शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

विजेच्या समस्येने साहुलीवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

वीज वितरण कंपनीला अनेकदा तक्रारी करूनही कंपनी तक्रारी सोडविण्यास पुढाकर घेत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकारा विरोधात साहुली ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन वीज वितरणाशी संबंधित विविध समस्या सोडविण्याचे निवेदन सावरी (जवाहरनगर) येथील सहाय्यक अभियंता यांना दिले.

ठळक मुद्देवीज वितरणाचे दुर्लक्ष : रोहित्र निकामी, तीन महिन्यांपासून ब्रेकडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा तालुक्यातील साहुली - राजोला गावठाण फिडर गत तीन महिन्यांपासून ब्रेकडाऊन होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीला अनेकदा तक्रारी करूनही कंपनी तक्रारी सोडविण्यास पुढाकर घेत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकारा विरोधात साहुली ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन वीज वितरणाशी संबंधित विविध समस्या सोडविण्याचे निवेदन सावरी (जवाहरनगर) येथील सहाय्यक अभियंता यांना दिले.जवाहरनगर नजिकच्या साहुली येथील रोहित्र गत तीन महिन्यांपासून नादुरुस्त आहे. विद्युत विभागाला अनेकवेळा तक्रार देऊनही कर्मचारी तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहेत. सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयात तक्रार घेऊन गेले असता सहाय्यक अभियंता आठ दिवसात रोहित्र बदलवून मिळणार असल्याचे आश्वासन देतात. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही रोहित्र लावण्यात आलेले नाही. त्यामुळे शेती पिके सिंचनाअभावी धोक्यात आली आहेत. साहुली येथील रोहित्रावर परिसरातील ३२ मोटारपंपधारकांचे कनेक्शन असून या रोहित्रावर दाब वाढत आहे. परिणामी दिवसातून अनेकवेळा फेज उडत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतसिंचनाकरिता मोठी अडचण निर्माण होते. अनेकवेळा शेतकºयांनी दोन रोहित्राची मागणी केली असताना अभियंता यांनी शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.रोहित्र नादुरुस्त रोहित्र कार्यालर्यालयात आणून शेतकºयांनी स्वत:च्या वाहनातून नवीन रोहित्र घेऊन जावे, असा दिशाभूल करणारा सल्ला शेतकºयांना संबधित अभियंता देत आहे. साहुली परिसरातील रोहित्र वर्षातून तीन चार वेळा नादुरुस्त होत असतो. त्यामुळे शेतकºयांना मोठा त्रास सहन करावा लागतो. साहुली, राजोला गावठाण फिडरमध्ये १६ गावांचा समावेश असून पावसाळ्याच्या दिवसात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या किंवा हवेची झुळूक आली तरी वीज पुरवठा खंडीत होत असतो.रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडीत झाला तर संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागते. विद्युत विभागाला अनेकवेळा तक्रारी देऊनही विद्युत विभाग तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे. पावसाळ्यापूर्वी तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या कापणे गरजेचे असताना दुर्लक्ष करण्यात आले. परिसरातील बरेच विजेचे खांब पडण्याच्या अवस्थेत असून जीवंत विद्युत तारा जमिनीपर्यंत लोंबकळत आहेत. जीवंत विद्युत तारांमुळे जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतरस्त्यावरून शेतकऱ्याना शेतपिक किंवा इतर साहित्य ने आण करताना जीवावर बेतून ने आण करावी लागते. परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत साहुली येथील ग्रामसभेत ठराव घेऊन साहुली, राजोला गावठाण फिडर दुरुस्त करण्यात यावे, एजी लाईन २४ तास देणे, एजी लाईनवरील वाळलेले पोल सरळ करणे, एजी लाईवरील रोहित्र बदलवून देणे, लोंबकळत असलेल्या जीवंत विद्युत तारा उंच करून देणे, गावठाण फिडरचे झुकलेले विद्युत खांब सरळ करणे, सिंग फेस लाईन सतत चालू ठेवण्यात यावी, असे ठराव ग्रामसभेत घेऊन सहाय्यक अभियंतांना निवेदन देण्यात आले. आतातरी वीज वितरण विभाग समस्या सोडवेल, अशी अपेक्षा गावकºयांनी व्यक्त केली आहे.लोंबकळणाऱ्या तारांमुळे अपघाताची शक्यताशेतातील विद्युत खांबाचे तार लोंबकळत असल्यामुळे शेतीकाम करतेवेळी अपघात होऊन जीवीतहानी होण्याची शक्यता असल्यामुळे साहुली येथील शेतकरी दत्तू मने याने विद्युत तारांखालील शेतजमीन पडीक ठेवली असल्याचे परिसरात बोलले जाते. तसेच भूमेश्वर सेलोकर व चिंतामण सेलोकर यांच्या शेतात जाणाऱ्या शेतरस्त्यावरील विद्युत खांबाचे तार जमिनीपर्यंत लोंबकळत असल्यामुळे जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील लोंबकळणाºया विद्युत तारा उंचावून वाकलेले विद्युत खांब सरळ करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :electricityवीज