. टाकीच्या समोरील गाळ उपसा करण्यात आला नाही. यामुळे प्रकल्प वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा अनुभव येतो आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प