शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

साहेब सांगा, धान पीकाला जगवायचे कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : धानाची रोपे लावली. काही रोपे पाण्याअभावी तशीच उभी आहेत. रोवणी न झालेली रोपे अन् रोवणी झालेल्या पिकांना पाण्याशिवाय वाचवायचे कसे. हा सवाल प्रत्येक शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे. विहिरीत पाणी आहे, वीज आहे तर विद्युत कनेक्शन नाही अशा दोन्ही खिंडीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे ‘साहेब, तुम्हीच ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची आर्त हाक : किसान सभेने दिले तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : धानाची रोपे लावली. काही रोपे पाण्याअभावी तशीच उभी आहेत. रोवणी न झालेली रोपे अन् रोवणी झालेल्या पिकांना पाण्याशिवाय वाचवायचे कसे. हा सवाल प्रत्येक शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे. विहिरीत पाणी आहे, वीज आहे तर विद्युत कनेक्शन नाही अशा दोन्ही खिंडीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे ‘साहेब, तुम्हीच सांगा धान पिकांना वाचवायचे कसे’, ही आर्त हाक तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्यासाठी भंडारा जिल्हा किसान सभेतर्फे निवेदन देण्यात आले.मोहाडी तालुक्यातील सातशेच्या वर विहिरीवर विद्युत जोडणीसाठी मागणीपत्र भरले आहेत. दोन वर्षानंतरही एकाही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात आलेला नाही. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व विद्युत जोडणी करणारे कंत्राटदार यांच्या कमिशनच्या वांध्यात शेतकऱ्यांना वेठीस पकडण्यात आले आहे मागील दोन वर्षापासून वीज जोडणी अभावी शेतकऱ्यांचे एका पाण्यासाठी धानाचे पीक हातातून गेले आहे.याही वर्षी केवळ वीज जोडणी मिळणार या आशेवर महावितरण कंपनी ठेवत आहे. पावसाने दडी मारली आहे. तीन आठवडे झालीत पाऊस नाही. सुरनदीसह अनेक बंधारे कोरडे पडली आहेत. धानपिक वाचविण्यासाठी आतापासून डिझेल इंजीनच्याद्वारे शेतीला पाणी दिले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी ४० रूपये भरून मागणीपत्र भरले आहे. किमान त्या शेतकºयांना तात्पुरता वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी किसान सभेने केली आहे. वीज कनेक्शन दिले जात नाही, तात्पूरती वीज जोडणीसाठी कुणी ऐकत नाही, अशावेळी शेतकरी वीज चोरी करून पीकांना पाणी देतो.पर्याय नसल्याने वर्षभराच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या हिंमतीने धोका पत्करून वीज चोरतो. त्या शेतकºयांना पकडण्याचा व दंड वसूल करण्याचा सपाटा वीज अधिकारी करीत आहेत. याविषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ६ आॅगस्ट रोजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ८ आॅगस्टपासून १२ तास दिवसा व रात्री सहा तास शेती सिंचनासाठी वीज पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र उर्जामंत्र्यांच्या आश्वासनाची पूर्तता करायला उशिर झाला.तीन दिवस उलटूनही शेतीला कुठेच १८ तास वीज दिली जात नाही. शेतकरी वाटाण्याच्या अक्षता देणाºया उर्जामंत्र्यांना गंभीर परिस्थिती भोगावे लागती, असे किसान सभेचे जिल्हा सचिव माधव बांते यांनी म्हटले आहे. मागणी पत्र भरलेल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज कनेक्शन मिळेपर्यंत तात्पुरती वीज जोडणीची तातडीने सोय करून द्यावी. तसेच उर्जामंत्र्याच्या आश्वासनानुसार शेतीसाठी १८ तास वीज देण्यात यावी अन्यथा किसान सभा आंदोलन उभारेल, असे निवेदन तहसिलदार मोहाडी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. निवेदन देतानी किसान सभेचे सचिव माधवराव बांते, नितीन मोहारे, जयप्रकाश मसर्के, सुखचंद सुखदेवे, शंकर शेंडे, बिसन सार्वे, अयुब शेख, अनिल गाढवे, सलीम शेख, तुकाराम बांते आदी शेतकरी व किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.शेतमजूर युनियनचे निवेदनसातबारा कोरा करून शेतीला पर्याप्त बिनव्याज कर्जदेण्यात यावा, स्वामीनाथन अयोगाची अंमलबजावणी करा, शेती उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा भाव द्यावा. शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर, असंघटीत कामगार यांना वयाच्या ६० वर्षानंतर सेवानिवृत्तीवेतन द्या, श्रावण बाळसह इतर योजनेची पेन्शन एक हजार करा, दावेदारांना वनाधिकार कायद्याखाली जमिनीचे पट्टे द्या, सरकारी स्वस्त दुकानात साखर, केरोसीन उपलब्ध करा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा आदी मागण्यांचेही निवेदन किसान सभा व लाल बावटा शेतमजूर युनियन मोहाडीतर्फे देण्यात आला.