शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी गोधन विक्रीला!

By admin | Updated: January 28, 2015 23:10 IST

वर्षभर शेतात राबराब राबायचे, शेतीसाठी बँक, बचत गट, सहकारी संस्था, सोसायटी आणि वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज घ्यायचे. त्यातून शेती पिकवायची. हाती येणाऱ्या उत्पन्नातून कुटूंबाचा

रवीन्द्र चन्नेकर - बारव्हावर्षभर शेतात राबराब राबायचे, शेतीसाठी बँक, बचत गट, सहकारी संस्था, सोसायटी आणि वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज घ्यायचे. त्यातून शेती पिकवायची. हाती येणाऱ्या उत्पन्नातून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवायचा, असा जीवनाचा गाडा हाकणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मात्र निसर्गाने चांगलाच फटका दिला. दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक बोझा वाढत आहे. त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांनी आता कवडीमोल भावात गोधन विक्रीला काढले आहे.पशुपालकाचा सखासोबती असलेल्या ठवळ्या-पवळ्याची जोडी असो व अन्य पशुधनाची विक्री तई, सानगडी बैल बाजारात केली जात आहे. बारव्हा परिसरातील ३५ ते ४० गावातील काही शेतकरी आपले पशुधन कसायाच्या हवाली करीत आहेत. धान, ऊस उत्पादक म्हणून लाखांदूर तालुक्याची ओळख आहे. या परिसरात यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना पुरते हतबल केले. मागील काही वर्षापासून निसर्गाच्या वृष्ट्रचक्रात शेतकरी व पशुपालक अडकला आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली तो पुरता दबल्या गेला आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगाम पावसाअभावी हातून गेला. निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाता यावे म्हणून बँक, सावकार, बचत गट व हात उसणवारीच्या, कर्जाच्या परतफेडीसाठी खरीप हंगामानंतर शेतकरी व पशुपालकांनी आपले पशुधन विक्रीला काढले आहे. पशुधन विकले नाही तर आपल्यावर कर्जाचा डोंगर वाढत जाईल. या भीती शेतकऱ्यांना आहे. पुढील रब्बी हंगामाचीही आशा मावळली आहे. त्यामुळे चाऱ्याचीही भीषण टंचाई होणार, या भीतीपोटी पशुपालक, शेतकऱ्यांनी पशुधन विक्रीचा निर्णय घेतला आहे.लाखांदूर तालुक्यातील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. आधुनिक संयंत्रामुळे सर्वत्र ट्रॅक्टरने नांगरणी व मळणी यासोबत शेतीची अनेक कामे ट्रॅक्टरने केली जाते. त्यामुळे बैलांनाही आता कामे उरली नाहीत. अशाही स्थितीत शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकटासोबत आधुनिक यंत्रांनी संकट निर्माण केले आहे. शेतीकामात मोठ्या प्रमाणावर आधुनिक संयंत्राचा वापर होत असल्याने पशुधन निकामी ठरत आहे.