शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

वृक्षारोपणासाठी महिलांनी दिला ‘समता’ संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 00:35 IST

डोक्यावर पदर व मान खाली घालून घरातल्या घरात काम करून चूल आणि मुल सांभाळण्याची जबाबदारी ज्या महिलांवर ....

वृक्ष लागवडीतून पर्यावरण जतन : दुर्लक्षित बालोद्यानाचा होणार कायापालटभंडारा : डोक्यावर पदर व मान खाली घालून घरातल्या घरात काम करून चूल आणि मुल सांभाळण्याची जबाबदारी ज्या महिलांवर पुरूष प्रधान संस्कृतीने लादली होती. ती मोडीत काढीत महिलांनी त्यांच्या कर्तत्वाने परिस्थितीत बदल घडवून आणला आहे. महिलांनी घेतलेल्या पुढाकाराने व त्यांच्या कार्यकतृत्वाने महिलांनी पर्यावरण जतनासाठी घेतलेला पुढाकार समाजासमोर खरोखरचं आदर्शवत आहे.भंडारा शहरातील समता नगर वसाहतीत राहणाऱ्या महिलांनी पर्यावरणासाठी पुढाकार घेतलेला आहे. या वसाहतीत ले-आऊट मालकाने नागरिकांसाठी मोकड्या जागेवर बालोद्यान व मंदिरची उभारणी केली. सुरूवातीचे काही दिवस बालोद्यानात जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र, कालांतराने हे बालोद्याने दुर्लक्षीत झाल्याने, त्या झाडे-झुडपे वाढली. त्यामुळे बालोद्यानाचा कायापालट करण्यासाठी नागरिकांच्या पुढाकाराची गरज असताना त्यासाठी कोणीही वज्रमुठ बांधली नाही. पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास यावर उपाय म्हणून राज्य शासनाने वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करण्यासाठी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संदेश घराघरात पोहचविला आहे. शासनाच्या हाकेला समता नगरातील महिलांनी साद दिली. येथील महिलांनी एकत्र येवून त्यांच्या वसाहतीतील एकमेव बालोद्यानातील कचरा काढून स्वच्छता अभियान राबविले आहे. सोमवारपासून येथील सुमारे ५० च्या वसाहतवासीय बालोद्यानातील कचरा काढण्यासाठी श्रमदान करीत आहेत. यात महिलांचा मोठा सहभाग आहे. पहिल्या दिवशी त्यांनी पुरूषांच्या मदतीने झुडपे तोडली. तर आज दुसऱ्या दिवशीही दिवसभर येथे श्रमदान करण्यात आले. बालोद्यानाचा पूर्णपणे कायापालट करून येथे ५० च्यावर विविध प्रजातींचे वृक्षारोपन करण्याचा संकल्प या महिलांनी घेतला आहे. महिलांच्या पुढाकारामुळे बालोद्यान कात टाकणार आहे. येथील बंद झालेला बालकांचा किलबिलाट पुन्हा एकदा येत्या काही दिवसात ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी घेतलेला पुढाकार खरोखरचं वाखान्याजोगा व आदर्शवत आहे. (शहर प्रतिनिधी)या महिला, पुरूषांनी घेतला पुढाकारमेघा नारायणपुरे, कलावती कुंभारे, मंगला तितिरमारे, लता मोथरकर, प्रतिभा चांदेकर, माला भोगे, मंगला जगताप, कविता तिघरे, बेला ठकरेले, कविता गायधने, ज्योती नागरिकर, मीनाक्षी बालपांडे, रिंकू ठोंबरे, पे्रमनाथ चांदेकर, अरूण सेलोकर, देवीदास भारद्वाज, मनोज बोरकर, वैशाली झाडे, निक्कू कुंभारे, अक्षय फडके आदींनी पुढाकार घेतला.